शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

गुजरात निवडणुकीच्या तारखांचा अधिकार मोदींनाच, चिदंबरम यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 03:36 IST

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेरच्या निवडणुकीत रॅलीत आश्वासनांचा पाऊस पाडता यावा यासाठी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्याचा अधिकार बहाल केला आहे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला.

नवी दिल्ली/ अहमदाबाद : निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेरच्या निवडणुकीत रॅलीत आश्वासनांचा पाऊस पाडता यावा यासाठी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्याचा अधिकार बहाल केला आहे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला.रविवारी मोदी गुजरात भेटीवर जात असून या राज्यात सर्व सवलतींची घोषणा केल्यानंतर गुजरात सरकार निवडणूक आयोगाला सुटी संपवत पुन्हा कामाला लावेल, असेही चिदंबरम यांनी एका पाठोपाठ एक जारी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले. पंतप्रधानांनी आपल्या अंतिम रॅलीत गुजरातच्या निवडणुकीची तारीख घोषित करावी यासाठी त्यांना अधिकार बहाल करण्यात आले आहेत. (कृपया त्यांनी त्याबाबत आयोगाला सूचित करावे) असा उपरोधिक टोलाही चिदंबरम यांनी हाणला.निवडणूक आयोगाने १२ आॅक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशच्या निवडणुका ९ नोव्हेंबर रोजी घेण्याची घोषणा केली मात्र गुजरातबाबत निर्णय घोषित करण्याचे टाळले. हिमाचल प्रदेशमधील मतमोजणी होण्यापूर्वी म्हणजे १८ डिसेंबर पूर्वी गुजरातमधील निवडणूक होईल, असे आयोगाने नमूद केले असले तरी तारखा जाहीर करण्याचे टाळले. गुजरात विधानसभेच्या निवडणुका घोषित करण्यास विलंब लावण्यासाठी निवडणूक आयोगावर दबाव आणला जात आहे.मोदी १६ आॅक्टोबर रोजी आपले मूळगाव असलेल्या वडनगरला भेट दिली होती. त्यांना सांताक्लॉज बनून आश्वासनांचा पाऊस पाडण्याची संधी मिळावी यासाठीच निवडणूक आयोगाने तारखा घोषित करण्याचे टाळले, असा आरोप काँग्रेसने यापूर्वीही केला होता. कॉंग्रेसचे आरोप नैराश्यातून- भाजपकाँग्रेसने घाबरून अशी विधाने चालविली असल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही केला. चिदंबरम आणि काँग्रेस पक्ष घाबरला आहे. निवडणुका योग्य वेळीच होतील. नैराश्यातून काँग्रेसने अशी भाषा चालविली आहे. लोकशाहीत निवडणूक आयोगावर टीका करणे योग्य ठरत नाही, असे ते गांधीनगर येथे प्रतिक्रिया देताना म्हणाले. काँग्रेसकडून संवैधानिक संस्थेवर निराधार आरोप केले जात आहे. या निवडणुकीत भाजप विजयी होणार या शक्यतेमुळे काँग्रेस पक्ष घाबरला आहे, असे सांगत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :GujaratगुजरातIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस