शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

बँकांचे सर्वाधिक घोटाळे महाराष्ट्रात; घोटाळ्यांमुळे दररोज १०० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 09:07 IST

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : मागील सात वर्षांपासून बँक घोटाळ्यांतील रक्कम कमी कमी होत असली तरी भारताला दररोज १०० कोटी रुपये या घोटाळ्यांमुळे गमवावे लागत आहेत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रातील बँकांत सर्वाधिक घोटाळे झाले आहेत. घोटाळ्यात अडकलेल्या एकूण पैशांपैकी ५० टक्के पैसा महाराष्ट्रातील बँक शाखांतील आहे. त्याखालोखाल दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. या पाच राज्यांत मिळून दोन लाख कोटी रुपये बँक घोटाळ्यात अडकले आहेत. देशातील एकूण बँक घोटाळ्यांच्या तुलनेत हे प्रमाण ८३ टक्के आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत देशात २.५ लाख कोटी रुपयांचे बँक घोटाळे उघडकीस आले आहेत. वित्त मंत्रालयाने म्हटले की, घोटाळ्यांची तत्पर माहिती आणि प्रतिबंध यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी घोटाळ्यातील रक्कम कमी कमी होत आहे.घोटाळ्याचे अनेक मार्गरिझर्व्ह बँकेने घोटाळ्यांची ८ प्रकारांत विभागणी केली आहे. हे घोटाळे बनावट साधने वापरणे, खात्यात फेरफार करणे, खोटी खाती तयार करणे, मालमत्तांचे रुपांतरण, अवैध कर्ज सुविधा, अवैध वरदहस्त, हलगर्जीपणा, फसवणूक, बनावट दस्तावेज, विदेशी चलन व्यवहारांतील अनियमितता अशा अनेक मार्गांनी करण्यात आले आहेत.असे बुडाले पैसे२०१५-१६  ६७,७६० कोटी रुपये२०१६-१७  ५९,९६६.४ कोटी रुपये२०१९-२०     २७,६९८.४ कोटी रुपये२०२०-२१     १०,६९९.९ कोटी रुपये२०२१-२२    ६४७.९ कोटी रुपये(पहिले ९ महिने) 

टॅग्स :fraudधोकेबाजी