शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
5
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
6
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
7
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
8
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
9
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
10
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
11
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
12
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
13
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
14
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
15
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
17
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
18
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
19
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
20
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?

इंदू सरकारमधील बहुतांश भाग काल्पनिक - मधुर भांडारकर

By admin | Updated: July 13, 2017 17:52 IST

या चित्रपटातील बहुतांश भाग काल्पनिक असल्याचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सांगितले आहे.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 13 - गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोव-यात अडकलेल्या इंदू सरकार या चित्रपटात डिस्क्लेमर (जाहीर निवेदन) देण्यात येणार आहे. तसेच, या चित्रपटातील बहुतांश भाग काल्पनिक असल्याचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सांगितले आहे. 
इंदू सरकार या चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी येथील पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, मी इंदू सरकार चित्रपटात डिस्क्लेमर देत असून यामध्ये चित्रपटातील अनेक घटना ह्या काल्पनिक आहेत, असे सांगण्यात येणार आहे.  
मी याधी सुद्धा सांगितले आहे की, या चित्रपटातील कथानक जवळपास 70 टक्के भाग काल्पनिक आहे, तर 30 भाग वास्तविक आहे. त्यामुळे यासंदर्भात या चित्रपटात डिस्क्लेमर दाखविले जाणार आहे.
तसेच, चित्रपटाचे निर्माते म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या वादामुळे इंदू सरकार चित्रपटाची खरी कहाणी गायब होत आहे. इंदु सरकारमधील कहानी ही आणीबाणीत अडकलेल्या पती-पत्नीच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट राजकारणावर नाही. याचबरोबर संजय गांधी यांची मुलगी आहे, असा दावा करणा-या एका महिलेने कायदेशीर नोटीस पाठविल्याप्रकरणी दिग्दर्शक मधुर भंडारकर म्हणाले की, त्या नोटीसला औपचारिकरित्या उत्तर देण्यात येईल. 
दरम्यान, दुसरीकडे, इंदू सरकार या चित्रपटातील 14 सीन्स कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाविरोधात मधुर भांडारकर रिवाइज कमिटीकडे जाणार असल्याचे समजते. इंदू सरकार चित्रपटातील काही संवादांनाही काढून टाकण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने चित्रपट दिग्दर्शकाला केली असून यामध्ये "भारत की एक बेटी ने देश को बंदी बनाया हुआ है", "और तुम लोग जिंदगीभर मॉं-बेटे की गुलामी करते रहोगे", असे संवाद आहे. तर, प्राइम मिनिस्टर, इंटेलिजन्स ब्युरो, किशोर कुमार असे काही शब्द गाळण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दिग्दर्शक मधूर भांडारकर यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले होते की सेन्सॉर बोर्डाने आपले काम केले. त्यांनी यामध्ये केलेल्या काही सूचना मला मान्य नाहीत. त्यामुळे मी रिवाइजल कमिटीपुढे जाणार असल्याचे  सांगितले होते. 
 
आणीबाणीवर आधारित या चित्रपटात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या भूमिका दाखवण्यात आल्या असल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला असून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी चित्रपट रिलीज होण्याआधी आम्हाला दाखवण्यात यावा अशी मागणी केली आहे. याचबरोबर या चित्रपटाची कथा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस नेते स्व. संजय गांधी यांच्या जीवनाशी संबंधीत असल्याचे दिसून येते. परंतु, सदरहू चित्रपटामध्ये वस्तुस्थितीशी विसंगत अशा पद्धतीने काही घटनांचे सादरीकरण असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्याची शंका खरी ठरली तर प्रेक्षकांच्या भावना दुखावून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
इंदू सरकार हा चित्रपट 1975 च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. या चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात 21 महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.
याचबरोबर इंदू सरकार हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.