शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोदी अप्रामाणिक पंतप्रधान; राहुल गांधी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 06:20 IST

तेलंगणात चंद्राबाबू नायडू यांच्यासमवेत दौरा

हैदराबाद : आपण प्रामाणिक असल्याचे सांगत, प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे, बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे, शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, दहशतवाद संपवून टाकण्याचे, पाकिस्तानला धडा शिकवण्याचे अशी अनेक आश्वासने नरेंद्र मोदी यांनी २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात दिली. पण त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांना प्रामाणिक म्हणणेही चुकीचे ठरेल, असा हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी चढवला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याविषयी ते म्हणाले की, असंख्या आश्वासने द्यायची आणि त्यापैकी कोणतेच पूर्ण करायचे नाही, हीच त्यांची कार्यपद्धती असल्याचे चार वर्षांत जनतेला लक्षात आले आहे.पंतप्रधानांना सामान्य जनतेला दिलेली कोणतीच आश्वासने पूर्ण केली नाहीत, पण देशातील १५ बड्या उद्योगपतींचा फायदा करून दिला, मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी यांना पळून जायला मदत केली, अनिल अंबानी यांना मोठे कंत्राट मिळवून दिले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी व तेलगू देसमचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू दोन दिवस तेलंगणात एकत्र प्रचार करीत आहेत.तेलगू देसम आतापर्यंत कायमच काँग्रेसच्या विरोधात राहिला आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण आम्हा दोन्ही पक्षांची विचारसरणी समान आहे. शिवाय मोदी सरकार देशातील सर्व घटनात्मक संस्थांना संपवून टाकण्यास निघाली असल्याने तेलगू देसम व काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचा दावा चंद्राबाबू यांनी केला.

चंद्राबाबू नायडू यांनी खम्माम येथील प्रचारसभेत ईव्हीएमबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला मतदारांना दिला. या वेळी व्यासपीठावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेही होते. काँग्रेसनेही ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केल्या असून, मतपत्रिकांचा वापर करावा, अशी काँग्रैसची कायमची मागणी आहे. कोणत्याही यंत्रात छेडछाड शक्य असते. ईव्हीएम हेही यंत्रच आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान केल्यानंतर आपण ज्यांना मत दिले, ते त्यांनाच गेले आहे का, हे व्हीव्हीपॅटवर येणाºया चिठ्ठीत तपासून पाहावे. आक्षेपार्ह आढळल्यास मतदान अधिकाºयांना त्याची कल्पना द्यावी, असे चंद्राबाबू म्हणाले.

देशातील सर्वच स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचे काम मोदी सरकार करीत असून, सर्वच लोकशाहीवादी राजकीय पक्षांनी त्यांना बाजूला सारून एक नवा अध्याय रचावा, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपाला वगळून आघाडी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे केसीआर सांगत असले तरी टीआरएस-एमआयएमची आघाडी कशाच्या आधारे झाली आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. टीआरएस व एमआयएमला मत म्हणजे त्याचा फायदा भाजपलाच होणार असल्याने ते भाजपला मत आहे, असेही चंद्राबाबू नायडू म्हणाले.लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त केली जात आहेच्मेहबूब नगरमधील सभेत राहुल गांधी यांनीही भाजपा व टीआरएसवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकार देशातील सर्व महत्त्वाच्या संस्था मोडीत काढीत असून, लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त केली जात आहे. ज्या यंत्रणेवर देशाची एकता टिकून आहे, तिलाच धक्का पोचवला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.च्टीआरएसला विकास करायचा असता, तर त्यांनी मोदी व भाजपाला पाठिंबा दिला नसता. जे लोक लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी मनाला वाटेल, ते करीत आहेत, त्यांना बाजूला सारून लोकशाहीवादी उमेदवारांना जनतेने साथ द्यावी, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी