शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

मोदींच्या ‘जीडीपी’ शैलीने देशाचा ‘जीडीपी’ घसरला! राहुल गांधींची वक्रोक्तीपूर्ण टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:02 IST

मोदी सरकारवर टीका करताना याआधी ‘जीएसटी’ला ‘गब्बर सिंग टॅक्स’ व ‘मेक इन इंडिया’ला ‘फेक इन इंडिया’ असे संबोधणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जीडीपी’ या सकल राष्ट्रीय उत्पन्नासाठी वापरल्या जाणा-या इंग्रजी अद्याक्षरांवर ‘ग्रॉस डिव्हिझिव्ह पॉलिटिक्स’ अशी वक्रोक्तीपूर्ण कोटी शनिवारी केली व मोदींच्या शैलीमुळे देशाची अर्थव्यवस्था आज वाईट स्थितीत असल्याचा आरोप केला.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : मोदी सरकारवर टीका करताना याआधी ‘जीएसटी’ला ‘गब्बर सिंग टॅक्स’ व ‘मेक इन इंडिया’ला ‘फेक इन इंडिया’ असे संबोधणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जीडीपी’ या सकल राष्ट्रीय उत्पन्नासाठी वापरल्या जाणाºया इंग्रजी अद्याक्षरांवर ‘ग्रॉस डिव्हिझिव्ह पॉलिटिक्स’ अशी वक्रोक्तीपूर्ण कोटी शनिवारी केली व मोदींच्या शैलीमुळे देशाची अर्थव्यवस्था आज वाईट स्थितीत असल्याचा आरोप केला.आगामी वित्तीय वर्षात देशाचा ‘जीडीपी’ वृद्धीदर कमी होऊन ६.५ टक्के असेल, असा अंदाज सरकारच्याच ‘सेंट्रल स्टॅटिस्टिकल आॅर्गनायजेशन’ने शुक्रवारी व्यक्त केला. त्यानिमित्त टिष्ट्वटरवरून सरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनी एरवी अलौकिक प्रतिभावंत असा अर्थ असलेला ‘जीनियस’ हा शब्दही केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना उद्देशून ‘चलाख’ या गर्भित अर्थाने वापरला.गेल्या १३ वर्षांत सर्वात कमी नवी नवी गुंतवणूक, बँकांच्या वित्त पुरवठ्याची ६३ वर्षांतील सर्वात कमी पातळी, रोजगारनिर्मितीचा आठ वर्षांतील निचांक आणि कृषीक्षेत्राचा जेमतेम १.७ टक्के एवढा मामुली विकास यासोबत आठ वर्षांतील सर्वाधिक वित्तीय तूट आणि ठप्प झालेल्या विकास प्रकल्पांचा चढता आलेख, अशी देशाच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती असल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले.‘जीडीपी’ आणि ‘जीनियस’ या दोन शब्दांची नव्या अर्थाने गुंफण करत राहुल गांधी यांनी असा आरोप केला की, मोदी यांची फुटपाडू राजकारणाची शैली आणि जेटली यांची ‘चलाखी’ यामुळे अर्थव्यवस्थेची ही अवस्था झाली आहे.मोदींचा दावा उडाला हवेत!अर्थव्यवस्था मंदावत असल्याची भीती खरी ठरली आहे. भारताचा दमदार आर्थिक विकास होत असल्याचा मोदी सरकारचा दावा कापरासारखा हवेत उडून गेला आहे. साखरेची कितीही पुटे चढविली आणि फुकाच्या बढाया मारल्या तरी कटू सत्य लपून राहात नाही. अलीकडच्या काळात देशात जाणवणारा सामाजिक असंतोष हे या आर्थिक मंदीचेच फलीत असू शकेल, असे माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम म्हणाले.राहुल गांधींविरुद्ध हक्कभंगाची तक्रारराहुल गांधी यांच्या विरोधात राज्यसभेत दाखल झालेली हक्कभंगाची तक्रार राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे पाठविली आहे. राज्यसभेतील भाजप सदस्य भूपेंदर यादव यांनी हक्कभंगाची तक्रार केली होती.राहुल गांधी यांनी एका ट्विटमध्ये वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या आडनावाचे स्पेलिंग बदलून ‘जेटलाय’ (खोटे बोलणारे जेटली) करूनअवमान केल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. राहुल यांच्या विरोधातील आणखी एक तक्रार लोकसभेच्या आचार संहिता समितीसमोर आहे. ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी समितीचे अध्यक्ष आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी