शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

मोदी हे ‘मौनी बाबा’; खरगेंची टीका, महाराष्ट्रातील हिंसाचारावरून संसदेत रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 04:22 IST

कोरेगाव भीमा वादाच्या निमित्ताने राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत रणकंदन झाले. ज्या विषयांवर पंतप्रधानांना बोलायचे नसते, त्यावेळी ते ‘मौनी बाबा’ होतात, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

अमृता कदमनवी दिल्ली - कोरेगाव भीमा वादाच्या निमित्ताने राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत रणकंदन झाले. ज्या विषयांवर पंतप्रधानांना बोलायचे नसते, त्यावेळी ते ‘मौनी बाबा’ होतात, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. महाराष्ट्रातील हिंसाचारावर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.लोकसभेत शून्य प्रहरात हा प्रश्न खरगेंनी उपस्थित केला. दरवर्षी दलित बांधव तिथे जमा होतात. पण असा हिंसाचार कधीच झाला नव्हता. याचवर्षी अशी स्थिती का उद्भवली? हिंसाचाराला खतपाणी कोणी घातले? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याच्याशी संबंधित संघटना हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची मागणी त्यांनीकेली. विरोधक आणि सत्ताधाºयांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.महाराष्ट्रात जातीय संघर्ष कधीच नव्हता. या संघर्षाला मराठा विरुद्ध दलित असा जातीय रंग दिला जात आहे.- शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनाराज्यसभाही तहकूबराज्यसभेतही कोरेगाव भीमाचे पडसाद उमटले. काँग्रेस सदस्या रजनी पाटील आणि आनंद शर्मा तसेच बसपचे खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी याप्रकरणी चर्चा व्हावी, अशी मागणी वारंवार केली. भाजपशासित राज्यांमध्ये दलितांवर अत्याचार वाढत असल्याचाही आरोप सतीशचंद्र मिश्रांनी केला. सभापती व्यंकय्या नायडूंनी चर्चेची मागणी परवानगी नाकारल्यानंतर गोंधळ सुरू झाला. त्यातच कामकाज वाहून गेले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी