शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

मोदी अप्रामाणिक पंतप्रधान; राहुल गांधी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 06:20 IST

तेलंगणात चंद्राबाबू नायडू यांच्यासमवेत दौरा

हैदराबाद : आपण प्रामाणिक असल्याचे सांगत, प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे, बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे, शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, दहशतवाद संपवून टाकण्याचे, पाकिस्तानला धडा शिकवण्याचे अशी अनेक आश्वासने नरेंद्र मोदी यांनी २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात दिली. पण त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांना प्रामाणिक म्हणणेही चुकीचे ठरेल, असा हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी चढवला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याविषयी ते म्हणाले की, असंख्या आश्वासने द्यायची आणि त्यापैकी कोणतेच पूर्ण करायचे नाही, हीच त्यांची कार्यपद्धती असल्याचे चार वर्षांत जनतेला लक्षात आले आहे.पंतप्रधानांना सामान्य जनतेला दिलेली कोणतीच आश्वासने पूर्ण केली नाहीत, पण देशातील १५ बड्या उद्योगपतींचा फायदा करून दिला, मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी यांना पळून जायला मदत केली, अनिल अंबानी यांना मोठे कंत्राट मिळवून दिले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी व तेलगू देसमचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू दोन दिवस तेलंगणात एकत्र प्रचार करीत आहेत.तेलगू देसम आतापर्यंत कायमच काँग्रेसच्या विरोधात राहिला आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण आम्हा दोन्ही पक्षांची विचारसरणी समान आहे. शिवाय मोदी सरकार देशातील सर्व घटनात्मक संस्थांना संपवून टाकण्यास निघाली असल्याने तेलगू देसम व काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचा दावा चंद्राबाबू यांनी केला.

चंद्राबाबू नायडू यांनी खम्माम येथील प्रचारसभेत ईव्हीएमबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला मतदारांना दिला. या वेळी व्यासपीठावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेही होते. काँग्रेसनेही ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केल्या असून, मतपत्रिकांचा वापर करावा, अशी काँग्रैसची कायमची मागणी आहे. कोणत्याही यंत्रात छेडछाड शक्य असते. ईव्हीएम हेही यंत्रच आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान केल्यानंतर आपण ज्यांना मत दिले, ते त्यांनाच गेले आहे का, हे व्हीव्हीपॅटवर येणाºया चिठ्ठीत तपासून पाहावे. आक्षेपार्ह आढळल्यास मतदान अधिकाºयांना त्याची कल्पना द्यावी, असे चंद्राबाबू म्हणाले.

देशातील सर्वच स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचे काम मोदी सरकार करीत असून, सर्वच लोकशाहीवादी राजकीय पक्षांनी त्यांना बाजूला सारून एक नवा अध्याय रचावा, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपाला वगळून आघाडी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे केसीआर सांगत असले तरी टीआरएस-एमआयएमची आघाडी कशाच्या आधारे झाली आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. टीआरएस व एमआयएमला मत म्हणजे त्याचा फायदा भाजपलाच होणार असल्याने ते भाजपला मत आहे, असेही चंद्राबाबू नायडू म्हणाले.लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त केली जात आहेच्मेहबूब नगरमधील सभेत राहुल गांधी यांनीही भाजपा व टीआरएसवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकार देशातील सर्व महत्त्वाच्या संस्था मोडीत काढीत असून, लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त केली जात आहे. ज्या यंत्रणेवर देशाची एकता टिकून आहे, तिलाच धक्का पोचवला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.च्टीआरएसला विकास करायचा असता, तर त्यांनी मोदी व भाजपाला पाठिंबा दिला नसता. जे लोक लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी मनाला वाटेल, ते करीत आहेत, त्यांना बाजूला सारून लोकशाहीवादी उमेदवारांना जनतेने साथ द्यावी, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी