शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भारत-चीन सीमेवरील अतिमहत्वाचा पूल पडला; आर्मी, आयटीबीपीच्या जवानांची ये-जा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 08:36 IST

आता नदी उफाळलेली असल्य़ाने पावसाळा संपल्यावरच पुन्हा या पुलाचे निर्माण करता येणार आहे.

डेहराडून: उत्तरकाशी जिल्ह्यातील चोरगड नदीवरील बेली पूल अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. हा पूल आयटीबीपीसाठी महत्वाचा असल्य़ाने खळबळ उडाली आहे. 

गंगोत्री नॅशनल पार्क (GNP) च्या नेलॉन्ग व्हॅली परिसरातील हा पूल भारतीय लष्कर आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांसाठी खूप महत्वाचा होता. उत्तरकाशीला हिमाचल प्रदेशमार्गे भारत-चीन सीमेला जोडणारा हा पूल आहे. याचा वापर भारत-चीन सीमेवर गस्तीसाठी केला जात होता. तसेच वनरक्षक आणि स्थानिक मेंढपाळही या पुलाचा वापर करतात.

आता नदी उफाळलेली असल्य़ाने पावसाळा संपल्यावरच पुन्हा या पुलाचे निर्माण करता येणार आहे. चोरगड नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल काही दिवसांपूर्वी कोसळला होता. पुलाच्या पुनर्बांधणीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सोबतच प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे, असे जीएनपीचे उपसंचालक आर.एन.पांडे यांनी सांगितले. 

बेली ब्रिज कोसळल्यामुळे चीन सीमेवर लष्कर आणि आयटीबीपीला जाण्यास खूप अडचण येऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन स्तरावरून सार्वजनिक बांधकाम विभाग भटवाडी यांना पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मुल्यांकन करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पूल जलदगतीने तयार करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीन