शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मोदींची गोळाबेरीज

By admin | Updated: February 23, 2015 05:31 IST

संसदेच्या गेल्या अधिवेशनानंतर काढलेल्या सहा वटहुकुमांचे रीतसर कायद्यात रूपांतर करण्यासाठीची विधेयके विरोधकांचे बहुमत असलेल्या राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी मोदी सरकारने दुहेरी व्यूहरचना आखली आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीसंसदेच्या गेल्या अधिवेशनानंतर काढलेल्या सहा वटहुकुमांचे रीतसर कायद्यात रूपांतर करण्यासाठीची विधेयके विरोधकांचे बहुमत असलेल्या राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी मोदी सरकारने दुहेरी व्यूहरचना आखली आहे. संसदेचे उद्या सोमवारपासून सुरू होत असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी सरकारने एकीकडे काँग्रेसला थेट साद घातली आहे तर दुसरीकडे इतर विरोधी पक्षांशी मुद्द्यांवर आधारित पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.राज्यसभेत काँग्रेसेतर विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष प्रयत्न करीत आहेत. २४१ सदस्यांच्या राज्यसभेत ‘रालोआ’चे ६० सदस्य आहेत. सरकारच्या बाजूने राज्यसभेत बहुमताचे गणित जुळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. काही दिवसांपूर्वी बारामतीला जाऊन मोदींनी पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य राज्यसभेत सरकारच्या बाजूने मतदान करतील, असे दिसते. काश्मीरमधील सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर पीडीपीचे दोन सदस्यही भाजपाला साथ देतील. टिका होऊनही वित्तमंत्री अरुण जेटली मुद्दाम चेन्नईला जाऊन शिक्षा झालेल्या जयललितांना भेटले. परिणामी अण्णाद्रमुकच्या ११ सदस्यांचा पाठिंबा पक्का झाला आहे. तेलंगण राष्ट्र समितीच्या एकमेव सदस्यांला पक्षश्रेष्ठींनी याआधीच सरकारच्या बाजूने राहण्यास सांगितले आहे.सपाचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या नातवाच्या तिलक समारंभासाठी मोदींनी शनिवारी उत्तर प्रदेशात जाऊन राज्यसभेतील हे गणित आणखी पक्के केले. साहजिकच दीर्घकाळ अडकून पडलेल्या विमा ‘एफडीआय’ विधेयकास सपाच्या १५ सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यास ही दिलजमाई उपयोगी ठरेल. सर्व सातही अपक्ष मोदी सरकारच्या पाठीशी राहतील, अशी अपेक्षा आहे. नामनिर्दे शित सदस्य सहसा सरकारच्या विरोधात जात नाहीत. पण सूत्रांनुसार १० पैकी सात नामनिर्दे शित सदस्य सरकारला पाठिंबा देतील. या सर्वांची गोळाबेरीज राज्यसभेत ‘रालोआ’च्या बाजूने १०६ सदस्यांचा आकडा जमा करेल.बिजू जनता दल (७), बहुजन समाज पार्टी (१०), द्रमुक (४) आमि लोकदल (१) यांनीही पाठिंबा द्यावा किंवा वेळ आली तर मतदानाच्या वनेळी निदान गैरहजर तरी राहावे यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु आहेत. हे सर्व शक्य झाले तर मोदी सरकारचे घोडे राज्यसभेतील अडथळे पार करू शकेल.