शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लाखो लोकांचे प्राण वाचवायचेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 04:08 IST

नवी दिल्ली : भारतात रस्ता अपघातात प्रतिवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत. मला त्यांचे प्राण वाचवायचे आहेत. लोकसभेत सुधारित मोटर व्हेइकल दुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे. नवा कायदा अस्तित्वात येण्यासाठी राज्यसभेत तो मंजूर होणे आवश्यक आहे. विरोधकांच्या काही विधायक सूचना असल्या तर त्या स्वीकारायला सरकार तयार आहे; मात्र कायदा तयार ...

नवी दिल्ली : भारतात रस्ता अपघातात प्रतिवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत. मला त्यांचे प्राण वाचवायचे आहेत. लोकसभेत सुधारित मोटर व्हेइकल दुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे. नवा कायदा अस्तित्वात येण्यासाठी राज्यसभेत तो मंजूर होणे आवश्यक आहे. विरोधकांच्या काही विधायक सूचना असल्या तर त्या स्वीकारायला सरकार तयार आहे; मात्र कायदा तयार होण्यास विलंब करू नका, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी पत्रपरिषदेत केले.पत्रपरिषदेत गडकरी म्हणाले, रस्ता अपघातांचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण देशात मोठ्या प्रमाणात (३0 टक्के) वाहनचालकांना बोगस परवाने देण्यात आले आहेत. २ हजार रुपये देऊन कोणालाही वाहन चालवण्याचा परवाना मिळतो आहे. नव्या कायद्याने हा प्रकार बंद होईल. सहजगत्या कोणालाही परवाना मिळणार नाही. त्यासाठी कठीण परीक्षा द्यावी लागेल, त्याचे मूल्यांकन संगणकामार्फत होईल. भ्रष्टाचाराला वाव नसेल. अपघातांची स्थिती चिंताजनक स्तरावर पोहोचल्याची जाणीव काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मांना मी करून दिली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींशी बोलल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीची मागणी त्यांनी केली. बहुधा बुधवारी ही बैठक होईल अशी शक्यता आहे. विधेयकातल्या तरतुदींवर आक्षेप असतील तर चर्चेतून मार्ग काढता येईल.