शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

चर्चेविनाच बजेटला मंजुरी?, मोदी नवा इतिहास रचण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 04:54 IST

कोणत्याही चर्चेविना यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मंजूर करण्याच्या प्रयत्नात मोदी सरकार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना मंगळवारी लिहिलेल्या पत्रात केला आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : कोणत्याही चर्चेविना यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मंजूर करण्याच्या प्रयत्नात मोदी सरकार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना मंगळवारी लिहिलेल्या पत्रात केला आहे. अशा रितीने संसदेत मोदी एक नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे, असेही उपरोधिकपणे या पत्रात म्हटले आहे.लोकसभेच्या सुधारित कार्यसूचीमध्ये २६व्या क्रमांकावर असलेला २०१८-१९च्या अर्थसंकल्पाचा विषय गिलोटीन (चर्चारोधाची तरतूद) केला गेला. त्यामुळे कोणत्याही चर्चेविना सरकार हा अर्थसंकल्प मंजूर करून घेऊ पाहात आहे, हे स्पष्ट होते. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देणे, बँक घोटाळे या मुद्द्यांवरून गदारोळ माजल्याने काहीही कामकाज होऊ शकले नाही. अर्थसंकल्पाला मंजुरी देऊन सरकार हे अधिवेशन लवकर संपविण्याच्या प्रयत्नात आहे, हे स्पष्ट होत आहे.सुधारित कार्यसूचीमधील ‘गिलोटिन’ला आक्षेप घेत काँग्रेसचे नेता मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मोदी सरकार लोकशाहीला संपविण्याचा प्रयत्न करत आहे. तेलगू देसम पक्ष, द्रमुक हे एनडीएतील घटक पक्षच गदारोळ माजवित आहेत. त्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी, असे सरकारला वाटत नाही.रेल्वे, कृषी, सामाजिक न्याय, आरोग्य, युवा कल्याण, रस्ते वाहतूक या खात्यांशी निगडित मुद्द्यांवर चर्चेचे वेळापत्रक आखण्याचा निर्णय पाच मार्चच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र केंद्रीय अर्थसंकल्प व ‘गिलोटिन’ याबाबत या बैठकीत काहीही ठरलेले नव्हते. एखाद्या विषयावर ‘गिलोटीन’ करायचे असेल, तर त्याची पूर्वकल्पना देण्याची संसदीय परंपराही यावेळी पाळण्यात आली नाही. अथसंकल्प चर्चेविना लोकसभेत मंजूर होऊ नये, यासाठी लोकसभा अध्यक्षांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षांनी पत्रात म्हटले आहे़भाजपाने मात्र संसदेचे कामकाम ठप्प होण्यास काँगेस जबाबदार असल्याचा आरोप केला. पंतप्रधान मोदी, अध्यक्ष अमित शहा याच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राज्यसभा निवडणुकांची बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार म्हणाले की, ही कोंडी फुटावी यासाठी सरकार विविध पक्षांशी चर्चा करत आहे.सोेनिया गांधी यांनी विरोधकांना भोजनास बोलविल्याबद्दल अनंतकुमार म्हणाले की, त्यांनी कोणालाही कितीही ‘डिनर’ दिला तरी मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाच ‘विनर’ बनणार आहे. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यावरील चर्चेपासून काँग्रेस पळ काढत आहे. आपली गुपिते बाहेर येण्याची त्यांना भीती आहे.>लोकसभेचे कामकाज ठप्पगदारोळामुळे लोकसभेत वित्त आणि विनियोजन विधेयक २०१८ चर्चेसाठी सादर होऊ शकले नाही. टीडीपी, वायएसआर काँग्रेस, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, टीआरएस आणि अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली आणि ते वेलमध्ये आले. गदारोळ थांबत नसल्याचे पाहून अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. त्यामुळे मंगळवारी सलग सातव्या दिवशी कामकाज होऊ शकले नाही.

टॅग्स :LoksabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी