शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

मोदी ‘माध्यमां’शी थेट संवाद साधणार

By admin | Updated: October 26, 2014 02:05 IST

एरवी प्रसार माध्यमांना टाळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पत्रकारांसाठी ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला.

नवी दिल्ली : एरवी प्रसार माध्यमांना टाळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पत्रकारांसाठी ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला. मीडियाशी सखोल, व्यापक आणि थेट संवाद साधण्यासाठी आपण लवकरच नवी व्यवस्था करणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
भाजपाच्या मीडिया विभागाने पक्ष मुख्यालयात हा ‘दिवाळी मंगल मिलन’ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मोठय़ा संख्येत उपस्थित असलेल्या पत्रकारांना उद्देशून मोदी म्हणाले, ‘कधीकाळी मी देखील तुमच्या (पत्रकार) प्रतीक्षेत खुच्र्या लावत होतो. काही वर्षापूर्वी तुमच्याशी थेट आणि जवळचा संबंध ठेवत होतो. ते दिवस काही और होते. मनमोकळ्या चर्चा व्हायच्या. तुमच्याशी चांगली मित्रता झाली होती. त्याचा फायदा मला गुजरातमध्ये झाला.’
 मीडियाशी तसेच मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे संकेत देताना मोदी पुढे म्हणाले, ‘तुमच्यासोबत असलेले ते जुने सखोल व मैत्रीपूर्ण संबंध अधिक व्यापक कसे होतील यासाठी मी एखादा मार्ग शोधतो आहे. तुमच्यासोबत वेळेचा सदुपयोग कसा करता येईल हे मी शोधत आहे. त्याचा मार्ग येत्या काही दिवसात मिळेल. असे झाले तर तुम्हाला मीडियामार्फत काही कळण्याऐवजी थेट माङयाकडून माहीत करून घेण्याचा फायदा होईल. ब:याच गोष्टी तुम्ही लिहू शकत नाही. परंतु प्रत्यक्ष बोलून त्या गोष्टींची माहिती मिळते आणि अशा गोष्टी बहुमूल्य असतात.’
आपल्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियाना’बाबत जागृती निर्माण करण्यात दिलेल्या योगदानाबाबत मोदींनी प्रसार माध्यमांचे आभार मानले. ‘तुम्ही तुमच्या लेखणीला झाडू बनविल्याबद्दल तुमचे आभार. ही फार मोठी सेवा आहे, असे मला वाटते. केवळ पीएमने हातात झाडू घेतल्याने हे अभियान सफल होणार नव्हते,’ असे मोदी म्हणाले. 
या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ मंत्री राजनाथसिंग, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपाचे जवळपास सर्वच ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)