शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

नदीकिनारची सर्वाधिक प्रदूषित शहरे महाराष्ट्रात; पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:08 IST

गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र खातेच निर्माण केले असले तरी देशभरातील शेकडो शहरे प्रदूषित नद्यांच्या विळख्यात आहेत.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र खातेच निर्माण केले असले तरी देशभरातील शेकडो शहरे प्रदूषित नद्यांच्या विळख्यात आहेत. अशा शहरांची संख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. नदीकिनारी असलेल्या प्रदूषित विभागांची सर्वाधिक संख्याही महाराष्ट्रातच आहे. या नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याचे परिणाम दीड ते दोन वर्षांत दिसतील असे सरकारचे म्हणणे आहे.पर्यावरण मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात प्रदूषित नद्यांच्या तीरावर वसलेल्या शहरांची संख्या ६५० असून, त्यातील १६१ शहरे महाराष्ट्रात आहेत. एकूण २७५ नद्यांच्या सर्वाधिक प्रदूषित ३०२ विभागांची यादी तयार करण्यात आली असून, त्यातील ४९ विभाग महाराष्ट्रात आहेत. राज्यातील प्रदूषित नद्यांमध्ये बाणगंगा, गोदावरी, भीमा, कृष्णा, उल्हास, कुंडलिका, तापी, गिरणा, पंचगंगा, नीरा, रंगावली, इंद्रायणी, मिठी, वशिष्ठी, अंबा, अमरावती, बिंदुसरा, धारणा, हिवरा, मोर, मोरणा, मुळा, मुठा, पवना, पूर्णा यांचा समावेश आहे.कृती आराखडानद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्रालय एक आराखडा तयार करत आहे. नागपूर, नाशिक व नांदेडमध्ये त्यादृष्टीने कामास सुरुवात झाली आहे. सांडपाणी नदीत सोडले जाण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारले जात आहेत.नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महाराष्ट्रात २५० ठिकाणी निरीक्षण केंद्रे स्थापन केली आहेत.या केंद्रांकडून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुळा-मुठा, गोदावरी, तापी, नीरा, भातसा या नद्यांमधील प्रदूषणाची पातळी जरा कमी झाली आहे. त्यामुळे साहजिकच या नद्यांतील पाण्याची गुणवत्ता वाढली आहे.मुंबई सर्वाधिक प्रदूषितनदीकिनारच्या सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये मुंबई, पुणे, नांदेड, अकोला, नागपूर, सांगली, अमरावती, कल्याण, पनवेल यांचा समावेश आहे. राज्यातील ज्या ४९ ठिकाणी नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत त्यातील २४ ठिकाणी नद्यांचा प्रवाह अतिशय धीमा आहे. त्यामुळे प्रदूषणाला दूर करण्याची नदीची क्षमताच संपल्यात जमा आहे. उद्योगांचे सांडपाणी नदीत सोडण्यात येते. कचराही टाकण्यात येतो. त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे.