शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

मोदींची मनोवृत्ती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय, काँग्रेसचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 04:57 IST

तिहेरी तलाकवर बंदी घालण्याच्या विधेयकास विरोध करणारी काँग्रेस हा अजूनही १८ व्या शतकातील मानसिकतेचा फक्त मुस्लिम पुरुषांचा पक्ष आहे, या वक्तव्यावरून काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी जोरदार हल्ला चढविला.

नवी दिल्ली : तिहेरी तलाकवर बंदी घालण्याच्या विधेयकास विरोध करणारी काँग्रेस हा अजूनही १८ व्या शतकातील मानसिकतेचा फक्त मुस्लिम पुरुषांचा पक्ष आहे, या वक्तव्यावरून काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी जोरदार हल्ला चढविला. पंतप्रधानांची सडकी मनोवृत्ती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे मोदींनी आधी इतिहास वाचावा आणि नवा इतिहास लिहिणे बंद करावे, असे काँग्रेसने बजावले.मोदी यांनी शनिवारी आझमगढ येथील सभेत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले, पंतप्रधानांनी सडक्या मनोवृत्तीने मनाला येईल ते बोलत सुटणे हा राष्ट्रीय चिंतेचा विषय झाला आहे. काँग्रेस हा देशातील प्रत्येक नागरिकाचा व प्रत्येक धर्मावलबीचा पक्ष आहे. काँग्रेसला मोदींकडून प्रशस्तीपत्राची गरज नाही.शर्मा म्हणाले की, आपण फक्त भाजपाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहोत, ायचे मोदींनी भान ठेवावे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला मोदींनी मुस्लिमांचा पक्ष म्हणणे हे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. इतिहासाचे ज्ञान कमी असल्याने मोदी स्वत:चा इतिहास रचत असतात!महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल, लाला लाजपत राय व मौलाना आझाद यासारखे उत्तुंग नेते काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. काँग्रेस अध्यक्षांची यादी मोदींनी आपल्या कार्यालयात लावून ठेवावी, म्हणजे तरी मनाला येईल ते ठोकून देण्याची त्यांची खोड जाईल, असे आसूडही शर्मा यांनी ओढले.सध्याच्या सरकारच्या वर्षांच्या राजवटीत पाच कोटी लोकांना दारिद्रय रेषेच्या वर आणल्याचा मोदींचा दावा निखालस खोटा आणि हास्यास्पद आहे.उलट नोटाबंदी आणि ‘जीएसटी’ची चुकीची अंमलबजावणी यामुळे आणखी काही नवे नागरिक दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. याउलट ‘संपुआ’ सरकारच्या १० वर्षांच्या काळात १४ कोटी लोकांचे वास्तवात दारिद्र्य निर्मूलन केले गेले होते, असा दावाही काँग्रेसने केला.>कोंडी करण्याची तयारीसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या पुढाकारात सोमवारी सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. त्यात बँकांमधील वाढते घोटाळे, महिलांची असुरक्षितता व राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना ठरविण्यात येईल.