शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

राज्यात शेतकऱ्याचे मासिक उत्पन्न ७,३८६ रुपये

By admin | Updated: June 9, 2017 06:01 IST

उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भाजप सरकारच्या गळ््याला फासासारखे ठरले आहे.

नितीन अग्रवाल। लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकऱ्यांना पिकाला ते घेण्यास आलेल्या खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भाजप सरकारच्या गळ््याला फासासारखे ठरले आहे. परंतु सरकारकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतीही योजना नाही, असे कृषी मंत्रालयाकडील अधिकृत दस्तावेजावरून म्हणता येते. हा दस्तावेज ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे.कृषी मंत्रालयाच्या सूत्रानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची सगळी जबाबदारी राज्य सरकारांची आहे. तथापि, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज, कीटकनाशके, खते, शेतीची अवजारे आणि कृषी कर्ज दिले जाते. याशिवाय सवलतीच्या दरात पीक विम्याची सोयही आहे.महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पिकांना किमान हमी भाव मिळण्यासाठी सुरू असलेली आंदोलने सरकार राजकीय कट म्हणत असले तरी प्रत्यक्षात जबाबदारी झटकत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की शेतकऱ्याची अवस्था दयनीय आहे. केंद्र सरकारकडून वेगवेगळ््या योजना राबवण्यासाठी राष्ट्रीय नमुना पाहणी करण्यात आली. त्यानुसार शेतकरी शेतीतून दररोज १३५ रुपयेच कमावतो. ही कमाई अकुशल कामगाराला मिळणाऱ्या मजुरीपेक्षाही कमीच आहे. पाहणीत शेतकऱ्याचे कुटुंब दरमहा सरासरी ६ हजार ४२६ रुपये कमावते. यात त्याला पिकापासून ४ हजार ७४ रुपयेच मिळतात. याशिवाय पशूपालनातून २३८ रुपये तो कमावतो. इतर शेती कामांतून तो जवळपास ७० रुपये व शेतीतर कामातून ३०२ रुपये कमावतो. याशिवाय अतिरिक्त मजुरी करून तो उत्पन्नात १,४१३ रुपये आणि इतर आर्थिक कामे करून तो ३२८ रुपयांची भर घालतो. वर्ष २०१४ च्या शेवटी प्रसिद्ध केलेल्या या आकडेवारीनुसार शेतकरी कुटुंबाचा खर्च दरमहा ६ हजार २२३ रुपये दाखवण्यात आला आहे.कृषी मंत्रालयाने संसदेत नुकतीच ही वस्तुस्थिती मान्य केली की शेतीतून रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. गेल्या दशकात कृषी क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या १२ टक्क्यांनी वाढली. २००१ मध्ये २३४.१ दशलक्ष लोक शेतीत काम करीत होते तर २०११ मध्ये ती संख्या २६३.१ दशलक्ष झाली.>कृषी क्षेत्रातील रोजगारात वाढमहाराष्ट्रातील शेतकरी दरमहा ७ हजार ३८६ रुपये कमावतो. पंजाबच्या शेतकऱ्याचे हेच उत्पन्न १८ हजार ५९ रुपये आहे. यानंतर हरयाना (१४,४३४ रुपये) जम्मू-काश्मीर (१२,६८३), केरळ (११,८८८) आणि मेघालयातील (११७९२) शेतकरी आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी दरमहा सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा थोडेसे जास्त ७,३८६ रुपये कमावतो. मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याचे सरासरी उत्पन्न ६ हजार २१० रुपये आहे.कृषी मंत्रालयाने संसदेत ही वस्तुस्थिती मान्य केली की शेतीतून रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या दशकात कृषी क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या १२ टक्क्यांनी वाढली. २००१ मध्ये २३४.१ दशलक्ष लोक शेतीत काम करीत होते तर २०११ मध्ये ती संख्या २६३.१ दशलक्ष झाली.