शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

नदीकिनारची सर्वाधिक प्रदूषित शहरे महाराष्ट्रात; पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:08 IST

गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र खातेच निर्माण केले असले तरी देशभरातील शेकडो शहरे प्रदूषित नद्यांच्या विळख्यात आहेत.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र खातेच निर्माण केले असले तरी देशभरातील शेकडो शहरे प्रदूषित नद्यांच्या विळख्यात आहेत. अशा शहरांची संख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. नदीकिनारी असलेल्या प्रदूषित विभागांची सर्वाधिक संख्याही महाराष्ट्रातच आहे. या नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याचे परिणाम दीड ते दोन वर्षांत दिसतील असे सरकारचे म्हणणे आहे.पर्यावरण मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात प्रदूषित नद्यांच्या तीरावर वसलेल्या शहरांची संख्या ६५० असून, त्यातील १६१ शहरे महाराष्ट्रात आहेत. एकूण २७५ नद्यांच्या सर्वाधिक प्रदूषित ३०२ विभागांची यादी तयार करण्यात आली असून, त्यातील ४९ विभाग महाराष्ट्रात आहेत. राज्यातील प्रदूषित नद्यांमध्ये बाणगंगा, गोदावरी, भीमा, कृष्णा, उल्हास, कुंडलिका, तापी, गिरणा, पंचगंगा, नीरा, रंगावली, इंद्रायणी, मिठी, वशिष्ठी, अंबा, अमरावती, बिंदुसरा, धारणा, हिवरा, मोर, मोरणा, मुळा, मुठा, पवना, पूर्णा यांचा समावेश आहे.कृती आराखडानद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्रालय एक आराखडा तयार करत आहे. नागपूर, नाशिक व नांदेडमध्ये त्यादृष्टीने कामास सुरुवात झाली आहे. सांडपाणी नदीत सोडले जाण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारले जात आहेत.नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महाराष्ट्रात २५० ठिकाणी निरीक्षण केंद्रे स्थापन केली आहेत.या केंद्रांकडून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुळा-मुठा, गोदावरी, तापी, नीरा, भातसा या नद्यांमधील प्रदूषणाची पातळी जरा कमी झाली आहे. त्यामुळे साहजिकच या नद्यांतील पाण्याची गुणवत्ता वाढली आहे.मुंबई सर्वाधिक प्रदूषितनदीकिनारच्या सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये मुंबई, पुणे, नांदेड, अकोला, नागपूर, सांगली, अमरावती, कल्याण, पनवेल यांचा समावेश आहे. राज्यातील ज्या ४९ ठिकाणी नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत त्यातील २४ ठिकाणी नद्यांचा प्रवाह अतिशय धीमा आहे. त्यामुळे प्रदूषणाला दूर करण्याची नदीची क्षमताच संपल्यात जमा आहे. उद्योगांचे सांडपाणी नदीत सोडण्यात येते. कचराही टाकण्यात येतो. त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे.