शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी दिली धार्मिक स्वातंत्र्याची ग्वाही

By admin | Updated: February 18, 2015 02:49 IST

माझे सरकार प्रत्येक नागरिकास स्वत:च्या श्रद्धेनुसार कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देईल व अल्पसंख्य वा बहुसंख्यांनी इतरांविरुद्ध धार्मिक विद्वेष पसरविणे अजिबात खपवून घेणार नाही,

मौन सोडले : विद्वेष खपवून घेणार नाही, कट्टर धर्मवाद्यांना पंतप्रधानांचा इशारानवी दिल्ली : संघ परिवारातील संघटना ‘घर वापसी’सारख्या कार्यक्रमांनी हिंदू अजेंडा नेटाने पुढे नेत असूनही आणि गेल्या काही दिवसांत राजधानी दिल्लीत चर्च व ख्रिश्चनांच्या शाळेवर हल्ले झालेले असूनही गप्प राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अखेर मौन सोडले. माझे सरकार प्रत्येक नागरिकास स्वत:च्या श्रद्धेनुसार कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देईल व अल्पसंख्य वा बहुसंख्यांनी इतरांविरुद्ध धार्मिक विद्वेष पसरविणे अजिबात खपवून घेणार नाही, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.कुरियाकोस एलियास चावरा आणि मदर युफ्रेशिया या केरळमधील गेल्या शतकातील दोन ख्रिश्चन धर्मप्रचारकांना पोपनी संतपद बहाल केल्यानिमित्त रोमन कॅथॉलिक चर्चने येथील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या राष्ट्रीय आनंदोत्सवात मोदी बोलत होते.पंतप्रधान म्हणाले, की माझे सरकार सर्वच धर्मांचा समान सन्मान करेल आणि अल्पसंख्य असोत वा बहुसंख्य, कोणालाही उघडपणे अथवा छुपेपणाने इतर धर्मीयांविषयी वैरभाव पसरवू देणार नाही.धर्माच्या नावाने टोकाची भूमिका घेणाऱ्यांना कडक इशारा देताना मोदी म्हणाले, की कोणत्याही सबबीखाली कोणत्याही धर्माविरुद्धचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही़ व सरकार अशा हिंसाचाराचा तीव्रतेने निषेध करते. अशा शक्तींविरुद्ध सरकार कठोर उपाय योजेल.जगात धर्माच्या नावाने दुही आणि हिंसाचार वाढीस लागला आहे व हा आता जागतिक चिंतेचा विषय झाला आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले, की सर्वच धर्मांनी परस्परांना सन्मानाने वागवावे ही प्राचीन भारतीय शिकवण जागतिक पातळीवर समर्पक ठरू लागली आहे. ते म्हणाले की, जग आज एका दुहेरी मार्गावर उभे आहे व हा मार्ग नीटपणे पार केला नाही तर आपण सर्वजण पुन्हा एकदा मतांधता, धर्मवेड आणि रक्तपाताच्या काळ््याकुट्ट कालखंडात ढकलले जाऊ. जगाने तिसऱ्या सहस्त्रकात प्रवेश केला तरी विविध धर्मांमधील सुसंवादी अभिसरण अद्याप आपल्याला साधता आलेले नाही.गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या शिकवणुकीचे स्मरण देत मोदी म्हणाले की, सर्व धर्मांविषयी आदर प्रत्येक भारतीयाच्या रक्तात भिनायला हवा. ते म्हणाले की संयम, परस्परांविषयी सन्मान आणि सहिष्णुता हाच या देशाच्या प्राचीन संस्कृतीचा गाभा असून, तोच भारतीय राज्यघटनेतही प्रतिबिंबित झाला आहे. देशातील सर्वधर्मीयांनी याचे अनुकरण करावे, असेही त्यांनी आवाहन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)ओबामांनी टोचले होते कानच्प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही भारतातील वाढत्या धार्मिक असहिष्णुतेबद्दल कान टोचले होते. भारताने धार्मिक सलोखा व सहिष्णुतेचा मार्ग सोडला नाही तरच भारत महाशक्ती म्हणून जगाच्या आदरास पात्र ठरू शकेल, असे दिल्लीतील जाहीर भाषणात म्हणाले होते. नंतर वॉशिंग्टनला परतल्यावर त्यांनी असे भाष्य केले होते की, गेल्या काही वर्षांत भारतात सर्वच धर्मांच्या अनुयायांना जो असहिष्णुततेचा अनुभव येत आहे, त्याने महात्मा गांधी यांनाही धक्का बसला असता.मोदी राहिले होते गप्पच्संघ परिवारातील व काही हिंदू नेत्यांची वक्तव्ये आणि ‘घर वापसी’सारख्या कार्यक्रमांवरून गेल्या अधिवेशनात सतत गोंधळ होऊन संसदेचे कामकाज पाच-सहा दिवस बंद पडले होते. विरोधकांनी मागणी लावून धरूनही मोदी यांनी संसदेत वक्तव्य केले नव्हते. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या ‘रामजादे’ व ‘हरामजादे’ विधानावरून गोंधळ झाला, तेव्हा मोदींनी ५ डिसेंबर रोजी लोकसभेत केवळ एका वाक्याचे निवेदन केले होते- संसदेत हा विषय उपस्थित होण्याआधीच माझ्या पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत मी अशी भाषा न वापरण्याची कडक शब्दांत ताकीद दिली होती व माझी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती.कोणत्याही दबावाला अथवा आमिषाला बळी न पडता प्रत्येक नागरिकास आपल्या पसंतीच्या धर्माचे आचरण सुरू ठेवण्याचा अथवा त्याचा स्वीकार करण्याचा हक्क बजावता येईल आणि (देशात) संपूर्ण धार्मिक स्वातंत्र्य राहील याची सरकार खात्री करेल.