शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

'7 दिवसांत जागा रिकामी करा...', वक्फ बोर्डाच्या नोटीसमुळे संपूर्ण गावात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 18:35 IST

प्रशासनालाही याबाबत माहिती नाही; हिंदू संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा

MP News: गेल्या काही महिन्यांपासून देशभरात वक्फ बोर्डाची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक आणले असून, सध्या ते पुनरावलोकनासाठी समितीकडे पाठवण्यात आले आहे. वक्फ बोर्डाने देशभरातील अनेक ठिकाणी जमिनी बळकावल्याचा आरोप आहे. अशातच, मध्य्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातून अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. येथील माखनी गावात वक्फ बोर्डाची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे.

वक्फ बोर्डाने गावातील सात कुटुंबांना त्यांची जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा केला असून, 15 दिवसांत जागा रिकामी करण्यास सांगितले आहे. जागा रिकामी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे. या नोटिशीने जबर धक्का बसलेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तपासाचे आश्वासन दिले असले तरी, हिंदू संघटनांनी हा निषेध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्डाने ज्या सात कुटुंबांना नोटीस पाठवली आहे, ते या गावात पिढ्यानपिढ्या राहत आहेत. दरम्यान, ही जमीन सरकारी जमीन असून, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नोटीस मिळालेल्या रामकलीबाई म्हणाल्या, आम्ही आमचा जीव देवू, पण जमीन सोडणार नाही. या घटनेनंतर हिंदू संघटना सक्रिय झाल्या आहेत. संघटनांनी वक्फ बोर्डाचा दावा निराधार ठरवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकारी काय म्हणाले?जिल्हाधिकारी अरुणकुमार विश्वकर्मा म्हणाले, माध्यमांद्वारे ही बाब आमच्या निदर्शनास आली आहे. वक्फ बोर्डाने कोणत्या आधारावर नोटीस बजावली, याची चौकशी केली जाईल. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य ती कारवाई करू. याबाबत जिल्हा प्रशासनाला आजपर्यंत माहिती नसल्याचे मान्य केल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डMadhya Pradeshमध्य प्रदेशHinduहिंदूMuslimमुस्लीम