शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

४ मुलांसह आईची विहिरीत उडी; भय वाटले म्हणून स्वत: बाहेर पडली, ३ चिमुरड्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 09:51 IST

तिने तिच्या एका मुलीसह विहिरीच्या कडेला असणाऱ्या रस्सीला पकडून धरले आणि कसंबसं बाहेर आली

मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून रविवारी ३० वर्षीय महिलेने तिच्या ४ मुलांसह विहिरीत उडी मारली. यात ३ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महिला आणि तिची मुलगी वाचली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. महिला आणि मुलीवर तात्काळ उपचार करण्यात आले आहेत. 

भय वाटले म्हणून बाहेर आली महिलाजीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने ४ मुलांसह विहिरीत उडी मारली परंतु त्यानंतर महिलेला भय वाटले तेव्हा तिने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तिने तिच्या एका मुलीसह विहिरीच्या कडेला असणाऱ्या रस्सीला पकडून धरले आणि कसंबसं बाहेर आली. परंतु या घटनेत महिलेची तिन्ही मुले मृत पावली. ज्यात १८ महिन्याचा मुलगा, ३ वर्षाची मुलगी आणि ५ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ३ मृत मुलांचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. 

पतीसोबत झालं होतं भांडणपोलीस अधीक्षक राहुल कुमार म्हणाले की, ही घटना बुऱ्हानपूरच्या जिल्हा मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या बालदी गावात घडली. या महिलेचे नाव प्रमिला भिलाला असं आहे. या महिलेचे पती रमेशसोबत भांडण झाले होते. ज्यानंतर तिने हे टोकाचं पाऊल उचलले. सध्या प्रमिला आणि तिची ७ वर्षाची मुलगी दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जीविताला कुठलाही धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितले. 

पोलीस तपास सुरू प्रमिलाच्या घराशेजारी असलेल्या विहिरीतून ३ मृतदेह काढण्यात आले. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलेची कौटुंबिक पार्श्वभूमी पोलीस शोधत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल कुमार यांनी दिली. काही दिवसांपूर्वी बुऱ्हानपूरच्या नेपानगर डवाली खुर्द गावात एकाच कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्या केली होती. याठिकाणी घरात पती पत्नीसह ३ अल्पवयीन मुलांचा मृतदेह आढळला. हे सर्व मृत मुले १० वर्षापेक्षा कमी वयाचे होते. युवकाने पत्नी आणि मुलाच्या हत्येनंतर गळफास घेत आत्महत्या केली होती.