शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

"संध्याकाळ होताच गोळीबार सुरू होतो, राष्ट्रपती राजवटीची गरज", मणिपूरहून परतले 'इंडिया'चे खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 19:30 IST

दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी इंफाळमध्ये मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेऊन सर्व खासदार दिल्लीला परतले आहेत.

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेला हिंसाचार आतापर्यंत सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया'च्या २१ खासदारांचा मणिपूर दौरा केला होता. आज या खासदारांचा मणिपूर दौरा आज संपला. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी इंफाळमध्ये मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेऊन सर्व खासदार दिल्लीला परतले आहेत.

दिल्लीत पोहोचलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी सांगितले की, मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि दोन (कुकी आणि मैतेई) समुदायांमध्ये अजूनही तणाव आहे. तसेच, राज्यातील अनेक भागात संध्याकाळ होताच गोळीबाराचे आवाज येऊ लागतात, असा दावा खासदारांनी केला. सर्व विरोधी खासदारांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

सध्या राज्यात राष्ट्रपती राजवटीची गरज असल्याने बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे खासदारांनी सांगितले. तसेच, परिस्थिती इतकी बिकट आहे की राज्याचे राज्यपालही हतबल होऊन काहीही करू शकत नाहीत. मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असूनही केंद्र सरकार शांत बसले आहे, असा आरोप सुद्धा खासदारांनी केला आहे.

मणिपूर दौऱ्यात विरोधी खासदारांच्या टीममध्ये सहभागी असलेले काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राज्यातील परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे म्हटले आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, संपूर्ण मणिपूर जळत आहे आणि देशाचे पंतप्रधान बासरी वाजवत आहेत. मोठमोठ्या चर्चा होत आहेत, पण मणिपूरबाबत मौन आहे. सरकार डोळे मिटून बसले आहे, तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. 

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी - मनोज झायाचबरोबर, आरजेडीचे खासदार मनोज झा म्हणाले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, अशी आमची इच्छा आहे. दोन्ही समुदायाने राज्यात सामंजस्याने राहावे, एवढीच आमची मागणी आहे. तेथील परिस्थिती अधिक धोकादायक आहे. यावर सर्वतोपरी समर्थन केले जाईल, अशी चर्चा यापूर्वीच संसदेत झाली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने मणिपूरलाही भेट द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू मणिपूरमध्ये ३ मे रोजी कुकी समुदायाकडून आदिवासी एकता रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान कुकी आणि मेईतेई समुदाय आमनेसामने आले आणि काही वेळातच हाणामारीचे रूपांतर हिंसाचारात झाले. राज्याच्या विविध भागात हजारो घरे आणि दुकाने जाळण्यात आली. या हिंसक संघर्षात आतापर्यंत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांना मदत छावण्यांमध्ये राहावे लागले आहे. मात्र, राज्यात शांतता राखण्यासाठी सरकारकडून लष्करही तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार