शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चित्रपट एका दिवसात १२० कोटी कमवतात; मग कसली मंदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 05:41 IST

रवीशंकर प्रसाद यांचे अजब तर्कट

मुंबई : जगभरातील वित्तीय संस्था आणि अर्थशास्त्री मंदीच्या सावटाबाबत चिंता व्यक्त करत असताना, भाजपचे मंत्री मात्र चित्रपटांच्या कमाईचा दाखला देत मंदी नसल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. २ आॅक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्यानेच या चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केल्याचा अजब दावा केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शनिवारी केला.

नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रवीशंकर प्रसाद यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीचे आणि बेरोजगारीचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. २ आॅक्टोबरला तीन चित्रपट प्रदर्शित झाले. सिनेउद्योगाच्या एका जाणकाराने दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानेच चित्रपट इतकी कमाई करत आहेत,’ असे प्रसाद म्हणाले. यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष शायना एनसी, प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण, गणेश हाके उपस्थित होते.

प्रसाद म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याने आर्थिक आघाडीवर काळजी करण्यासारखी स्थिती नाही. देशात या वर्षी १६.३ बिलियन डॉलर एवढी थेट विदेशी गुंतवणूक आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा थेट विदेशी गुंतवणुकीत २० टक्के वाढ झाली आहे.चलनवाढीचा दर नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. करदात्यांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत दुप्पट वाढ झाली आहे, आयकर संकलनातही दुपटीने वाढ झाली आहे. जागतिक मंदीतही भारताची अर्थव्यवस्था ६ टक्क्यांपेक्षा अधिक गतीने वाढत आहे. मागील दोन वर्षांत कामगार भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये (ईपीएफ) अडीच कोटींनी वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात साडेपाच लाख जणांना नोकऱ्या मिळाल्या, असे नॅसकॉमच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नव्या नोकºया निर्माण होत आहेत, म्हणूनच कामगार भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये वाढ होते आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसाद