शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बेरोजगारीमुळे मोदी, ट्रम्प यांचा विजय, राहुल यांचा हल्ला; काँग्रेसलाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 04:10 IST

बेरोजगारीमुळे आलेल्या नैराश्यामुळेच नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यांना लोक निवडून देत आहेत, असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी व्यक्त केले.

प्रिन्स्टन (अमेरिका) : बेरोजगारीमुळे आलेल्या नैराश्यामुळेच नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यांना लोक निवडून देत आहेत, असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी व्यक्त केले. पुरेसा रोजगार निर्माण करू न शकल्यामुळे काँग्रेसला २०१४च्या निवडणुकीत अपयश आल्याचेही त्यांनी मान्य केले.गांधी दोन आठवड्यांच्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. प्रिन्स्टन विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर राहुल गांधी म्हणाले की, रोजगार हा सक्षम करण्याचे, देशबांधणीच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करण्याचे साधन आहे. मला असे वाटते की मोदींचा उदय झाला आणि ट्रम्प सत्तेत आले, याचे मुख्य कारण हे भारतात आणि अमेरिकेतील बेरोजगारीत आहे.आमच्या देशात कोट्यवधींना रोजगार नाही व त्यांना भवितव्यही दिसत नाही. त्यामुळे त्यांना वेदना होतात आणि त्यांनी अशा प्रकारच्या नेत्यांना पाठिंबा दिला, असे सांगून गांधी म्हणाले की, बेरोजगारी आहे हा प्रश्नच कोणी मान्य करायला तयार नाही हीच एक समस्या आहे.ट्रम्प यांच्याबद्दल मला माहिती नाही. मी त्यांच्याविषयी फारसे बोलणार नाही. परंतु, आमचे पंतप्रधान पुरेशी रोजगार निर्मिती करीत नाहीत. गांधी यांनी तज्ज्ञ, व्यावसायिक नेते आणि अमेरिकेचे काँग्रेस नेते यांच्याशी झालेल्या भेटीत वारंवार बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. सध्या आम्ही पुरेसा रोजगार तयार करीत नाही. रोज ३० हजार नवे युवक रोजगाराच्या बाजारात दाखल होत आहेत; तरीही सरकार दररोज फक्त ५०० रोजगार तयार करीत आहे. यात आधीच प्रचंड प्रमाणावर असलेल्या बेरोजगारांचा समावेश नाही, असे गांधी याआधीच्या बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील भाषणात म्हणाले होते. (वृत्तसंस्था)>आमच्यावर रागावलेप्रिन्स्टनमधील भाषणात गांधी म्हणाले होते की, भारताला चीनशी स्पर्धा करण्यासाठी स्वत:त बदल करून घ्यावे लागतील. त्याचसाठी देशातील लोकांना रोजगारांची गरज आहे.आम्ही दररोज ३० हजार रोजगार निर्माण करू शकलो नाही, म्हणून रागावलेले लोक आता मोदींवरही रागावलेले आहेत. तो प्रश्न सोडवणे हा मध्यवर्ती भाग आहे. माझा मुख्य मुद्दा आहे तो हा की मोदी यांनी रोजगाराच्या प्रश्नालाच दुसरीकडे वळवले व बोट दुसरीकडेच दाखवत आहेत,असे गांधी म्हणाले.