शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भारत  आणि पाकिस्तानमधील चर्चेसाठी पडद्याआडून हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:39 IST

काश्मीरमधील अशांतता आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पडद्याआडून हालचाली सुरू आहेत.

नवी दिल्ली, दि. 3 - काश्मीरमधील अशांतता आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पडद्याआडून हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संकेत मिळत आहेत. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले की भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा बंद झाली असली तरी सामाजिक क्षेत्रातील मंडळी अनौपचारिकपणे एकमेकांशी संवाद साधत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशातील प्रमुख व्यक्ती दुबईत भेटल्या होत्या त्यावेऴी दोन दिवसांच्या बैठकीमध्ये आपापल्या देशातील सरकारांना चर्चेसाठी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त पदावरून निरोप घेणारे अब्दुल बासित यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील सुरक्षा सल्लागार एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोन्ही देशातील संवाद सुरू व्हावा यासाठी अजित डोवाल आणि नासिर खान जंजुआ हे संपर्क ठेवून असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे एक भारतीय उद्योगपती दुसऱ्या स्तरावर चर्चा करत असल्याचे वृत्तही प्रसारित झाले होते.   मात्र परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे. पण दोन्ही देशांमधील चर्चेसाठी योग्य वातावरण तयार करण्याची जबाबदारी पाकिस्तानवर आहे. तसेच पाकिस्तानही भारतासोबत लवकरात लवकर चर्चा सुरू करण्यासाठी इच्छुक आहे. नियंत्रण रेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्हीकडच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रमाण घटले आहे.   दरम्यान आज संसदेत बोलताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा होणार नसल्याचे सांगितले होते. "दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिका आणि रशिया भारतासोबत उभे आहेत.  पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले पण दहशतवाद थांबवल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा अशक्य आहे,"असे स्वराज म्हणाल्या.