शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट एका दिवसात १२० कोटी कमवतात; मग कसली मंदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 05:41 IST

रवीशंकर प्रसाद यांचे अजब तर्कट

मुंबई : जगभरातील वित्तीय संस्था आणि अर्थशास्त्री मंदीच्या सावटाबाबत चिंता व्यक्त करत असताना, भाजपचे मंत्री मात्र चित्रपटांच्या कमाईचा दाखला देत मंदी नसल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. २ आॅक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्यानेच या चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केल्याचा अजब दावा केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शनिवारी केला.

नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रवीशंकर प्रसाद यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीचे आणि बेरोजगारीचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. २ आॅक्टोबरला तीन चित्रपट प्रदर्शित झाले. सिनेउद्योगाच्या एका जाणकाराने दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानेच चित्रपट इतकी कमाई करत आहेत,’ असे प्रसाद म्हणाले. यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष शायना एनसी, प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण, गणेश हाके उपस्थित होते.

प्रसाद म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याने आर्थिक आघाडीवर काळजी करण्यासारखी स्थिती नाही. देशात या वर्षी १६.३ बिलियन डॉलर एवढी थेट विदेशी गुंतवणूक आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा थेट विदेशी गुंतवणुकीत २० टक्के वाढ झाली आहे.चलनवाढीचा दर नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. करदात्यांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत दुप्पट वाढ झाली आहे, आयकर संकलनातही दुपटीने वाढ झाली आहे. जागतिक मंदीतही भारताची अर्थव्यवस्था ६ टक्क्यांपेक्षा अधिक गतीने वाढत आहे. मागील दोन वर्षांत कामगार भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये (ईपीएफ) अडीच कोटींनी वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात साडेपाच लाख जणांना नोकऱ्या मिळाल्या, असे नॅसकॉमच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नव्या नोकºया निर्माण होत आहेत, म्हणूनच कामगार भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये वाढ होते आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसाद