शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

मोदींनी केले राहुल गांधींचे स्वागत! राष्ट्रपती भवनात तणाव झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 02:01 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या सोहळ्यात राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसवल्याने काँग्रेसचे नेते संतप्त झाले असले. पण संध्याकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पुढे येऊ न राहुल गांधी यांचे स्वागत केले आणि त्यांची विचारपूसही केली.

 नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या सोहळ्यात राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसवल्याने काँग्रेसचे नेते संतप्त झाले असले. पण संध्याकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पुढे येऊ न राहुल गांधी यांचे स्वागत केले आणि त्यांची विचारपूसही केली.राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसण्याची सोय केल्याने काँग्रेस नेते संतापले, पण राहुल गांधी यांनी कोणतीही तक्रार केली. आपणास जिथे जागा देण्यात दिली आहे, तिथे आपण जाऊ न बसणार, असे त्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे ते तिथेच बसले. मात्र, या निमित्ताने काँग्रेस व भाजपा यांच्यात अपेक्षेप्रमाणे शाब्दिक बाचाबाची झालीच.प्रमुख विरोधी पक्षाच्या प्रमुखाला अशी वागणूक दिल्याबद्दल काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली. भाजपातर्फे त्याला उत्तर देण्यात आले. भाजपा विरोधात असताना आमच्या नेत्यांना काँग्रेसतर्फे अशीच वागणूक देण्यात आली होती, असा टोला भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी लगावला. ते म्हणाले की, राजनाथ सिंह भाजपाचे अध्यक्ष असताना, त्यांनाही प्रजासत्ताक दिन समारंभात मागच्या रांगेतील जागाच देण्यात आली होती, हे काँग्रेसने विसरू नये.दुसºया रांगेत राहुल गांधीराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या समारंभात राहुल गांधी यांना दुसºया रांगेत स्थान देण्यात आले होते. राहुल गांधी समारंभाला पोहोचताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊ न त्यांचे स्वागत केले.त्या दोघांमध्ये काही बोलणेही झाले.या समारंभाला १0 राष्ट्रप्रमुखांबरोबारच केंद्री मंत्री, खासदार, राजकीय नेते, राजदूत असे सुमारे १२00 लोक उपस्थित होते. सुषमा स्वराज यांची अनुपस्थिती मात्र सर्वांनाच जाणवली. निर्मला सीतारामन प्रत्येकाची चौकशी करताना दिसत होत्या.या वेळी प्रथमच या समारंभाला मोबाइल आणण्याची परवानगी देण्यात आली होती. अनेक जण या निमित्ताने पंतप्रधानांसमवेत सेल्फी घेताना दिसत होते.तक्रार नव्हती केलीआम्ही त्या वेळी कोणतीही तक्रार केली नव्हती आणि राजनाथ सिंह कोणतीही तक्रार न करता दिलेल्या जागेवर बसले होते. लोकशाहीतील संकेतांची किमान काँग्रेसने तरी आम्हाला आठवण करून देऊ नये, असे सांगून नरसिंह राव म्हणाले की, देशात आता काँग्रेसची सत्ता नाही आणि तरीही आपणास सुपर व्हीव्हीआयपीप्रमाणे वागणूक मिळावी, असे गांधी यांना वाटत आहे. राजशिष्टाचारामध्ये त्यांच्यासाठी विशेष स्थान नाही, हे त्यांनी आता तरी ओळखायला हवे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी