शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणुकीच्या तारखांचा अधिकार मोदींनाच, चिदंबरम यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 03:36 IST

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेरच्या निवडणुकीत रॅलीत आश्वासनांचा पाऊस पाडता यावा यासाठी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्याचा अधिकार बहाल केला आहे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला.

नवी दिल्ली/ अहमदाबाद : निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेरच्या निवडणुकीत रॅलीत आश्वासनांचा पाऊस पाडता यावा यासाठी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्याचा अधिकार बहाल केला आहे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला.रविवारी मोदी गुजरात भेटीवर जात असून या राज्यात सर्व सवलतींची घोषणा केल्यानंतर गुजरात सरकार निवडणूक आयोगाला सुटी संपवत पुन्हा कामाला लावेल, असेही चिदंबरम यांनी एका पाठोपाठ एक जारी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले. पंतप्रधानांनी आपल्या अंतिम रॅलीत गुजरातच्या निवडणुकीची तारीख घोषित करावी यासाठी त्यांना अधिकार बहाल करण्यात आले आहेत. (कृपया त्यांनी त्याबाबत आयोगाला सूचित करावे) असा उपरोधिक टोलाही चिदंबरम यांनी हाणला.निवडणूक आयोगाने १२ आॅक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशच्या निवडणुका ९ नोव्हेंबर रोजी घेण्याची घोषणा केली मात्र गुजरातबाबत निर्णय घोषित करण्याचे टाळले. हिमाचल प्रदेशमधील मतमोजणी होण्यापूर्वी म्हणजे १८ डिसेंबर पूर्वी गुजरातमधील निवडणूक होईल, असे आयोगाने नमूद केले असले तरी तारखा जाहीर करण्याचे टाळले. गुजरात विधानसभेच्या निवडणुका घोषित करण्यास विलंब लावण्यासाठी निवडणूक आयोगावर दबाव आणला जात आहे.मोदी १६ आॅक्टोबर रोजी आपले मूळगाव असलेल्या वडनगरला भेट दिली होती. त्यांना सांताक्लॉज बनून आश्वासनांचा पाऊस पाडण्याची संधी मिळावी यासाठीच निवडणूक आयोगाने तारखा घोषित करण्याचे टाळले, असा आरोप काँग्रेसने यापूर्वीही केला होता. कॉंग्रेसचे आरोप नैराश्यातून- भाजपकाँग्रेसने घाबरून अशी विधाने चालविली असल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही केला. चिदंबरम आणि काँग्रेस पक्ष घाबरला आहे. निवडणुका योग्य वेळीच होतील. नैराश्यातून काँग्रेसने अशी भाषा चालविली आहे. लोकशाहीत निवडणूक आयोगावर टीका करणे योग्य ठरत नाही, असे ते गांधीनगर येथे प्रतिक्रिया देताना म्हणाले. काँग्रेसकडून संवैधानिक संस्थेवर निराधार आरोप केले जात आहे. या निवडणुकीत भाजप विजयी होणार या शक्यतेमुळे काँग्रेस पक्ष घाबरला आहे, असे सांगत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :GujaratगुजरातIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस