शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
2
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
3
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
4
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
5
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
6
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
7
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधि; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
8
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
9
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
10
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
11
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
12
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
13
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
14
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
15
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
16
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
17
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
18
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
19
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
20
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

साहित्यिकांचे निषेधस्वर अधिक ‘तीव्र’

By admin | Updated: October 11, 2015 23:37 IST

वाढता जातीय तणाव, हिंसक घटना तसेच पुरोगामी विचारवंत प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ अनेक नामवंत

नवी दिल्ली/ बंगळुरू/ चंदीगड : वाढता जातीय तणाव, हिंसक घटना तसेच पुरोगामी विचारवंत प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ अनेक नामवंत साहित्यिकांनी निषेधास्त्र उगारले असतानाच रविवारी साहित्य अकादमी फेलोशिपने गौरविण्यात आलेल्या हिंदीच्या नामवंत लेखिका कृष्णा सोबती यांच्यासह पंजाबचे गुरबचन भुल्लर, अजमेरसिंह औलख आणि आत्मजित सिंह या तीन दिग्गज साहित्यिकांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला, तर सुप्रसिद्ध कन्नड लेखक अरविंद मलगट्टी यांनी साहित्य अकादमीच्या सामान्य परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.याचदरम्यान साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी एक निवेदन जारी करून साहित्य संस्था अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पुरस्कर्ती असल्याचे सांगत कुठलाही लेखक वा कलाकारावरील हल्ल्याची साहित्य अकादमी निंदा करते, असे स्पष्ट केले.देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात मलगट्टी यांनी रविवारी अकादमीच्या पदाचा राजीनामा दिला. मी साहित्य अकादमीच्या सामान्य परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध व यावर अकादमीने बाळगलेले मौन या विरोधात मी राजीनामा दिला आहे. यापूर्वी ज्येष्ठ लेखिका आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची भाची नयनतारा सेहगल आणि प्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी यांनी दादरीतील घटना आणि पंतप्रधानांच्या मौनावर नाराजी व्यक्त करीत पुरस्कार परत केले होते. त्यानंतर प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ लेखिका पद्मश्री शशी देशपांडे यांनी अकादमीच्या परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हिंदी नाटककार उदय प्रकाश तसेच सहा कन्नड लेखकांनीही आपले पुरस्कार परत केले आहेत.