शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी सरकारकडे पैशांची चणचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:38 IST

पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी केंद्र सरकारला पैशांची चणचण जाणवते आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी केंद्र सरकारला पैशांची चणचण जाणवते आहे. बहुदा-याच कारणामुळे सरकारने प्रथमच कॉर्पोरेट क्षेत्रातल्या तमाम कंपन्यांना पत्र लिहून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतली ७ टक्के रक्कम ‘स्वच्छ भारत’ अभियान कोषात जमा करा, अशी आग्रहपूर्वक सूचना केली आहे. सरकारी कोषात सीएसआर निधी जमा करण्याचा असा आग्रह देशात पहिल्यांदाच होतो आहे.केंद्र सरकारच्या कंपनी अफेअर्स मंत्रालयाने देशातल्या तमाम कंपन्यांना सीएसआर निधी वर्ग करण्याबाबत हे पत्र तर लिहिलेच, त्याचबरोबर आपल्या कर्मचा-यांना स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आदेश कंपनीने द्यावेत, ग्रामीण भागात गावे दत्तक घेऊन तेथील सफाई कर्मचा-यांना प्रशिक्षित करावे, त्याचबरोबर मोक्याच्या ठिकाणी ‘स्वच्छता ही सेवा’ या संदेशाचे होर्डिंग्जही लावावेत, असे आग्रहपूर्वक सूचविले आहे. कंपनी मंत्रालयाच्या सूत्रांनुसार या पत्राद्वारे सरकारने केवळ खासगी नव्हे, तर सार्वजनिक व सरकारी कंपन्यांपुढेही हा प्रस्ताव ठेवला आहे. हा सक्ती करणारा आदेश अर्थातच नाही. या अभियानला सहकार्य करायचे की नाही, याचा निर्णय कंपन्यांनी घ्यायचा आहे. सरकारी कंपन्यांनी यंदा अधिक लाभांश सरकारला द्यावा, असे आदेश तर पूर्वीच सरकारने दिले आहेत.> सरकारी कंपन्यांनी अधिक लाभांश द्यावाकंपनी मंत्रालयाच्या सूत्रांनुसार या पत्राद्वारे सरकारने केवळ खासगी नव्हे, तर सार्वजनिक व सरकारी कंपन्यांपुढेही हा प्रस्ताव ठेवला आहे. हा काही सक्ती करणारा आदेश अर्थातच नाही. स्वच्छ भारत अभियानला सहकार्य करायचे की नाही, याचा निर्णय कंपन्यांच्या संचालकांनी घ्यायचा आहे. तमाम सरकारी कंपन्यांनी गतवर्षाच्या तुलनेत यंदा अधिक लाभांश सरकारला द्यावा, असे आदेश तर पूर्वीच सरकारने दिले आहेत.