शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मोदींनीच उलगडलं आपल्या तणावमुक्त जीवनाचं रहस्य

By admin | Updated: April 13, 2017 13:29 IST

पंतप्रधानपदी असतानाही कोणताही तणाव जाणवू न देता ते कसं काय काम करत असतील ? असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - पंतप्रधान नरेंद्र मोदींना असलेलं कामाचं व्यसन सर्वांनाच माहित आहे. दिवसातून तब्बल अठराहून जास्त तास मोदी काम करतात. इतकंच नाही तर लांबचा प्रवास करायचा असल्यास हॉटेलमध्ये झोपण्यापेक्षा विमानात झोपून वेळं वाचवणं ते पसंत करतात. यामुळे वेळेची होणारी बचत पुढे कामाला येते असं त्यांचं म्हणणं आहे. सतत काम करत असतानाही त्यांना तणाव जाणवत नाही. त्यांच्या या ऊर्जेचं सर्वांनाच कौतुक वाटत असतं. पंतप्रधानपदी असतानाही कोणताही तणाव जाणवू न देता ते कसं काय काम करत असतील ? असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. 
 
एका महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत त्यांना ट्विटरवर टॅग केलं होतं. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल भारत दौ-यावर आले असताना त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवसभरातील कार्यक्रमांची यादी या महिलेने ट्विटरवर टाकली होती. त्यानुसार सकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटण्यापासून ते एनडीएमधील मित्रपक्षांसोबत डीनर आणि मध्यरात्रीपर्यंत होणारी चर्चा असा एकूण कार्यक्रम होता. 
 
या महिलेने मोदींचा हा दिनक्रम ट्विट करत "आपण सगळे सतत तणाव असल्याची तक्रार करत असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वेळापत्र पहा", असं म्हटलं होतं. या महिलेने मोदींनाही टॅग केलं होतं.
 
मोदींनी या ट्विटची दखल घेत, "125 कोटी भारतीयांसाठी काम करण तणावपुर्ण नसून समाधानकारक असतं", अशी प्रतिक्रिया दिली. 
स्वत: मोदी यांनी 2012 रोजी दिलेल्या मुलाखतीत आपण दिवसेंदिवस कामाच्या व्यसनी जात असल्याचं कबूल केलं होतं. "डॉक्टरांनी मला पाच तासांची झोप घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. पण मी जास्तीत जास्त तीन ते चार तास झोपतो. तितक्या वेळातही मला अतिशय शांत झोप लागते", असं मोदी त्या मुलाखतीत बोलले होते. "सकाळी उठल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत माझ्यात तितकीच ऊर्जा असते. योगा आणि प्राणायम यामामगचं गुपित असावं. मी रोज न चुकता योगा आणि प्राणायम करतो. जेव्हा कधी मला तणाव जाणवतो मी दिर्घ श्वास घेतो आणि फ्रेश होतो", असंही मोदी बोलले होते. 
 
इतक्या वर्षांमध्ये काही बदललं असेल तर ते म्हणजे मोदींचं वेळापत्रक. पंतप्रधान झाल्यापासून मोदी व्यस्त झाले आहेत. त्यांच्या या सवयीमुळे इतर मंत्र्यांचीही झोप उडाली आहे. "आमचे पंतप्रधान स्वत: झोपत नाहीत, आणि आम्हालाही झोपत नाहीत", असं वैंकय्या नायडू मिश्किलपणे बोलले होते.