शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चीनला टक्कर देण्यासाठी मोदींनी मांडली विकासाची त्रिसूत्री

By admin | Updated: June 8, 2014 19:01 IST

चीनला टक्कर देण्यासाठी देशाला कौशल्य, वेग आणि प्रमाण या त्रिसुत्रीची आवश्यकता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले आहे.

 ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ८ - भारताला चीनवर टक्कर द्यायची असेल तर कौशल्य, वेग आणि प्रमाण या त्रिसुत्रीवर भर द्यायची गरज आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे. केवळ पदवी घेऊन तरुणाई यशस्वी होणार नसून त्यांच्यात विशेष कौशल्य असणे गरजेचे आहे असेही मोदींनी म्हटले आहे. 

विवेक देबोरॉय यांच्या पुस्तकाचे रविवारी संध्याकाळी दिल्लीतील सात रेसकोर्स येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सध्या चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ई हे भारत दौ-यावर असतानाच मोदींनी चीनला आर्थिकदृष्ट्या टक्कर देण्यासाठी त्रिसूत्रीच मांडली. यात मोदींनी भारताच्या आर्थिक प्रगतीवर भाष्य केले. चीनला मागे टाकण्यासाठी देशात कौशल्य, वेग आणि प्रमाण या तीन गोष्टींवर भर द्यायची गरज आहे असे मत त्यांनी मांडले. देशात तरुणांची संख्या जास्त असून या तरुणांसाठी मनुष्यबळ विकासावर भर देणे गरजेचे आहे. केवळ पदवीचे प्रमाणपत्र घेऊन तरुण यशस्वी होणार नाही. त्यासाठी तरुणांनी विशेष कौशल्य आत्मसात करावे असे त्यांनी सांगितले. 

सौरउर्जेवर भर देण्यासोबत उर्जा क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण व्हायला हवे. जलसंवर्धन करण्याची आवश्यकता आहे असे सांगतानाच मोदी म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगवर भारताने पाश्चिमात्त्य देशाच्या दृष्टीने न बघता स्वतःची एक भूमिका घेऊन त्यादृष्टीने काम करावे.