शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

भ्रष्ट नेत्यांसोबत मोदींची ऊठबस; कर्नाटक दौऱ्यात राहुल गांधींची भाजपावर सडकून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:15 IST

भारताच्या सीमेवर चीन हेलिपॅड व विमानतळ उभारत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला. आपले पंतप्रधान सतत भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ज्यांना तुरुंगाची हवा खावी लागली, त्या येडीयुरप्पांच्या शेजारी ते व्यासपीठावर बसतात, अशी टीकाही त्यांनी केली.

चिकमंगळूर : भारताच्या सीमेवर चीन हेलिपॅड व विमानतळ उभारत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला. आपले पंतप्रधान सतत भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ज्यांना तुरुंगाची हवा खावी लागली, त्या येडीयुरप्पांच्या शेजारी ते व्यासपीठावर बसतात, अशी टीकाही त्यांनी केली.राहुल गांधी सध्या कर्नाटकच्या दौºयावर असून, तिथे रवाना होण्यापूर्वीही त्यांनी ट्विट करून पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, चीनशी मिठ्या मारून झाल्या, दोन्हीकडील सैन्याने डोकलाममधून माघार घेतल्याचे सांगण्यात आले. पण आता तिथेच चीन हेलिपॅड व विमानतळ उभारत आहे, रस्तेबांधणी करीत आहे. थंडीसाठी आपल्या जवानांच्या तंबूंची सोय करीत आहेत. मात्र त्यावर आपले पंतप्रधान काहीही बोलायलाच तयार नाहीत.चिकमंगळूरमधील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी कर्नाटकात पुन्हा काँग्रेसच सत्तेवर येईल, अशी खात्री व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर २0१९ सालच्या लोकसभा निवडणुकांत मोदी व भाजपाचा पराभव होईल, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान मोदी गेली चार वर्षे मोठमोठ्या गप्पाच मारत आहेत. मात्र जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. पंतप्रधान मोदी सत्य धर्माचे पालन करीत नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.आपणच या देशात सारे काही केले आणि आपण पंतप्रधान होण्यापूर्वी देशात काहीच नव्हते, अशा थाटात मोदी वागत असतात. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नरसिंह राव असे अनेक पंतप्रधान देशाने पाहिले. मात्र एकही पंतप्रधान या पद्धतीने वागला नाही. आपणच सारे काही आहोत, असे यापैकी एकाही पंतप्रधानाने भासवले नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.शृंगेरी पीठाला भेटआणीबाणीनंतर रायबरेलीतून पराभूत झाल्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी चिकमंगळूरमधून १९७८ साली विजयी झाल्या होत्या. त्याच मतदारसंघात आज राहुल गांधी आले होते. तिथे त्यांनी शृंगेरी शारदा पीठालाही भेट दिली. आदी गुरू शंकराचार्यांनी १८व्या शतकात या पीठाची स्थापना केली होती. राहुल गांधी यांनी तिथे जगद्गुरू शंकराचार्य श्री भारती तीर्थ स्वामी यांचेही आशीर्वाद घेतले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी