शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
3
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
4
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
5
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
6
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
7
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
8
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
9
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
10
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
11
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
12
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
13
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
14
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
15
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
16
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
17
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
18
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
19
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
20
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!

भारत  आणि पाकिस्तानमधील चर्चेसाठी पडद्याआडून हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:39 IST

काश्मीरमधील अशांतता आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पडद्याआडून हालचाली सुरू आहेत.

नवी दिल्ली, दि. 3 - काश्मीरमधील अशांतता आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पडद्याआडून हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संकेत मिळत आहेत. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले की भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा बंद झाली असली तरी सामाजिक क्षेत्रातील मंडळी अनौपचारिकपणे एकमेकांशी संवाद साधत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशातील प्रमुख व्यक्ती दुबईत भेटल्या होत्या त्यावेऴी दोन दिवसांच्या बैठकीमध्ये आपापल्या देशातील सरकारांना चर्चेसाठी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त पदावरून निरोप घेणारे अब्दुल बासित यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील सुरक्षा सल्लागार एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोन्ही देशातील संवाद सुरू व्हावा यासाठी अजित डोवाल आणि नासिर खान जंजुआ हे संपर्क ठेवून असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे एक भारतीय उद्योगपती दुसऱ्या स्तरावर चर्चा करत असल्याचे वृत्तही प्रसारित झाले होते.   मात्र परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे. पण दोन्ही देशांमधील चर्चेसाठी योग्य वातावरण तयार करण्याची जबाबदारी पाकिस्तानवर आहे. तसेच पाकिस्तानही भारतासोबत लवकरात लवकर चर्चा सुरू करण्यासाठी इच्छुक आहे. नियंत्रण रेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्हीकडच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रमाण घटले आहे.   दरम्यान आज संसदेत बोलताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा होणार नसल्याचे सांगितले होते. "दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिका आणि रशिया भारतासोबत उभे आहेत.  पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले पण दहशतवाद थांबवल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा अशक्य आहे,"असे स्वराज म्हणाल्या.