शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

इंदू सरकारमधील बहुतांश भाग काल्पनिक - मधुर भांडारकर

By admin | Updated: July 13, 2017 17:52 IST

या चित्रपटातील बहुतांश भाग काल्पनिक असल्याचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सांगितले आहे.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 13 - गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोव-यात अडकलेल्या इंदू सरकार या चित्रपटात डिस्क्लेमर (जाहीर निवेदन) देण्यात येणार आहे. तसेच, या चित्रपटातील बहुतांश भाग काल्पनिक असल्याचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सांगितले आहे. 
इंदू सरकार या चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी येथील पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, मी इंदू सरकार चित्रपटात डिस्क्लेमर देत असून यामध्ये चित्रपटातील अनेक घटना ह्या काल्पनिक आहेत, असे सांगण्यात येणार आहे.  
मी याधी सुद्धा सांगितले आहे की, या चित्रपटातील कथानक जवळपास 70 टक्के भाग काल्पनिक आहे, तर 30 भाग वास्तविक आहे. त्यामुळे यासंदर्भात या चित्रपटात डिस्क्लेमर दाखविले जाणार आहे.
तसेच, चित्रपटाचे निर्माते म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या वादामुळे इंदू सरकार चित्रपटाची खरी कहाणी गायब होत आहे. इंदु सरकारमधील कहानी ही आणीबाणीत अडकलेल्या पती-पत्नीच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट राजकारणावर नाही. याचबरोबर संजय गांधी यांची मुलगी आहे, असा दावा करणा-या एका महिलेने कायदेशीर नोटीस पाठविल्याप्रकरणी दिग्दर्शक मधुर भंडारकर म्हणाले की, त्या नोटीसला औपचारिकरित्या उत्तर देण्यात येईल. 
दरम्यान, दुसरीकडे, इंदू सरकार या चित्रपटातील 14 सीन्स कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाविरोधात मधुर भांडारकर रिवाइज कमिटीकडे जाणार असल्याचे समजते. इंदू सरकार चित्रपटातील काही संवादांनाही काढून टाकण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने चित्रपट दिग्दर्शकाला केली असून यामध्ये "भारत की एक बेटी ने देश को बंदी बनाया हुआ है", "और तुम लोग जिंदगीभर मॉं-बेटे की गुलामी करते रहोगे", असे संवाद आहे. तर, प्राइम मिनिस्टर, इंटेलिजन्स ब्युरो, किशोर कुमार असे काही शब्द गाळण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दिग्दर्शक मधूर भांडारकर यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले होते की सेन्सॉर बोर्डाने आपले काम केले. त्यांनी यामध्ये केलेल्या काही सूचना मला मान्य नाहीत. त्यामुळे मी रिवाइजल कमिटीपुढे जाणार असल्याचे  सांगितले होते. 
 
आणीबाणीवर आधारित या चित्रपटात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या भूमिका दाखवण्यात आल्या असल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला असून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी चित्रपट रिलीज होण्याआधी आम्हाला दाखवण्यात यावा अशी मागणी केली आहे. याचबरोबर या चित्रपटाची कथा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस नेते स्व. संजय गांधी यांच्या जीवनाशी संबंधीत असल्याचे दिसून येते. परंतु, सदरहू चित्रपटामध्ये वस्तुस्थितीशी विसंगत अशा पद्धतीने काही घटनांचे सादरीकरण असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्याची शंका खरी ठरली तर प्रेक्षकांच्या भावना दुखावून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
इंदू सरकार हा चित्रपट 1975 च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. या चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात 21 महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.
याचबरोबर इंदू सरकार हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.