शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

'7 दिवसांत जागा रिकामी करा...', वक्फ बोर्डाच्या नोटीसमुळे संपूर्ण गावात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 18:35 IST

प्रशासनालाही याबाबत माहिती नाही; हिंदू संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा

MP News: गेल्या काही महिन्यांपासून देशभरात वक्फ बोर्डाची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक आणले असून, सध्या ते पुनरावलोकनासाठी समितीकडे पाठवण्यात आले आहे. वक्फ बोर्डाने देशभरातील अनेक ठिकाणी जमिनी बळकावल्याचा आरोप आहे. अशातच, मध्य्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातून अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. येथील माखनी गावात वक्फ बोर्डाची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे.

वक्फ बोर्डाने गावातील सात कुटुंबांना त्यांची जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा केला असून, 15 दिवसांत जागा रिकामी करण्यास सांगितले आहे. जागा रिकामी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे. या नोटिशीने जबर धक्का बसलेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तपासाचे आश्वासन दिले असले तरी, हिंदू संघटनांनी हा निषेध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्डाने ज्या सात कुटुंबांना नोटीस पाठवली आहे, ते या गावात पिढ्यानपिढ्या राहत आहेत. दरम्यान, ही जमीन सरकारी जमीन असून, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नोटीस मिळालेल्या रामकलीबाई म्हणाल्या, आम्ही आमचा जीव देवू, पण जमीन सोडणार नाही. या घटनेनंतर हिंदू संघटना सक्रिय झाल्या आहेत. संघटनांनी वक्फ बोर्डाचा दावा निराधार ठरवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकारी काय म्हणाले?जिल्हाधिकारी अरुणकुमार विश्वकर्मा म्हणाले, माध्यमांद्वारे ही बाब आमच्या निदर्शनास आली आहे. वक्फ बोर्डाने कोणत्या आधारावर नोटीस बजावली, याची चौकशी केली जाईल. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य ती कारवाई करू. याबाबत जिल्हा प्रशासनाला आजपर्यंत माहिती नसल्याचे मान्य केल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डMadhya Pradeshमध्य प्रदेशHinduहिंदूMuslimमुस्लीम