शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

"मला विचारलेही जात नाही...", कमलनाथ यांनी काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त केली नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:11 IST

Kamal Nath : येत्या २६ जानेवारीला महू येथे काँग्रेसची मेगा रॅली होणार आहे.

मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ (Kamal Nath) यांनी पक्षाच्या संघटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. येत्या २६ जानेवारीला महू येथे काँग्रेसची मेगा रॅली होणार आहे. या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर ज्येष्ठ नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. 

या रॅलीच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी काल रात्री काँग्रेसच्या एका समितीची झूमद्वारे बैठक झाली. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते उमंग सिंगर, कमलनाथ, दिग्विजय सिंग आणि राज्य पीएसीचे इतर सदस्य उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान कमलनाथ म्हणाले, "आजकाल असे घडतंय की, मला संघटनेतील नियुक्त्यांबाबतही विचारले जात नाही. नियुक्त्यांबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली पाहिजे. तसेच, मला बैठकांची कोणतीही माहिती दिली जात नाही. यापूर्वीही असेच होत आले आहे. अलीकडेच मला मीडियाद्वारे माहिती मिळाली की, पीसीसीमध्ये एक बैठक झाली आहे."

दरम्यान, कमलनाथ हे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा होते. तसेच, ते मार्च २०२० ते एप्रिल २०२२ पर्यंत मध्य प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. मे २०१८ मध्ये त्यांची मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचे नेतृत्व केले होते. त्यांनी १७ डिसेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्रिपद स्वीकारले होते. मात्र, सरकारमध्ये बहुमत नसल्यामुळे २० मार्च २०२० रोजी राजीनामा त्यांनी दिला होता.

दिग्विजय सिंह सुद्धा नाराज!काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय यांनीही एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "मला बैठकीच्या काही मिनिटांपूर्वीच बैठकीचा अजेंडा सांगण्यात आला होता. मोबाइलवरून बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. हे आमच्यासाठी योग्य नाही." दरम्यान, दिग्विजय सिंह सध्या काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहेत. ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. दिग्विजय सिंह हे त्यांच्या स्पष्टवक्ते वक्तव्यांसाठी ओळखले जातात आणि नेहमीच चर्चेत असतात.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिले उत्तर!मध्य प्रदेशातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी म्हणाले, "सर्व वरिष्ठ नेत्यांचे मत घेऊनच निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे काही गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे." तसेच, नुकतेच प्रवक्ते नियुक्तीबाबत पत्र देण्यात आले होते, मात्र वरिष्ठ नेते खूश नसल्याचे सांगितल्यावर सर्व नियुक्त्या तातडीने रद्द करण्यात आल्याचेही जितू पटवारी यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश