शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

व्यंकय्या नायडू यांचे मोदींनी केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:57 IST

व्यंकय्या नायडू यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपतिपदाची शपथ दिली. नायडू हे देशाचे १३वे उपराष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक केंद्रीय नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : व्यंकय्या नायडू यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपतिपदाची शपथ दिली. नायडू हे देशाचे १३वे उपराष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक केंद्रीय नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.शपथ ग्रहण केल्यानंतर व्यंकय्या नायडू संसदेत आले, त्या वेळी राज्यसभेत सर्व पक्षांच्या खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. नायडू हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले उपराष्ट्रपती आहेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. नायडू यांनी राज्यसभेत बराच काळ काम केले आहे. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज कसे चालते याची त्यांना माहिती असून, ते सभापती या नात्याने सभागृहाचे कामकाज उत्तम प्रकारे हाताळतील, असे मोदी म्हणाले.‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजना’ ही नायडू यांची देशाला भेट आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, शेती व शेतकºयांच्या समस्यांची त्यांना चांगली जाणीव आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही नायडू यांचे कौतुक केले. तळागाळातून आलेल्या व्यक्तीची देशाच्या उपराष्ट्रपतिपदी निवड होणे ही मोठी बाब असून, हेच आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे, असे आझाद म्हणाले.मोदींची शेरोशायरीनायडू यांचे कौतुक करतानाच, पंतप्रधान मोदी यांनी एक शेर ऐकवत उपराष्ट्रपतींना त्यांच्या जबाबदारीची जाणीवही करूनदिली. ते म्हणाले...अमल करो ऐसा सदन मेंअमल करो ऐसा सदन मेंजहां से गुजरे तुम्हारी नजरउधर से तुम्हे सलाम आए