शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात शेतकऱ्याचे मासिक उत्पन्न ७,३८६ रुपये

By admin | Updated: June 9, 2017 06:01 IST

उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भाजप सरकारच्या गळ््याला फासासारखे ठरले आहे.

नितीन अग्रवाल। लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकऱ्यांना पिकाला ते घेण्यास आलेल्या खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भाजप सरकारच्या गळ््याला फासासारखे ठरले आहे. परंतु सरकारकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतीही योजना नाही, असे कृषी मंत्रालयाकडील अधिकृत दस्तावेजावरून म्हणता येते. हा दस्तावेज ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे.कृषी मंत्रालयाच्या सूत्रानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची सगळी जबाबदारी राज्य सरकारांची आहे. तथापि, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज, कीटकनाशके, खते, शेतीची अवजारे आणि कृषी कर्ज दिले जाते. याशिवाय सवलतीच्या दरात पीक विम्याची सोयही आहे.महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पिकांना किमान हमी भाव मिळण्यासाठी सुरू असलेली आंदोलने सरकार राजकीय कट म्हणत असले तरी प्रत्यक्षात जबाबदारी झटकत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की शेतकऱ्याची अवस्था दयनीय आहे. केंद्र सरकारकडून वेगवेगळ््या योजना राबवण्यासाठी राष्ट्रीय नमुना पाहणी करण्यात आली. त्यानुसार शेतकरी शेतीतून दररोज १३५ रुपयेच कमावतो. ही कमाई अकुशल कामगाराला मिळणाऱ्या मजुरीपेक्षाही कमीच आहे. पाहणीत शेतकऱ्याचे कुटुंब दरमहा सरासरी ६ हजार ४२६ रुपये कमावते. यात त्याला पिकापासून ४ हजार ७४ रुपयेच मिळतात. याशिवाय पशूपालनातून २३८ रुपये तो कमावतो. इतर शेती कामांतून तो जवळपास ७० रुपये व शेतीतर कामातून ३०२ रुपये कमावतो. याशिवाय अतिरिक्त मजुरी करून तो उत्पन्नात १,४१३ रुपये आणि इतर आर्थिक कामे करून तो ३२८ रुपयांची भर घालतो. वर्ष २०१४ च्या शेवटी प्रसिद्ध केलेल्या या आकडेवारीनुसार शेतकरी कुटुंबाचा खर्च दरमहा ६ हजार २२३ रुपये दाखवण्यात आला आहे.कृषी मंत्रालयाने संसदेत नुकतीच ही वस्तुस्थिती मान्य केली की शेतीतून रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. गेल्या दशकात कृषी क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या १२ टक्क्यांनी वाढली. २००१ मध्ये २३४.१ दशलक्ष लोक शेतीत काम करीत होते तर २०११ मध्ये ती संख्या २६३.१ दशलक्ष झाली.>कृषी क्षेत्रातील रोजगारात वाढमहाराष्ट्रातील शेतकरी दरमहा ७ हजार ३८६ रुपये कमावतो. पंजाबच्या शेतकऱ्याचे हेच उत्पन्न १८ हजार ५९ रुपये आहे. यानंतर हरयाना (१४,४३४ रुपये) जम्मू-काश्मीर (१२,६८३), केरळ (११,८८८) आणि मेघालयातील (११७९२) शेतकरी आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी दरमहा सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा थोडेसे जास्त ७,३८६ रुपये कमावतो. मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याचे सरासरी उत्पन्न ६ हजार २१० रुपये आहे.कृषी मंत्रालयाने संसदेत ही वस्तुस्थिती मान्य केली की शेतीतून रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या दशकात कृषी क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या १२ टक्क्यांनी वाढली. २००१ मध्ये २३४.१ दशलक्ष लोक शेतीत काम करीत होते तर २०११ मध्ये ती संख्या २६३.१ दशलक्ष झाली.