शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

मोदींच्या 'या' चाणक्याने पाकिस्तानला घडवली अद्दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2016 13:09 IST

भारताने नियंत्रण रेषा ओलांडून आपली 'strategic restraint' म्हणजे 'लष्करी पर्याय टाळण्याचे' जे जुने धोरण आहे त्यात बदल केल्याचा स्पष्ट इशारा पाकिस्तानला दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३० - लष्कराच्या स्पेशल फोर्सेसनी बुधवारी रात्री नियंत्रण रेषा ओलांडून आपली 'strategic restraint' म्हणजे 'लष्करी पर्याय टाळण्याचे' जे जुने धोरण आहे त्यात बदल केल्याचा स्पष्ट इशारा पाकिस्तानला दिला आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर हा बदल अधिक ठळकपणे दिसत असला तरी या धोरणाची सुरुवात सात ऑक्टोंबर २०१४ मध्येच झाली होती. 
 
दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानने जेव्हा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करुन भारतीय चौक्यांवर गोळीबार केला तेव्हाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बीएसएफच्या महासंचालकांना बोलवून पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले होते. पाकिस्तानकडून किरकोळ गोळीबार झाला तरी त्याला जोरदार प्रत्युत्तर द्या असे त्यावेळीच अजित डोवाल यांनी बीएसएफ महासंचालकांना बजावले होते. 
 
तुम्ही तुमच्या पद्धतीने पाकिस्तानी रेंजर्सना प्रत्युत्तर द्या त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करा. समोरुन गोळीबार थांबत नाही तो पर्यंत तुमची कारवाई चालू ठेवा असे डोवाल यांनी बीएसएफ महासंचालकांना सांगितले होते. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबत नाही तोपर्यंत पाकिस्तानी रेंजर्सबरोबर कुठलीही फ्लॅग मिटींग करु नका असे त्यांनी बीएसएफ महासंचालकांकडे स्पष्ट केले होते. 
 
डोवाल यांच्या या रणनितीचा लगेच परिणाम दिसून आला. भारताच्या गोळीबारामुळे पाकिस्तानच्या बाजूला मोठे नुकसान सुरु झाल्यानंतर युद्धखोर पाकिस्तानने लगेच युद्धविरामाचे झेंडे फडकवले. मे २०१४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर लष्कराने प्रथमच इतकी आक्रमक भूमिका घेतली. भारताचे हे धोरण आजही कायम आहे. 
 
मागच्यावर्षी ऑक्टोंबरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सचे महासंचालक जनरल उमर फारुख बुरकी नवी दिल्लीत चर्चेसाठी आले होते. त्यावेळी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून मोठया प्रमाणावर गोळीबार सुरु झाला. डोवाल आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी लगेचच बीएसएफला पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे आदेश दिले. 
प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या बाजूला २६ नागरीक ठार झाले.त्यावेळी बुरकी यांनी हॉटलाईनवरुन बीएसएफ महासंचालकांबरोबर चर्चा केली व त्यांना गोळीबार थांबवण्याची विनंती केली अशी माहिती सूत्रांनी दिली. 
मागच्यावर्षी जून महिन्यात भारतीय लष्कराच्या कमांडोनी म्यानमारच्या हद्दीत घुसून एनएससीएन(के) च्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. या मोहिमेमागे अजित डोवालच होते. पंतप्रधानपदी मोदी आणि एनएसए पदी अजित डोवाल आल्यानंतर मागच्या दोनवर्षात भारताच्या संरक्षण धोरणात अमूलाग्र बदल झाला आहे. भारतीय संरक्षण दलाचे मनोबल वाढवणारे अनेक निर्णय घेण्यात आले. पाकिस्तानलाही वेळोवेळी या बदलांची जाणीव करुन देण्यात आली. 
 
कोण आहेत अजित डोवाल 
अजित कुमार डोवाल हे १९६८ च्या आयपीएस बॅचचे केरळ केडरचे निवृत्त अधिकारी आहेत. २० जून १९४५ मध्ये एका गडवाली ब्राम्हण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सध्या ते भारताचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. डोवाल यांनी आपल्या कार्यकाळात बराच काळ गुप्तचर खात्यामध्ये काम केले आहे. २००४-०५ मध्ये ते भारताच्या गुप्तचर खात्याचे संचालक होते. भारताच्या गुप्तचर खात्याच्या ऑपरेशनल विंगचे दशकभर त्यांनी प्रमुखपद  भूषवले.
 
मिझोराम, पंजाबमध्ये अनेक बंडखोर विरोधी मोहिमांमध्ये ते सक्रीय होते. १९९९ साली अपहरण झालेल्या आयसी-८१४ विमानामधील प्रवाशांच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांबरोबर ज्या तिघांनी चर्चा केली त्यामध्ये डोवाल यांचा समावेश होता. 
 
पंजाबमध्ये ऑपरेशन ब्लॅक थंडरपूर्वी महत्वाची माहिती गोळा करण्यासाठी काही काळ ते पंजाबच्या सुवर्णमंदिरातही थांबले होते. गुप्तचर म्हणून त्यांनी पाकिस्तानातही काही काळ घालवला आहे. प्रत्यक्ष गुप्तचर मोहिमांचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा भारताला सध्या फायदा होत आहे.