शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मोदी तेरी गंगा मैली

By admin | Updated: April 6, 2017 16:20 IST

गंगा नदीला स्वच्छ करण्यासाठी आखलेली 300 कोटींची योजना फक्त कागदावरच राहिली असल्याचं चित्र आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली / कानपूर, दि. 6 - गंगा नदीला स्वच्छ करण्यासाठी आखलेली 300 कोटींची योजना फक्त कागदावरच राहिली असल्याचं चित्र आहे. केंद्र सरकारने मोठ्या गाज्यावाज्यासह नमामी गंगे योजनेस प्रारंभ केला होता. गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी 2018 ची डेडलाईन आखण्यात आली होती. मात्र मोदी सरकारची डेडलाईन संपायला आली असली तरी अद्याप योजनेची अंमलबजावणी सुरु झाली नसल्याचं दिसत आहे. याउलट गंगेतील विषारी कचरा, सांडपाणी वाढत चाललं आहे. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मध्यस्थी करावी लागली असल्याची माहिती सरकारी अधिका-यांकडून मिळाली आहे. 
 
महत्वाची गोष्ट म्हणजे मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या महत्वाच्या योजनांमध्ये गंगा स्वच्छतेचा समावेश होता. मात्र या योजनेसाठी देण्यात आलेला निधी खर्चच झाला नसल्याचं राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनमधील अधिका-याने सांगितलं आहे. राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन ही सरकारडून गठीत करण्यात आलेली समिती असून योजनेची पाहणी करत आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपा सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर गंगा नदी स्वच्छतेसाठी 300 कोटी खर्च करणार असल्याचं सांगितलं होतं. 2020 पर्यंत गंगा स्वच्छ करणार असल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं होतं. मात्र एप्रिल 2015 ते मार्च 2017 दरम्यान यासाठी फक्त 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 
 
जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनतर्फे प्रेझेंटेशन करण्यात आलं होतं. यावेळी गंगा नदेतील प्रदूषणाबाबत विस्तृत माहिती देण्यात आली होती. 
 
"2018 ची डेडलाईन पुर्ण करणं अशक्य असल्याचं", अधिका-याने सांगितलं आहे. "जर 2018 ची डेडलाईन पुर्ण करण्यासाठी आतापर्यंत अर्ध्याहून जास्त कच-याची विल्हेवाट लावणं आणि त्याकरिता प्लांट उभारणं गरजेचं होतं", असंही या अधिका-याने नाव उघड न करण्याच्या अटीखाली सांगितलं आहे. शहरांमध्ये निर्माण होणा-या कच-यापैकी तीन चतुर्थांश कचरा हा गंगेत वाहत असतो अशी माहिती प्रेझेंटेशनमध्ये देण्यात आली होती. 
 
गंगेला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे. देशातील तब्बल 80 टक्के म्हणजेच 100 कोटीहून जास्त हिंदू गंगेची पूजा करतात. गंगेत स्नान केल्याने आपली सर्व पापातून मुक्ती होते अशी मान्यता आहे. याच गंगा नदीच्या काठी नातेवाईकांचे अंत्यविधी पार पडतात, आणि नदीच्या पाण्यात अस्थींचं विसर्जन केलं जातं. 
 
आपलं गंगा नदी स्वच्छता मोहीम अयशस्वी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. ही मोहिम मोदींसाठी अत्यंत महत्वाची असून 2019 मध्ये होणा-या निवडणुकांआधी त्यांना आपलं काम आणि प्रगती दाखवायची आहे. आतापर्यंत काय कामगिरी केली आहे याची चाचपणी करण्यासाठी मोदींचे मुख्य सचिव मिश्रा यांनी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन अधिका-यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कामाची माहिती घेतली. 
 
वेळेत काम पुर्ण करण्याची जबाबदारी असलेल्या केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी मात्र यासंबंधी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. "आमच्या सर्व आशा संपल्या आहेत", अशी प्रतिक्रिया गंगा स्वच्छतेसाठी काम करत असलेल्या राकेश जैसवाल यांनी दिली आहे. 
 
गंगेच्या 100 मिलीलिटर पाण्यात 50 हजार हानिकारक विषाणू आढळून आले आहेत. आंघोळीच्या पाण्यासाठी शासनाने जे मानक निर्धारित केले आहे त्यापेक्षा विषाणूंची ही संख्या 10  हजार पट अधिक आहे. धोक्यात असलेल्या जगातील दहा नद्यांमध्ये गंगेचा समावेश असल्याचे वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडचे म्हणणे आहे.
 
पर्यावरण न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात सरकारला धारेवर धरत गंगेचा एक थेंबही स्वच्छ झाला नसल्याचं म्हणत खडसावलं होतं. लोकांचा पैसा खर्च करण्यावरुन न्यायालयाने त्यांना चांगलंच झापलं होतं. गेल्याच महिन्यात झालेल्या निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशात सत्ता मिळवली आहे. गंगेचा खूप मोठा भाग उत्तरप्रदेशातून जात असल्याने याठिकाणी  नव्या स्वच्छता मोहीम सुरु करणं मोदींसाठी सोपं आहे.