शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"संध्याकाळ होताच गोळीबार सुरू होतो, राष्ट्रपती राजवटीची गरज", मणिपूरहून परतले 'इंडिया'चे खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 19:30 IST

दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी इंफाळमध्ये मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेऊन सर्व खासदार दिल्लीला परतले आहेत.

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेला हिंसाचार आतापर्यंत सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया'च्या २१ खासदारांचा मणिपूर दौरा केला होता. आज या खासदारांचा मणिपूर दौरा आज संपला. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी इंफाळमध्ये मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेऊन सर्व खासदार दिल्लीला परतले आहेत.

दिल्लीत पोहोचलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी सांगितले की, मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि दोन (कुकी आणि मैतेई) समुदायांमध्ये अजूनही तणाव आहे. तसेच, राज्यातील अनेक भागात संध्याकाळ होताच गोळीबाराचे आवाज येऊ लागतात, असा दावा खासदारांनी केला. सर्व विरोधी खासदारांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

सध्या राज्यात राष्ट्रपती राजवटीची गरज असल्याने बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे खासदारांनी सांगितले. तसेच, परिस्थिती इतकी बिकट आहे की राज्याचे राज्यपालही हतबल होऊन काहीही करू शकत नाहीत. मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असूनही केंद्र सरकार शांत बसले आहे, असा आरोप सुद्धा खासदारांनी केला आहे.

मणिपूर दौऱ्यात विरोधी खासदारांच्या टीममध्ये सहभागी असलेले काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राज्यातील परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे म्हटले आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, संपूर्ण मणिपूर जळत आहे आणि देशाचे पंतप्रधान बासरी वाजवत आहेत. मोठमोठ्या चर्चा होत आहेत, पण मणिपूरबाबत मौन आहे. सरकार डोळे मिटून बसले आहे, तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. 

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी - मनोज झायाचबरोबर, आरजेडीचे खासदार मनोज झा म्हणाले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, अशी आमची इच्छा आहे. दोन्ही समुदायाने राज्यात सामंजस्याने राहावे, एवढीच आमची मागणी आहे. तेथील परिस्थिती अधिक धोकादायक आहे. यावर सर्वतोपरी समर्थन केले जाईल, अशी चर्चा यापूर्वीच संसदेत झाली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने मणिपूरलाही भेट द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू मणिपूरमध्ये ३ मे रोजी कुकी समुदायाकडून आदिवासी एकता रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान कुकी आणि मेईतेई समुदाय आमनेसामने आले आणि काही वेळातच हाणामारीचे रूपांतर हिंसाचारात झाले. राज्याच्या विविध भागात हजारो घरे आणि दुकाने जाळण्यात आली. या हिंसक संघर्षात आतापर्यंत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांना मदत छावण्यांमध्ये राहावे लागले आहे. मात्र, राज्यात शांतता राखण्यासाठी सरकारकडून लष्करही तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार