शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

मोदींची राजवट सर्वांत निराशाजनक

By admin | Updated: May 27, 2016 04:07 IST

स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने केलेली सर्वाधिक निराशाजनक कामगिरी असे वर्णन काँग्रेसने मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेताना केले आहे.

- काँग्रेसकडून दोन वर्षांचे मूल्यांकनशीलेश शर्मा,  नवी दिल्लीस्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने केलेली सर्वाधिक निराशाजनक कामगिरी असे वर्णन काँग्रेसने मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेताना केले आहे. आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले असताना उत्सव का साजरा केला जात आहे, असा सवाल करतानाच काँग्रेसच्या नेत्यांनी ‘भाषणवीर मोदी, कर्मवीर मोदी बनले नाहीत’ या शब्दांत टरही उडविली. दुसरीकडे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मोदी सरकारने विकास आणि प्रगतीचे नवे परिमाण प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे.मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेताना विविध पक्षांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ही दोन वर्षे पोकळ आश्वासनांची राहिली. मोदीजी तुम्ही आनंदोत्सव का साजरा करीत आहात. देशभरात कुठे भरभराट झाली आहे काय, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते कपिल सिब्बल यांनी केला आहे. आर्थिक आघाडी, रोजगार ते परराष्ट्र धोरण अशा विविध मुद्द्यांवर सडकून टीका करताना गुरुवारी काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी सरकार आणि संपुआच्या काळातील मनमोहन सिंग यांच्या सरकारशी तुलनाही केली. मोदी सरकारचे अस्तित्व केवळ वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींमध्ये दिसून येते. डॉ. मनमोहन सिंग बोलत नव्हते, मात्र त्यांचे काम बोलायचे. मोदीजी केवळ बोलत असून त्यांचे काम काहीही बोलत नाही. या मुद्द्यावर मोदी मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याने समोर यावे आणि आमच्याशी वादविवादाला सज्ज व्हावे, या शब्दांत सिब्बल यांनी आव्हान दिले.मोदी बनले घोषणामंत्री या सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने कोणतेही काम केलेले नाही. मोदी हे घोषणामंत्री बनले आहेत, अशी टीका जेडीयूचे सरचिटणीस श्याम रजक यांनी केली. मोदींनी लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी विविध फंडे अवलंबले आहेत. रालोआ सरकारने वृत्तपत्रांमधून मोठमोठ्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचा सपाटा लावला असून स्वत:ची पाठ थोपटण्याचा हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.जाहिरातींवर उडविले एक हजार कोटी दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रसिद्धीसाठी मोदी सरकारने जाहिरातींवर एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टिष्ट्वट जारी करीत केला आहे. याउलट दिल्ली सरकारचा पूर्ण वर्षभरातील खर्च १५० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे, असे त्यांनी नमूद केले. आप सरकारने जाहिरातींसाठी मोठी तरतूद केल्याबद्दल अलीकडे भाजपा आणि काँग्रेसने जोरदार टीका केली होती.मोदीजी उत्सव का साजरा करीत आहात?मोदीजी आपण उत्सव का साजरा करीत आहात. वाराणशी हा तुमचा मतदारसंघ स्वच्छ झाला काय? युवकांना रोजगार मिळाला काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? विदेशातून आलेला काळा पैसा लोकांच्या शेतात पोहोचला काय? देशाची निर्यात शिखरावर पोहोचली काय? पोकळ आश्वासने आणि क्लृप्त्यांखेरीज दाखविण्यासाठी काहीही नसताना या दोन वर्षांत असे काय घडले, ज्यामुळे तुम्ही उत्सव साजरा करीत आहात, असा रोकडा सवाल सिब्बल यांनी विचारला. ‘प्रगती की थम गई चाल दो साल देश का बुरा हाल’ हा लघुपटही काँग्रेसने जारी केला आहे. सरकारच्या कामगिरीची चिरफाड करतानाच या पक्षाने मोदी सरकारला दहा मुद्द्यांवर घेरले आहे. काँग्रेसच्या मुख्यालयात सिब्बल यांच्यासोबतच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, मीडिया प्रमुख रणदीप सूरजेवाला यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले.‘अबकी बार हो गये बर्बाद’...मोदी सरकारने आपल्या कामगिरीकडे लक्ष वेधण्यासाठी मोठमोठ्या जाहिराती दिल्या असताना ‘काँग्रेसने अबकी बार, हो गये बर्बाद’ हा नवा नारा व्हिडीओ संदेशातून दिला आहे. मोदींनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी जनतेला काय दिले, हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडीओतून झाला आहे. सामाजिक तणाव पसरवून उन्मादजनक वातावरण निर्माण करणे हीच या सरकारची मोठी उपलब्धी राहिली आहे. सरकारने विकासाचा वेग किती वाढविला याचा खुलासा मोदींनी ‘मन की बात’मध्ये करावा, असेही सिब्बल म्हणाले. भाषणवीर मोदी, दोन वर्षांत कर्मवीर मोदी बनू शकले नाहीत. मोदींकडे केवळ भाषण असून प्रशासन नाही, असा टोलाही काँग्रेसच्या नेत्यांनी हाणला. आझाद म्हणाले की, जाहिराती, प्रचार, आत्मस्तुती, मीडिया व्यवस्थापन असलेले हे सरकार आहे. दोन वर्षांत या सरकारला अर्थव्यवस्थेत प्राण ओतता आले नाही. सर्वसामान्यांना दैनंदिन गरजांची पूर्तता करणे अवघड झाले आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. डाळी, तेल, धान्य सर्व वस्तूंचे भाव वाढले आहेत. शेतकरी आत्महत्या करीत असताना सरकार उत्सव साजरा करण्यात मश्गुल आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. हेच काय ते अच्छे दिन? फॉरेन पॉलिसी ही फौरन पॉलिसी बनली आहे, असे सांगत काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींच्या विदेश धोरणावरही टीका केली. मोदींनी वाटेल तेव्हा विमान वळवत पाकिस्तानात जाऊन चहा घेतला; पण संबंध आणखी बिघडले आहेत, असे ते म्हणाले.मोदी केवळ विमानातून ‘उडतात’संपुआ सरकारमधील योजनांची नावे बदलणे हीच मोदी सरकारची उपलब्धी आहे. अर्थव्यवस्था, कृषिधोरण कोलमडले आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. या सरकारचे विदेश धोरणही अपयशी ठरले आहे. मोदी विमानातून उडत असतात. ते देशात बसून लोकांचे प्रश्न जाणून घेण्याच्या स्थितीत नाहीत.- के.एच. मुनियप्पा, काँग्रेसचे नेते