शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मोदी हे ‘मौनी बाबा’; खरगेंची टीका, महाराष्ट्रातील हिंसाचारावरून संसदेत रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 04:22 IST

कोरेगाव भीमा वादाच्या निमित्ताने राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत रणकंदन झाले. ज्या विषयांवर पंतप्रधानांना बोलायचे नसते, त्यावेळी ते ‘मौनी बाबा’ होतात, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

अमृता कदमनवी दिल्ली - कोरेगाव भीमा वादाच्या निमित्ताने राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत रणकंदन झाले. ज्या विषयांवर पंतप्रधानांना बोलायचे नसते, त्यावेळी ते ‘मौनी बाबा’ होतात, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. महाराष्ट्रातील हिंसाचारावर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.लोकसभेत शून्य प्रहरात हा प्रश्न खरगेंनी उपस्थित केला. दरवर्षी दलित बांधव तिथे जमा होतात. पण असा हिंसाचार कधीच झाला नव्हता. याचवर्षी अशी स्थिती का उद्भवली? हिंसाचाराला खतपाणी कोणी घातले? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याच्याशी संबंधित संघटना हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची मागणी त्यांनीकेली. विरोधक आणि सत्ताधाºयांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.महाराष्ट्रात जातीय संघर्ष कधीच नव्हता. या संघर्षाला मराठा विरुद्ध दलित असा जातीय रंग दिला जात आहे.- शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनाराज्यसभाही तहकूबराज्यसभेतही कोरेगाव भीमाचे पडसाद उमटले. काँग्रेस सदस्या रजनी पाटील आणि आनंद शर्मा तसेच बसपचे खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी याप्रकरणी चर्चा व्हावी, अशी मागणी वारंवार केली. भाजपशासित राज्यांमध्ये दलितांवर अत्याचार वाढत असल्याचाही आरोप सतीशचंद्र मिश्रांनी केला. सभापती व्यंकय्या नायडूंनी चर्चेची मागणी परवानगी नाकारल्यानंतर गोंधळ सुरू झाला. त्यातच कामकाज वाहून गेले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी