शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
3
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
4
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
5
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
6
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
7
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
8
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
9
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
10
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
11
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
12
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver १९२५ रुपयानी महागलं; Gold झालं स्वस्त, पटापट चेक करा नवे दर
14
अल-फलाहजवळ फरीदाबादच्या शेतात जमिनीखाली बंकर स्टाईल मदरसा! दिल्ली स्फोटाच्या तपासात खळबळजनक खुलासा
15
धर्मेंद्र यांच्या परिवारातील सदस्य कोण? अशी आहे 'देओल' कुटुंबाची Family Tree
16
या कारणामुळे 'स्टील किंग' लक्ष्मी मित्तल यांनी ब्रिटन सोडलं, आता कुठे स्थायिक होणार, जाणून घ्या
17
बिहार निकालाचा प्रभाव राज्यातील निवडणुकांवर पडणार? विरोधकांना धसका, सत्ताधारी निश्चिंत
18
Viral Video: पोरीने गाजवली पार्टी... साडी नेसून तरुणीचा अफलातून डान्स, अदांनी केलं घायाळ
19
वडिलांनंतर स्मृती मंधानाच्या होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; लग्न लांबणीवरच... 
20
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची गोळाबेरीज

By admin | Updated: February 23, 2015 05:31 IST

संसदेच्या गेल्या अधिवेशनानंतर काढलेल्या सहा वटहुकुमांचे रीतसर कायद्यात रूपांतर करण्यासाठीची विधेयके विरोधकांचे बहुमत असलेल्या राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी मोदी सरकारने दुहेरी व्यूहरचना आखली आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीसंसदेच्या गेल्या अधिवेशनानंतर काढलेल्या सहा वटहुकुमांचे रीतसर कायद्यात रूपांतर करण्यासाठीची विधेयके विरोधकांचे बहुमत असलेल्या राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी मोदी सरकारने दुहेरी व्यूहरचना आखली आहे. संसदेचे उद्या सोमवारपासून सुरू होत असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी सरकारने एकीकडे काँग्रेसला थेट साद घातली आहे तर दुसरीकडे इतर विरोधी पक्षांशी मुद्द्यांवर आधारित पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.राज्यसभेत काँग्रेसेतर विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष प्रयत्न करीत आहेत. २४१ सदस्यांच्या राज्यसभेत ‘रालोआ’चे ६० सदस्य आहेत. सरकारच्या बाजूने राज्यसभेत बहुमताचे गणित जुळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. काही दिवसांपूर्वी बारामतीला जाऊन मोदींनी पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य राज्यसभेत सरकारच्या बाजूने मतदान करतील, असे दिसते. काश्मीरमधील सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर पीडीपीचे दोन सदस्यही भाजपाला साथ देतील. टिका होऊनही वित्तमंत्री अरुण जेटली मुद्दाम चेन्नईला जाऊन शिक्षा झालेल्या जयललितांना भेटले. परिणामी अण्णाद्रमुकच्या ११ सदस्यांचा पाठिंबा पक्का झाला आहे. तेलंगण राष्ट्र समितीच्या एकमेव सदस्यांला पक्षश्रेष्ठींनी याआधीच सरकारच्या बाजूने राहण्यास सांगितले आहे.सपाचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या नातवाच्या तिलक समारंभासाठी मोदींनी शनिवारी उत्तर प्रदेशात जाऊन राज्यसभेतील हे गणित आणखी पक्के केले. साहजिकच दीर्घकाळ अडकून पडलेल्या विमा ‘एफडीआय’ विधेयकास सपाच्या १५ सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यास ही दिलजमाई उपयोगी ठरेल. सर्व सातही अपक्ष मोदी सरकारच्या पाठीशी राहतील, अशी अपेक्षा आहे. नामनिर्दे शित सदस्य सहसा सरकारच्या विरोधात जात नाहीत. पण सूत्रांनुसार १० पैकी सात नामनिर्दे शित सदस्य सरकारला पाठिंबा देतील. या सर्वांची गोळाबेरीज राज्यसभेत ‘रालोआ’च्या बाजूने १०६ सदस्यांचा आकडा जमा करेल.बिजू जनता दल (७), बहुजन समाज पार्टी (१०), द्रमुक (४) आमि लोकदल (१) यांनीही पाठिंबा द्यावा किंवा वेळ आली तर मतदानाच्या वनेळी निदान गैरहजर तरी राहावे यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु आहेत. हे सर्व शक्य झाले तर मोदी सरकारचे घोडे राज्यसभेतील अडथळे पार करू शकेल.