शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दंगलग्रस्त भागात जवानांचे संचलन

By admin | Updated: July 8, 2017 01:11 IST

पोलीस आणि निमलष्करी दलाने शुक्रवारी पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागात संचलन केले. २४ परगना जिल्ह्यात शांतता प्रस्थापित

कोलकाता : पोलीस आणि निमलष्करी दलाने शुक्रवारी पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागात संचलन केले. २४ परगना जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे संचलन करण्यात आले. राज्य सरकारने सांगितले की, बदुरिया, स्वरूपनगर, देगंगा आणि बशीरहाट भागात परिस्थिती नियंत्रणात आहे. पण, काही भागांत गुरुवारी हिंसाचाराच्या किरकोळ घटना झाल्या होत्या, अशी माहितीही मिळत आहे. स्थानिक नागरिक आपल्या घरांमध्येच होते. तर, दुकाने, बाजारपेठा, विद्यालये बंद  होती. वाहतूक व्यवस्थाही  जवळपास ठप्पच होती.  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांनी सर्व राजकीय पक्षांना  आवाहन केले आहे की, कोणीही दंगलग्रस्त भागात जाऊ नये. तथापि, डावे पक्ष, काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांनी या भागात जाण्याचा  प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी  त्यांना या भागात जाण्यापासून रोखले. (वृत्तसंस्था) भाजपा, डावे, काँग्रेसच्या नेत्यांना रोखले पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील २४ परगना जिल्ह्यात जाणाऱ्या भाजपा, डावे आणि काँग्रेसच्या नेत्यांना शुक्रवारी रोखण्यात आले. येथे जातीय संघर्षानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे. डाव्या पक्षाचे नेते सुजान चक्रबर्ती यांनी सांगितले की, या भागात गेल्याने समस्या निर्माण होऊ शकते, असे कारण देत आम्हाला त्या भागात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. दंगलग्रस्त भागातील लोकांना भेटण्यासाठी आम्ही जात होतो. पोलीस आणि तृणमूल काँग्रेसच्या विरोधात डावे पक्ष बरसात क्षेत्रात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधीर चौधरी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या एका पथकाला बारासातमध्ये रोखण्यात आले. रूपा गांगुलींना ताब्यात घेतले भाजपाच्या खासदार रूपा गांगुली यांच्या नेतृत्वात उत्तर २४ परगना जिल्ह्यात दंगलग्रस्त बदुरिया भागात जाणाऱ्या भाजपाच्या एका शिष्टमंडळाला पोलिसांनी माइकल नगरभागात अडविले. रूपा गांगुली यांच्यासह पक्षाच्या १९ नेत्यांना विमानतळाजवळून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. बदुरियाकडे जाण्यासाठी हे शिष्टमंडळ अडून बसल्याने त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. फेसबुकवर एका तरुणाने सोमवारी एक आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर बदुरिया आणि परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. पण, जमावाने त्याच्या घरावर हल्ला केला आणि वाहनांना आगी लावल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.