शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

निवडणुकीत मोदी स्वत:बद्दलच बोलत आहेत : राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचा मुद्दा बाजूला ठेऊन या निवडणुकीत स्वत:बद्दलच अधिक बोलत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी मोदी यांना लक्ष्य केले.

दाकोर (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचा मुद्दा बाजूला ठेऊन या निवडणुकीत स्वत:बद्दलच अधिक बोलत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी मोदी यांना लक्ष्य केले. दुस-या टप्प्यातील निवडणुकीच्या टप्प्यात त्यांनी आज येथे कृष्ण मंदिरात दर्शन घेतले.राहुल गांधी म्हणाले की, भाजपाने नर्मदेच्या मुद्द्यावर प्रचार सुरू केला, पण लोक म्हणाले की, आम्हाला नदीतून पाणी मिळत नाही. त्यानंतर, भाजपाने ओबीसीचा मुद्दा पुढे केला, पण ओबीसी म्हणाले की, भाजपाने आमच्यासाठी काही केले नाही. ते म्हणाले की, मी काल मोदीयांचे भाषण ऐकले. त्यात मोदी हे ९० टक्के स्वत:बाबतच बोलले आहेत. ही निवडणूक मोदी किंवा माझ्याबाबत नाही. भाजपा किंवा काँग्रेसबाबत नाही, तर ही निवडणूक गुजरातमधील नागरिकांच्या भविष्याबाबत आहे. पंतप्रधान मोदी भविष्यातील योजनांबाबत बोलत नाहीत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर गप्प आहेत. पटेल, दलित, अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्या आंदोलनाबाबत मोदी मौन का बाळगून आहेत? असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी चुकीचे शब्द वापरू नयेत. आमचा पक्ष प्रेमळ आणि गोड शब्दानेच भाजपाला पराभूत करेल, असेही ते म्हणाले.राहुल गांधी म्हणाले की, मी एका चहाच्या दुकानात बसलो होतो. हा चहाविक्रेता म्हणाला की, राहुलजी मी १०० रुपयांऐवजी आता फक्त ५० रुपयेच मिळवत आहे. मोदींमुळे आमचे ५० टक्के नुकसान होत आहे. अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या व्यवसायाचा मुद्दाही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. यापूर्वी ते ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असे म्हणत होते. मात्र, आता ते भ्रष्टाचाराबाबत शब्दही बोलत नाहीत, असेही ते म्हणाले.काँग्रेसला सरकार स्थापण्याची आशानवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याने काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची आशा आहे, असे मत पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केले.पहिल्या टप्प्यात शनिवारी २ कोटी १२ लाखांहून अधिक लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावे, हा सत्ताबदलाचा संकेत आहे.पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर हे स्पष्ट दिसत आहे की, परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. गुजरातमधील लोकांच्या आशीर्वादाने आमची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017