शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

बेरोजगारीमुळे मोदी, ट्रम्प यांचा विजय, राहुल यांचा हल्ला; काँग्रेसलाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 04:10 IST

बेरोजगारीमुळे आलेल्या नैराश्यामुळेच नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यांना लोक निवडून देत आहेत, असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी व्यक्त केले.

प्रिन्स्टन (अमेरिका) : बेरोजगारीमुळे आलेल्या नैराश्यामुळेच नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यांना लोक निवडून देत आहेत, असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी व्यक्त केले. पुरेसा रोजगार निर्माण करू न शकल्यामुळे काँग्रेसला २०१४च्या निवडणुकीत अपयश आल्याचेही त्यांनी मान्य केले.गांधी दोन आठवड्यांच्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. प्रिन्स्टन विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर राहुल गांधी म्हणाले की, रोजगार हा सक्षम करण्याचे, देशबांधणीच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करण्याचे साधन आहे. मला असे वाटते की मोदींचा उदय झाला आणि ट्रम्प सत्तेत आले, याचे मुख्य कारण हे भारतात आणि अमेरिकेतील बेरोजगारीत आहे.आमच्या देशात कोट्यवधींना रोजगार नाही व त्यांना भवितव्यही दिसत नाही. त्यामुळे त्यांना वेदना होतात आणि त्यांनी अशा प्रकारच्या नेत्यांना पाठिंबा दिला, असे सांगून गांधी म्हणाले की, बेरोजगारी आहे हा प्रश्नच कोणी मान्य करायला तयार नाही हीच एक समस्या आहे.ट्रम्प यांच्याबद्दल मला माहिती नाही. मी त्यांच्याविषयी फारसे बोलणार नाही. परंतु, आमचे पंतप्रधान पुरेशी रोजगार निर्मिती करीत नाहीत. गांधी यांनी तज्ज्ञ, व्यावसायिक नेते आणि अमेरिकेचे काँग्रेस नेते यांच्याशी झालेल्या भेटीत वारंवार बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. सध्या आम्ही पुरेसा रोजगार तयार करीत नाही. रोज ३० हजार नवे युवक रोजगाराच्या बाजारात दाखल होत आहेत; तरीही सरकार दररोज फक्त ५०० रोजगार तयार करीत आहे. यात आधीच प्रचंड प्रमाणावर असलेल्या बेरोजगारांचा समावेश नाही, असे गांधी याआधीच्या बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील भाषणात म्हणाले होते. (वृत्तसंस्था)>आमच्यावर रागावलेप्रिन्स्टनमधील भाषणात गांधी म्हणाले होते की, भारताला चीनशी स्पर्धा करण्यासाठी स्वत:त बदल करून घ्यावे लागतील. त्याचसाठी देशातील लोकांना रोजगारांची गरज आहे.आम्ही दररोज ३० हजार रोजगार निर्माण करू शकलो नाही, म्हणून रागावलेले लोक आता मोदींवरही रागावलेले आहेत. तो प्रश्न सोडवणे हा मध्यवर्ती भाग आहे. माझा मुख्य मुद्दा आहे तो हा की मोदी यांनी रोजगाराच्या प्रश्नालाच दुसरीकडे वळवले व बोट दुसरीकडेच दाखवत आहेत,असे गांधी म्हणाले.