शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

४ मुलांसह आईची विहिरीत उडी; भय वाटले म्हणून स्वत: बाहेर पडली, ३ चिमुरड्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 09:51 IST

तिने तिच्या एका मुलीसह विहिरीच्या कडेला असणाऱ्या रस्सीला पकडून धरले आणि कसंबसं बाहेर आली

मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून रविवारी ३० वर्षीय महिलेने तिच्या ४ मुलांसह विहिरीत उडी मारली. यात ३ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महिला आणि तिची मुलगी वाचली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. महिला आणि मुलीवर तात्काळ उपचार करण्यात आले आहेत. 

भय वाटले म्हणून बाहेर आली महिलाजीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने ४ मुलांसह विहिरीत उडी मारली परंतु त्यानंतर महिलेला भय वाटले तेव्हा तिने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तिने तिच्या एका मुलीसह विहिरीच्या कडेला असणाऱ्या रस्सीला पकडून धरले आणि कसंबसं बाहेर आली. परंतु या घटनेत महिलेची तिन्ही मुले मृत पावली. ज्यात १८ महिन्याचा मुलगा, ३ वर्षाची मुलगी आणि ५ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ३ मृत मुलांचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. 

पतीसोबत झालं होतं भांडणपोलीस अधीक्षक राहुल कुमार म्हणाले की, ही घटना बुऱ्हानपूरच्या जिल्हा मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या बालदी गावात घडली. या महिलेचे नाव प्रमिला भिलाला असं आहे. या महिलेचे पती रमेशसोबत भांडण झाले होते. ज्यानंतर तिने हे टोकाचं पाऊल उचलले. सध्या प्रमिला आणि तिची ७ वर्षाची मुलगी दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जीविताला कुठलाही धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितले. 

पोलीस तपास सुरू प्रमिलाच्या घराशेजारी असलेल्या विहिरीतून ३ मृतदेह काढण्यात आले. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलेची कौटुंबिक पार्श्वभूमी पोलीस शोधत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल कुमार यांनी दिली. काही दिवसांपूर्वी बुऱ्हानपूरच्या नेपानगर डवाली खुर्द गावात एकाच कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्या केली होती. याठिकाणी घरात पती पत्नीसह ३ अल्पवयीन मुलांचा मृतदेह आढळला. हे सर्व मृत मुले १० वर्षापेक्षा कमी वयाचे होते. युवकाने पत्नी आणि मुलाच्या हत्येनंतर गळफास घेत आत्महत्या केली होती.