शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

बँकांचे सर्वाधिक घोटाळे महाराष्ट्रात; घोटाळ्यांमुळे दररोज १०० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 09:07 IST

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : मागील सात वर्षांपासून बँक घोटाळ्यांतील रक्कम कमी कमी होत असली तरी भारताला दररोज १०० कोटी रुपये या घोटाळ्यांमुळे गमवावे लागत आहेत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रातील बँकांत सर्वाधिक घोटाळे झाले आहेत. घोटाळ्यात अडकलेल्या एकूण पैशांपैकी ५० टक्के पैसा महाराष्ट्रातील बँक शाखांतील आहे. त्याखालोखाल दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. या पाच राज्यांत मिळून दोन लाख कोटी रुपये बँक घोटाळ्यात अडकले आहेत. देशातील एकूण बँक घोटाळ्यांच्या तुलनेत हे प्रमाण ८३ टक्के आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत देशात २.५ लाख कोटी रुपयांचे बँक घोटाळे उघडकीस आले आहेत. वित्त मंत्रालयाने म्हटले की, घोटाळ्यांची तत्पर माहिती आणि प्रतिबंध यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी घोटाळ्यातील रक्कम कमी कमी होत आहे.घोटाळ्याचे अनेक मार्गरिझर्व्ह बँकेने घोटाळ्यांची ८ प्रकारांत विभागणी केली आहे. हे घोटाळे बनावट साधने वापरणे, खात्यात फेरफार करणे, खोटी खाती तयार करणे, मालमत्तांचे रुपांतरण, अवैध कर्ज सुविधा, अवैध वरदहस्त, हलगर्जीपणा, फसवणूक, बनावट दस्तावेज, विदेशी चलन व्यवहारांतील अनियमितता अशा अनेक मार्गांनी करण्यात आले आहेत.असे बुडाले पैसे२०१५-१६  ६७,७६० कोटी रुपये२०१६-१७  ५९,९६६.४ कोटी रुपये२०१९-२०     २७,६९८.४ कोटी रुपये२०२०-२१     १०,६९९.९ कोटी रुपये२०२१-२२    ६४७.९ कोटी रुपये(पहिले ९ महिने) 

टॅग्स :fraudधोकेबाजी