शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

उघड्यावर शौच करणारे भारतात सर्वाधिक

By admin | Updated: November 20, 2014 02:06 IST

उघड्यावर शौच करणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) एका अहवालात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ : उघड्यावर शौच करणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) एका अहवालात म्हटले आहे. उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या भारतात ५९७ दशलक्ष असून हे आव्हान पेलण्यासाठी उच्चकोटीच्या राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असल्याचेही युनोने सांगितले. २०१९ पर्यंत देशाला पाणंदमुक्त करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली प्रतिज्ञा ही महात्मा गांधी यांचा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणणारी महत्त्वाकांक्षा आहे. बापूजींनी स्वातंत्र्याहून स्वच्छता महत्त्वाची असल्याचा नारा दिला होता. जगभरातील एक अब्ज नागरिक स्वच्छतागृहाचा वापर करत नाहीत. या अब्जापैकी ८२ टक्के नागरिक म्हणजेच ८२५ दशलक्ष लोक केवळ दहा देशांतील आहेत, असे संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितले.जागतिक स्वच्छतागृह दिनानिमित्त हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक म्हणजे ५९७ दशलक्ष आहे. हे प्रमाण देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ४७ टक्के आहे. भारतापाठोपाठ इंडोनेशिया (५४ दशलक्ष), पाकिस्तान (४१ दशलक्ष), नेपाळ (११ दशलक्ष) आणि चीन (१० दशलक्ष) असा क्रम लागतो. स्वच्छतागृहाचा वापर न करणारे इतर पाच देश आफ्रिकेतील असून त्यात नायजेरिया, इथिओपिया, सुदान, नायजर आणि मोझाम्बिक यांचा समावेश आहे. उघड्यावर शौचाचे प्रचलन थांबविण्यासाठी धार्मिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी पुढे येऊन सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही युनोने केले. हे आव्हान पेलण्यासाठी उच्चकोटीच्या राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे आम्हाला ठाऊक आहे. पंतप्रधान मोदींनी पाणंदमुक्तीसाठी देशात १११ दशलक्ष स्वच्छतागृहे उभारण्याची प्रतिज्ञा केली आहे. (वृत्तसंस्था)