शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

'7 दिवसांत जागा रिकामी करा...', वक्फ बोर्डाच्या नोटीसमुळे संपूर्ण गावात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 18:35 IST

प्रशासनालाही याबाबत माहिती नाही; हिंदू संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा

MP News: गेल्या काही महिन्यांपासून देशभरात वक्फ बोर्डाची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक आणले असून, सध्या ते पुनरावलोकनासाठी समितीकडे पाठवण्यात आले आहे. वक्फ बोर्डाने देशभरातील अनेक ठिकाणी जमिनी बळकावल्याचा आरोप आहे. अशातच, मध्य्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातून अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. येथील माखनी गावात वक्फ बोर्डाची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे.

वक्फ बोर्डाने गावातील सात कुटुंबांना त्यांची जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा केला असून, 15 दिवसांत जागा रिकामी करण्यास सांगितले आहे. जागा रिकामी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे. या नोटिशीने जबर धक्का बसलेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तपासाचे आश्वासन दिले असले तरी, हिंदू संघटनांनी हा निषेध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्डाने ज्या सात कुटुंबांना नोटीस पाठवली आहे, ते या गावात पिढ्यानपिढ्या राहत आहेत. दरम्यान, ही जमीन सरकारी जमीन असून, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नोटीस मिळालेल्या रामकलीबाई म्हणाल्या, आम्ही आमचा जीव देवू, पण जमीन सोडणार नाही. या घटनेनंतर हिंदू संघटना सक्रिय झाल्या आहेत. संघटनांनी वक्फ बोर्डाचा दावा निराधार ठरवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकारी काय म्हणाले?जिल्हाधिकारी अरुणकुमार विश्वकर्मा म्हणाले, माध्यमांद्वारे ही बाब आमच्या निदर्शनास आली आहे. वक्फ बोर्डाने कोणत्या आधारावर नोटीस बजावली, याची चौकशी केली जाईल. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य ती कारवाई करू. याबाबत जिल्हा प्रशासनाला आजपर्यंत माहिती नसल्याचे मान्य केल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डMadhya Pradeshमध्य प्रदेशHinduहिंदूMuslimमुस्लीम