शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
3
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
4
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
5
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
6
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
8
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
9
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
10
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
11
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
12
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
13
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
14
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
15
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
16
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
17
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
18
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
19
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
20
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

'मोदीजी, अदानी-अंबानी तुमची तिजोरी भरतील, पण 'पोट' शेतकरीच भरतो'

By महेश गलांडे | Updated: January 29, 2021 10:01 IST

शेतकरी आंदोलनात राजद पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसोबत आहे. सरकार, वडिल-मुलगा आणि जवान-किसान यांचं आपापसांत भांडण लावत असून देणगीदारांना फायदा पोहोचवत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलाय

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनात राजद पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसोबत आहे. सरकार, वडिल-मुलगा आणि जवान-किसान यांचं आपापसांत भांडण लावत असून देणगीदारांना फायदा पोहोचवत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलाय

नवी दिल्ली -  शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रजासत्ताकदिनी हिंसाचार घडविण्याचे कारस्थान केंद्र सरकारच्या मदतीने आखण्यात आले व पार पडले. या हिंसाचाराद्वारे शेतकरी आंदोलनाची प्रतिमा मलीन करण्याचा केंद्र सरकारचा हेतू होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यानंतर, याप्रकरणी चांगलेच राजकारण रंगले असून विरोधी पक्षांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. केंद्र सरकारने आंदोलक शेतकरी नेत्यांवर गुन्हेही नोंदविण्यास सुरुवात केली असून आंदोलकांना हटविण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. यावरुन, विरोधक आक्रमक झाले आहेत.  

दिल्लीच्या सीमेवरील गाझीपूर सीमेसह इतर सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे. आता एक बाजू निवडण्याची वेळ आली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, आता एक बाजू निवडण्याची वेळ आली आहे. माझा निर्यण स्पष्ट आहे. मी लोकशाहीसोबत आहे. मी शेतकरी आंणि त्यांच्या शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनासोबत आहे. लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारमधील माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनीही मोदींना लक्ष्य करत टीका केलीय. मोदीजी, अदानी-अंबानी तुमची तिजोरी भरु शकतील, पण तुमचं पोट देशाचा शेतकरी भरतो, अशी आठवण यादव यांनी करुन केलीय. तसेच, तेजस्वी यादव यांनीही शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकावर टीका केलीय. शेतकरी आंदोलनात राजद पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसोबत आहे. सरकार, वडिल-मुलगा आणि जवान-किसान यांचं आपापसांत भांडण लावत असून देणगीदारांना फायदा पोहोचवत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलाय. आंदोलकांवरील सरकारकडून होणाऱ्या अत्याराचाचीह त्यांनी कडक शब्दात निषेध व्यक्त केलाय. 

शेतकऱ्यांना धमकावण्यात येतंय - प्रियंका गांधी

दरम्यान, राहुल गांधींच्या आधी त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनीही शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले होते. प्रियंका गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या की, काल रात्री शेतकरी आंदोलन लाठीच्या बळावर संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करण्यात आळा. आज गाझीपूर आणि सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांना धमकावण्यात येत आहे. हे लोकशाहीच्या प्रत्येक नियमाच्या विरोधातील आहे. काँग्रेस शेतकऱ्यांसोबतच्या या संघर्षामध्ये उभी राहील. शेतकरी हे देशाचे हित आहे. जे शेतकऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न करणारे देशद्रोही आहेत. प्रियंका गांधी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, आंदोलनातील हिंसक तत्त्वांवर कारवाई करण्यात यावी. मात्र जे शेतकरी शांततेने आंदोलन, संघर्ष करत आहेत. त्यांच्यासोबत देशाची जनता ही संपूर्ण शक्तीने उभी राहील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारMukesh Ambaniमुकेश अंबानीTej Pratap Yadavतेज प्रताप यादव