शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महिना उलटला ‘अच्छे दिन’ कधी येणार ?

By admin | Updated: June 27, 2014 02:10 IST

महागाईवर नियंत्रण आणण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलायचे झाल्यास हा एक महिन्याचा काळ अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो.

मोठे आव्हान : काळा पैसा परत आणणो, रेल्वे अपघात, महागाई रोखणो; मोदींनी आणली नवी कार्यसंस्कृती
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
कोणत्याही नव्या सरकारसाठी एक महिन्याचा काळ पुरेसा ठरत नाही मात्र ‘अच्छे दिन’ आणि महागाईवर नियंत्रण आणण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलायचे झाल्यास हा एक महिन्याचा काळ अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो.
26 मे रोजी सहका:यांसोबत मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन महिना उलटला आहे. ‘अच्छे दिन’ मान्सूनच्या ढगांसारखे दूरवर कुठेही दिसत नाहीत. पण या एक महिन्यात मोदींनी नव्या कार्यसंस्कृतीची चुणूक दाखविली. ‘किमान शासन अधिक प्रशासना’वर भर देत संपुआ सरकारच्या काळातील सर्व मंत्रिगट, जीओएम, इजीओएम विसजिर्त करीत सर्व मंत्रलयांना आपापल्या खात्यांसंबंधी निर्णय स्वत:च घेण्याचा आदेश दिला. त्यांनी नोकरशहांना कामगिरी दाखवावी लागेल असेच बजावले आहे. त्याचा परिणाम दिसू लागला आहे. अधिकारी, बाबू(लिपिक) आता सकाळी लवकर कार्यालयात पोहोचतात. उशिरार्पयत काम करतानाचे चित्र बघायला मिळते. मंत्री आणि खासदारांचे खासगी सचिव आणि सहायकांच्या नियुक्तीत भाई-भतीजावाद बाजूला सारला. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणा:या मोदींनी प्रत्यक्षात काँग्रेसमुक्त शासनाची सुरुवात केली आहे. संपुआ सरकारच्या काळातील राज्यपालांवर राजीनाम्यासाठी दबाव आणला जात आहे. विविध आयोग आणि मंडळांवरील काँग्रेस नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. योजना आयोगाच्या भूमिकेवर मंथन सुरू आहे. संपुआ सरकारमधील सचिव, खासगी सचिवांना स्टाफमध्ये जागा राहणार नाही. त्याचा फटका खुद्द गृहमंत्री राजनाथसिंग यांना बसला. माजी विदेशमंत्री सलमान खुर्शीद यांचे खासगी सचिव राहिलेले आलोक सिंग यांची नियुक्ती करण्याच्या विचारात होते. अनेक मंत्र्यांनाही आपल्या आवडत्या अधिका:यांना सहायक बनविता येऊ शकले नाही.
मंत्र्यांची चुप्पी..
गुप्तचर विभागाच्या मदतीने अधिका:यांचे डोङिायर तयार आहे. सचिव स्तरावरील अधिका:यांना निर्णयात कोणतीही अडचण येणार नाही असा संदेश देण्यात आला आहे. अधिका:यांना थेट पंतप्रधानांना माहिती देण्याचे अधिकार देण्यात आल्याची बाब मंत्र्यांच्या पचनी पडलेली नाही. नगरविकास आणि संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनाच सरकारकडून बोलण्याचा अधिकार आहे. केवळ कॅबिनेटमंत्र्यांनाच आपल्या मंत्रलयाविषयी माहिती देता येईल, असा आदेश असल्यामुळे एक अदृश्य भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
काही कडू, काही गोड; गॅस, रॉकेल दरवाढ तूर्त स्थगित
4नर्मदा नदीवरील सरदार सरोवराची उंची 17 मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला त्यामुळे विजेचा प्रश्न सोडविण्यात मदत होईल पण मध्य प्रदेश आणि गुजरातमधील आदिवासी भाग बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
4निवृत्त न्यायाधीश एम.बी.शाह यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना. काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन. भ्रष्टाचार निपटण्यासाठी पारदर्शकतेवर भर पण मोठी मजल गाठायची आहे.
4रेल्वेचे अपघात रोखण्याचे मोठे आव्हान आहे. मोदी सरकारने शपथ घेतली त्याच दिवशी संत कबीरनगर येथे गोरखनाथ एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात 27 प्रवासी ठार झाले. नुकताच डिब्रुगड- दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला अपघात झाला आहे.
4रेल्वे भाडेवाढ आणि साखरेचे वाढलेले दर पाहता सरकारने गॅस, सीएनजी, पाईपद्वारे पुरविला जाणारा गॅस आणि रॉकेलची दरवाढ तूर्तास थांबविली आहे.
4परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्तेबांधणीला वेग देताना सीमा रस्ते संघटनेच्या(बीआरओ) कामावर नाराजी व्यक्त करीत या संघटनेकडून काम काढून घेतले आहे.
 
रेल्वेची भाडेवाढ
4मोदी सरकारने रेल्वे प्रवास आणि मालभाडय़ात अनुक्रमे 14.2 आणि 6.5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी कडू गोळीची गरज आहे, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमुळे शिवसेनेने आणलेला दबाव पाहता सरकारला 8क् कि.मी.र्पयत द्वितीय श्रेणीचे प्रवासभाडे जुन्याच दराने कायम ठेवणो भाग पडले.