शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

मोदी हे ‘मौनी बाबा’; खरगेंची टीका, महाराष्ट्रातील हिंसाचारावरून संसदेत रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 04:22 IST

कोरेगाव भीमा वादाच्या निमित्ताने राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत रणकंदन झाले. ज्या विषयांवर पंतप्रधानांना बोलायचे नसते, त्यावेळी ते ‘मौनी बाबा’ होतात, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

अमृता कदमनवी दिल्ली - कोरेगाव भीमा वादाच्या निमित्ताने राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत रणकंदन झाले. ज्या विषयांवर पंतप्रधानांना बोलायचे नसते, त्यावेळी ते ‘मौनी बाबा’ होतात, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. महाराष्ट्रातील हिंसाचारावर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.लोकसभेत शून्य प्रहरात हा प्रश्न खरगेंनी उपस्थित केला. दरवर्षी दलित बांधव तिथे जमा होतात. पण असा हिंसाचार कधीच झाला नव्हता. याचवर्षी अशी स्थिती का उद्भवली? हिंसाचाराला खतपाणी कोणी घातले? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याच्याशी संबंधित संघटना हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची मागणी त्यांनीकेली. विरोधक आणि सत्ताधाºयांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.महाराष्ट्रात जातीय संघर्ष कधीच नव्हता. या संघर्षाला मराठा विरुद्ध दलित असा जातीय रंग दिला जात आहे.- शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनाराज्यसभाही तहकूबराज्यसभेतही कोरेगाव भीमाचे पडसाद उमटले. काँग्रेस सदस्या रजनी पाटील आणि आनंद शर्मा तसेच बसपचे खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी याप्रकरणी चर्चा व्हावी, अशी मागणी वारंवार केली. भाजपशासित राज्यांमध्ये दलितांवर अत्याचार वाढत असल्याचाही आरोप सतीशचंद्र मिश्रांनी केला. सभापती व्यंकय्या नायडूंनी चर्चेची मागणी परवानगी नाकारल्यानंतर गोंधळ सुरू झाला. त्यातच कामकाज वाहून गेले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी