शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

भ्रष्ट नेत्यांसोबत मोदींची ऊठबस; कर्नाटक दौऱ्यात राहुल गांधींची भाजपावर सडकून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:15 IST

भारताच्या सीमेवर चीन हेलिपॅड व विमानतळ उभारत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला. आपले पंतप्रधान सतत भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ज्यांना तुरुंगाची हवा खावी लागली, त्या येडीयुरप्पांच्या शेजारी ते व्यासपीठावर बसतात, अशी टीकाही त्यांनी केली.

चिकमंगळूर : भारताच्या सीमेवर चीन हेलिपॅड व विमानतळ उभारत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला. आपले पंतप्रधान सतत भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ज्यांना तुरुंगाची हवा खावी लागली, त्या येडीयुरप्पांच्या शेजारी ते व्यासपीठावर बसतात, अशी टीकाही त्यांनी केली.राहुल गांधी सध्या कर्नाटकच्या दौºयावर असून, तिथे रवाना होण्यापूर्वीही त्यांनी ट्विट करून पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, चीनशी मिठ्या मारून झाल्या, दोन्हीकडील सैन्याने डोकलाममधून माघार घेतल्याचे सांगण्यात आले. पण आता तिथेच चीन हेलिपॅड व विमानतळ उभारत आहे, रस्तेबांधणी करीत आहे. थंडीसाठी आपल्या जवानांच्या तंबूंची सोय करीत आहेत. मात्र त्यावर आपले पंतप्रधान काहीही बोलायलाच तयार नाहीत.चिकमंगळूरमधील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी कर्नाटकात पुन्हा काँग्रेसच सत्तेवर येईल, अशी खात्री व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर २0१९ सालच्या लोकसभा निवडणुकांत मोदी व भाजपाचा पराभव होईल, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान मोदी गेली चार वर्षे मोठमोठ्या गप्पाच मारत आहेत. मात्र जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. पंतप्रधान मोदी सत्य धर्माचे पालन करीत नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.आपणच या देशात सारे काही केले आणि आपण पंतप्रधान होण्यापूर्वी देशात काहीच नव्हते, अशा थाटात मोदी वागत असतात. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नरसिंह राव असे अनेक पंतप्रधान देशाने पाहिले. मात्र एकही पंतप्रधान या पद्धतीने वागला नाही. आपणच सारे काही आहोत, असे यापैकी एकाही पंतप्रधानाने भासवले नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.शृंगेरी पीठाला भेटआणीबाणीनंतर रायबरेलीतून पराभूत झाल्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी चिकमंगळूरमधून १९७८ साली विजयी झाल्या होत्या. त्याच मतदारसंघात आज राहुल गांधी आले होते. तिथे त्यांनी शृंगेरी शारदा पीठालाही भेट दिली. आदी गुरू शंकराचार्यांनी १८व्या शतकात या पीठाची स्थापना केली होती. राहुल गांधी यांनी तिथे जगद्गुरू शंकराचार्य श्री भारती तीर्थ स्वामी यांचेही आशीर्वाद घेतले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी