शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

मोदींचा ‘मेक फॉर वर्ल्ड’चा नारा, एक हजार दिवसांत प्रत्येक गावात फायबर ऑप्टिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 05:45 IST

कोरोनाच्या या संकटकाळात ‘सेवा परमो धर्मा’ची भावना आपल्यासोबत असल्याचे म्हटले.

नवी दिल्ली : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने शारीरिक अंतर राखत पार पडला. लाल किल्ल्यावर सलग सातव्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘मेक फॉर वर्ल्ड’चा नारा देत नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनचीही घोषणा केली. तब्बल ८६ मिनिटांच्या आपल्या भाषणात त्यांनी कोरोनाचे संकट आणि त्यावरील भारतीय लस, आत्मनिर्भर भारत मोहीम, परराष्ट्र नीती, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन, प्रत्येक गावात फायबर आॅप्टिकसह विविध विषयांवर विस्ताराने भाष्य केले.भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अ‍ॅम्ब्युलन्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, अनेक लोक २४ तास आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असल्याचा आवर्जून उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कार्याला नमन केले. कोरोनाच्या या संकटकाळात ‘सेवा परमो धर्मा’ची भावना आपल्यासोबत असल्याचे म्हटले.कोरोनाच्या संकटातही भारताने आत्मनिर्भर बनण्याचा संकल्प केला. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत एन ९५ मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटर्स आपण परदेशातून आयात करत होतो. आज या सर्व वस्तू आपण स्वत:च्या गरजा भागवत इतर देशांनाही पुरवतो आहोत. आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ आयात कमी करणे नाही तर आपली क्षमता, सर्जनशीलता, कौशल्यही वाढवायला हवे. जगातील मोठमोठ्या कंपन्या आज भारताकडे वळत आहेत. ‘मेक इन इंडिया’सोबत ‘मेक फॉर वर्ल्ड’ मंत्रासह पुढे वाटचाल करायला हवी. कोरोनाच्या संकटकाळात संशोधनातही भारताने आघाडी घेतली आहे. आजमितीस भारतात तीन तीन लसींची चाचणी सुरू आहे. तज्ज्ञांनी हिरवा कंदील दाखविताच या लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले जाईल. देशाच्या प्रत्येक गरजवंतापर्यंत लस पोहोचवण्यासाठी आराखडाही तयार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.>जम्मू-काश्मीरवासीयांना लवकरच मुख्यमंत्री मिळेलजम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये कार्बन न्यूट्रल विकास मॉडेल राबवण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे काम वेगात सुरू आहे.ही प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच तेथे निवडणुका होऊन जम्मू-काश्मीरच्या लोकांना आपला आमदार, आपला मुख्यमंत्री मिळेल, असे मोदी म्हणाले.>ठळक मुद्देकोरोनाच्या संकटकाळात संशोधनातही भारताची आघाडीआजमितीस भारतात तीन तीन लसींची चाचणी सुरूदेशाच्या प्रत्येक गरजवंतापर्यंत लस पोहोचवण्यासाठी आराखडा तयारगावागावात इंटरनेटचे जाळे निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्टराष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्या भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणार>नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’: मोदी यांनी महत्त्वाकांक्षी ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ची घोषणा केली. भारताच्या आरोग्य क्षेत्रात ही योजना मोठी क्रांती घडविणार आहे. तुमची प्रत्येक चाचणी, प्रत्येक आजार, कोणत्या डॉक्टरांनी कोणते औषध दिले, केव्हा दिले, अहवाल काय होते याची सर्व माहिती एका आरोग्य आयडीमध्ये उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.>लाल किल्ल्यावरील भाषणे; १९ वर्षांतील कालावधीलाल किल्ल्यावर सलग सातव्यांदा ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल ८६ मिनिटांचे भाषण केले. मागच्या १९ वर्षांतील तीन पंतप्रधानांचा लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचा कालावधी पाहता मोदी यांची सात वर्षांची भाषणे ही आधीच्या पंतप्रधानांपेक्षा जास्त कालावधीची राहिली आहेत.(भाषणाची वेळ मिनिटांमध्ये)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी