शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोदींची मनोवृत्ती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय, काँग्रेसचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 04:57 IST

तिहेरी तलाकवर बंदी घालण्याच्या विधेयकास विरोध करणारी काँग्रेस हा अजूनही १८ व्या शतकातील मानसिकतेचा फक्त मुस्लिम पुरुषांचा पक्ष आहे, या वक्तव्यावरून काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी जोरदार हल्ला चढविला.

नवी दिल्ली : तिहेरी तलाकवर बंदी घालण्याच्या विधेयकास विरोध करणारी काँग्रेस हा अजूनही १८ व्या शतकातील मानसिकतेचा फक्त मुस्लिम पुरुषांचा पक्ष आहे, या वक्तव्यावरून काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी जोरदार हल्ला चढविला. पंतप्रधानांची सडकी मनोवृत्ती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे मोदींनी आधी इतिहास वाचावा आणि नवा इतिहास लिहिणे बंद करावे, असे काँग्रेसने बजावले.मोदी यांनी शनिवारी आझमगढ येथील सभेत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले, पंतप्रधानांनी सडक्या मनोवृत्तीने मनाला येईल ते बोलत सुटणे हा राष्ट्रीय चिंतेचा विषय झाला आहे. काँग्रेस हा देशातील प्रत्येक नागरिकाचा व प्रत्येक धर्मावलबीचा पक्ष आहे. काँग्रेसला मोदींकडून प्रशस्तीपत्राची गरज नाही.शर्मा म्हणाले की, आपण फक्त भाजपाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहोत, ायचे मोदींनी भान ठेवावे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला मोदींनी मुस्लिमांचा पक्ष म्हणणे हे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. इतिहासाचे ज्ञान कमी असल्याने मोदी स्वत:चा इतिहास रचत असतात!महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल, लाला लाजपत राय व मौलाना आझाद यासारखे उत्तुंग नेते काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. काँग्रेस अध्यक्षांची यादी मोदींनी आपल्या कार्यालयात लावून ठेवावी, म्हणजे तरी मनाला येईल ते ठोकून देण्याची त्यांची खोड जाईल, असे आसूडही शर्मा यांनी ओढले.सध्याच्या सरकारच्या वर्षांच्या राजवटीत पाच कोटी लोकांना दारिद्रय रेषेच्या वर आणल्याचा मोदींचा दावा निखालस खोटा आणि हास्यास्पद आहे.उलट नोटाबंदी आणि ‘जीएसटी’ची चुकीची अंमलबजावणी यामुळे आणखी काही नवे नागरिक दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. याउलट ‘संपुआ’ सरकारच्या १० वर्षांच्या काळात १४ कोटी लोकांचे वास्तवात दारिद्र्य निर्मूलन केले गेले होते, असा दावाही काँग्रेसने केला.>कोंडी करण्याची तयारीसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या पुढाकारात सोमवारी सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. त्यात बँकांमधील वाढते घोटाळे, महिलांची असुरक्षितता व राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना ठरविण्यात येईल.