शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

मोदींनीच उलगडलं आपल्या तणावमुक्त जीवनाचं रहस्य

By admin | Updated: April 13, 2017 13:29 IST

पंतप्रधानपदी असतानाही कोणताही तणाव जाणवू न देता ते कसं काय काम करत असतील ? असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - पंतप्रधान नरेंद्र मोदींना असलेलं कामाचं व्यसन सर्वांनाच माहित आहे. दिवसातून तब्बल अठराहून जास्त तास मोदी काम करतात. इतकंच नाही तर लांबचा प्रवास करायचा असल्यास हॉटेलमध्ये झोपण्यापेक्षा विमानात झोपून वेळं वाचवणं ते पसंत करतात. यामुळे वेळेची होणारी बचत पुढे कामाला येते असं त्यांचं म्हणणं आहे. सतत काम करत असतानाही त्यांना तणाव जाणवत नाही. त्यांच्या या ऊर्जेचं सर्वांनाच कौतुक वाटत असतं. पंतप्रधानपदी असतानाही कोणताही तणाव जाणवू न देता ते कसं काय काम करत असतील ? असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. 
 
एका महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत त्यांना ट्विटरवर टॅग केलं होतं. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल भारत दौ-यावर आले असताना त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवसभरातील कार्यक्रमांची यादी या महिलेने ट्विटरवर टाकली होती. त्यानुसार सकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटण्यापासून ते एनडीएमधील मित्रपक्षांसोबत डीनर आणि मध्यरात्रीपर्यंत होणारी चर्चा असा एकूण कार्यक्रम होता. 
 
या महिलेने मोदींचा हा दिनक्रम ट्विट करत "आपण सगळे सतत तणाव असल्याची तक्रार करत असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वेळापत्र पहा", असं म्हटलं होतं. या महिलेने मोदींनाही टॅग केलं होतं.
 
मोदींनी या ट्विटची दखल घेत, "125 कोटी भारतीयांसाठी काम करण तणावपुर्ण नसून समाधानकारक असतं", अशी प्रतिक्रिया दिली. 
स्वत: मोदी यांनी 2012 रोजी दिलेल्या मुलाखतीत आपण दिवसेंदिवस कामाच्या व्यसनी जात असल्याचं कबूल केलं होतं. "डॉक्टरांनी मला पाच तासांची झोप घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. पण मी जास्तीत जास्त तीन ते चार तास झोपतो. तितक्या वेळातही मला अतिशय शांत झोप लागते", असं मोदी त्या मुलाखतीत बोलले होते. "सकाळी उठल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत माझ्यात तितकीच ऊर्जा असते. योगा आणि प्राणायम यामामगचं गुपित असावं. मी रोज न चुकता योगा आणि प्राणायम करतो. जेव्हा कधी मला तणाव जाणवतो मी दिर्घ श्वास घेतो आणि फ्रेश होतो", असंही मोदी बोलले होते. 
 
इतक्या वर्षांमध्ये काही बदललं असेल तर ते म्हणजे मोदींचं वेळापत्रक. पंतप्रधान झाल्यापासून मोदी व्यस्त झाले आहेत. त्यांच्या या सवयीमुळे इतर मंत्र्यांचीही झोप उडाली आहे. "आमचे पंतप्रधान स्वत: झोपत नाहीत, आणि आम्हालाही झोपत नाहीत", असं वैंकय्या नायडू मिश्किलपणे बोलले होते.