शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

राज्यात शेतकऱ्याचे मासिक उत्पन्न ७,३८६ रुपये

By admin | Updated: June 9, 2017 06:01 IST

उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भाजप सरकारच्या गळ््याला फासासारखे ठरले आहे.

नितीन अग्रवाल। लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकऱ्यांना पिकाला ते घेण्यास आलेल्या खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भाजप सरकारच्या गळ््याला फासासारखे ठरले आहे. परंतु सरकारकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतीही योजना नाही, असे कृषी मंत्रालयाकडील अधिकृत दस्तावेजावरून म्हणता येते. हा दस्तावेज ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे.कृषी मंत्रालयाच्या सूत्रानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची सगळी जबाबदारी राज्य सरकारांची आहे. तथापि, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज, कीटकनाशके, खते, शेतीची अवजारे आणि कृषी कर्ज दिले जाते. याशिवाय सवलतीच्या दरात पीक विम्याची सोयही आहे.महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पिकांना किमान हमी भाव मिळण्यासाठी सुरू असलेली आंदोलने सरकार राजकीय कट म्हणत असले तरी प्रत्यक्षात जबाबदारी झटकत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की शेतकऱ्याची अवस्था दयनीय आहे. केंद्र सरकारकडून वेगवेगळ््या योजना राबवण्यासाठी राष्ट्रीय नमुना पाहणी करण्यात आली. त्यानुसार शेतकरी शेतीतून दररोज १३५ रुपयेच कमावतो. ही कमाई अकुशल कामगाराला मिळणाऱ्या मजुरीपेक्षाही कमीच आहे. पाहणीत शेतकऱ्याचे कुटुंब दरमहा सरासरी ६ हजार ४२६ रुपये कमावते. यात त्याला पिकापासून ४ हजार ७४ रुपयेच मिळतात. याशिवाय पशूपालनातून २३८ रुपये तो कमावतो. इतर शेती कामांतून तो जवळपास ७० रुपये व शेतीतर कामातून ३०२ रुपये कमावतो. याशिवाय अतिरिक्त मजुरी करून तो उत्पन्नात १,४१३ रुपये आणि इतर आर्थिक कामे करून तो ३२८ रुपयांची भर घालतो. वर्ष २०१४ च्या शेवटी प्रसिद्ध केलेल्या या आकडेवारीनुसार शेतकरी कुटुंबाचा खर्च दरमहा ६ हजार २२३ रुपये दाखवण्यात आला आहे.कृषी मंत्रालयाने संसदेत नुकतीच ही वस्तुस्थिती मान्य केली की शेतीतून रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. गेल्या दशकात कृषी क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या १२ टक्क्यांनी वाढली. २००१ मध्ये २३४.१ दशलक्ष लोक शेतीत काम करीत होते तर २०११ मध्ये ती संख्या २६३.१ दशलक्ष झाली.>कृषी क्षेत्रातील रोजगारात वाढमहाराष्ट्रातील शेतकरी दरमहा ७ हजार ३८६ रुपये कमावतो. पंजाबच्या शेतकऱ्याचे हेच उत्पन्न १८ हजार ५९ रुपये आहे. यानंतर हरयाना (१४,४३४ रुपये) जम्मू-काश्मीर (१२,६८३), केरळ (११,८८८) आणि मेघालयातील (११७९२) शेतकरी आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी दरमहा सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा थोडेसे जास्त ७,३८६ रुपये कमावतो. मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याचे सरासरी उत्पन्न ६ हजार २१० रुपये आहे.कृषी मंत्रालयाने संसदेत ही वस्तुस्थिती मान्य केली की शेतीतून रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या दशकात कृषी क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या १२ टक्क्यांनी वाढली. २००१ मध्ये २३४.१ दशलक्ष लोक शेतीत काम करीत होते तर २०११ मध्ये ती संख्या २६३.१ दशलक्ष झाली.