शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
4
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
5
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
6
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
7
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
8
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
9
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
10
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
11
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
12
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
13
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
14
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
15
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
16
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
17
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
18
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
19
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
20
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

नदीकिनारची सर्वाधिक प्रदूषित शहरे महाराष्ट्रात; पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:08 IST

गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र खातेच निर्माण केले असले तरी देशभरातील शेकडो शहरे प्रदूषित नद्यांच्या विळख्यात आहेत.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र खातेच निर्माण केले असले तरी देशभरातील शेकडो शहरे प्रदूषित नद्यांच्या विळख्यात आहेत. अशा शहरांची संख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. नदीकिनारी असलेल्या प्रदूषित विभागांची सर्वाधिक संख्याही महाराष्ट्रातच आहे. या नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याचे परिणाम दीड ते दोन वर्षांत दिसतील असे सरकारचे म्हणणे आहे.पर्यावरण मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात प्रदूषित नद्यांच्या तीरावर वसलेल्या शहरांची संख्या ६५० असून, त्यातील १६१ शहरे महाराष्ट्रात आहेत. एकूण २७५ नद्यांच्या सर्वाधिक प्रदूषित ३०२ विभागांची यादी तयार करण्यात आली असून, त्यातील ४९ विभाग महाराष्ट्रात आहेत. राज्यातील प्रदूषित नद्यांमध्ये बाणगंगा, गोदावरी, भीमा, कृष्णा, उल्हास, कुंडलिका, तापी, गिरणा, पंचगंगा, नीरा, रंगावली, इंद्रायणी, मिठी, वशिष्ठी, अंबा, अमरावती, बिंदुसरा, धारणा, हिवरा, मोर, मोरणा, मुळा, मुठा, पवना, पूर्णा यांचा समावेश आहे.कृती आराखडानद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्रालय एक आराखडा तयार करत आहे. नागपूर, नाशिक व नांदेडमध्ये त्यादृष्टीने कामास सुरुवात झाली आहे. सांडपाणी नदीत सोडले जाण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारले जात आहेत.नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महाराष्ट्रात २५० ठिकाणी निरीक्षण केंद्रे स्थापन केली आहेत.या केंद्रांकडून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुळा-मुठा, गोदावरी, तापी, नीरा, भातसा या नद्यांमधील प्रदूषणाची पातळी जरा कमी झाली आहे. त्यामुळे साहजिकच या नद्यांतील पाण्याची गुणवत्ता वाढली आहे.मुंबई सर्वाधिक प्रदूषितनदीकिनारच्या सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये मुंबई, पुणे, नांदेड, अकोला, नागपूर, सांगली, अमरावती, कल्याण, पनवेल यांचा समावेश आहे. राज्यातील ज्या ४९ ठिकाणी नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत त्यातील २४ ठिकाणी नद्यांचा प्रवाह अतिशय धीमा आहे. त्यामुळे प्रदूषणाला दूर करण्याची नदीची क्षमताच संपल्यात जमा आहे. उद्योगांचे सांडपाणी नदीत सोडण्यात येते. कचराही टाकण्यात येतो. त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे.