शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

गारपिटीचा बाराशे शेतकर्‍यांना फटका

By admin | Updated: December 31, 2014 18:58 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ जिल्‘ातील कोपरगाव, राहाता आणि पारनेर तालुक्यातील ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, गारपिटीचा १ हजार २६५ शेतकर्‍यांना फटका बसला आहे़ सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक मदतीस हे शेतकरी पात्र होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़

अहमदनगर: अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता आणि पारनेर तालुक्यातील ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, गारपिटीचा १ हजार २६५ शेतकर्‍यांना फटका बसला आहे़ सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक मदतीस हे शेतकरी पात्र होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़ जिल्ह्यात ११ व १२ डिसेंबर रोजी अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली़ या गारपिटीमुळे तीन तालुक्यातील कांदा, गहू, हरभरा, ज्वारी, मका, द्राक्ष, बोर, डाळिंब, चिकू आणि पपई, यासारखी पिके भुईसपाट झाली़ इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ त्यामुळे शासनाने गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर केली़ गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाने मागविला आहे़ जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील १ हजार २६५ शेतकर्‍यांच्या ५१६ हेक्टरील पिकांचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे़ तर ५० टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची संख्या ४ हजार २९७ इतकी आहे़ परंतु केवळ ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाच आर्थिक मदत मिळते, असा प्रशासनाचा अनुभव आहे़ त्यामुळे सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मदतीबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे़़़़अशी आहे आर्थिक मदत (प्रति हेक्टर)जिरायती- १० हजार, बागायती- १५ हजार, फळबाग-२५ हजार ़़़कुठे किती नुकसान५० टक्केपेक्षा अधिककोपरगावबाधित क्षेत्र- ११७शेतकरी- २७३़़़राहाताबाधित क्षेत्र-३९९़५०शेतकरी- ९९२़़़५० टक्केपेक्षा कमीकोपरगावक्षेत्र-८७१़७१शेतकरी-९६२़़़़राहाताक्षेत्र-८१४़५०शेतकरी-२६७़़़पारनेरक्षेत्र-१९०४शेतकरी-३०६८