शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मोदींनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्तच केली! मित्र, सहका-यांनी बँंका लुटल्या : राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:55 IST

पीएनबीचा ११,४०० कोटींचा घोटाळा व त्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीचे देशातून पलायन यावरून थेट तोफ डागताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची वित्तीय व्यवस्था उद््ध्वस्त केल्याचा आरोप शनिवारी केला.

नवी दिल्ली : पीएनबीचा ११,४०० कोटींचा घोटाळा व त्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीचे देशातून पलायन यावरून थेट तोफ डागताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची वित्तीय व्यवस्था उद््ध्वस्त केल्याचा आरोप शनिवारी केला.काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मोदी यांनी त्यांच्या कृतींनी देशाची वित्तीय व्यवस्था बरबाद केली आहे. त्यांनी लोकांच्या खिशातून पैसे काढून घेऊन ते बँकांमध्ये घातले. आता त्यांचेमित्र व सहकारी ते पैसे बँकांमधून लुटून नेत आहेत.सुकाणू समितीची बैठकराहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करून नियुक्त केलेल्या सुकाणू समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत ५ मार्चपूर्वी पक्षाचे अधिवेशन घेण्याबाबत चर्चा झाली. राहुल गांधी यांची पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाली असली तरी त्यावर शिक्कामोर्तब काँग्रेसच्या अधिवेशनात होईल. सुकाणू समितीच्या आजच्या बैठकीस यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, गुलाब नबी आझाद, ए. के. अँथनी, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आदी नेते उपस्थित होते.पक्षाची नवीन कार्यकारिणी अधिवेशनात निवडली जाईल. राहुल गांधी यांनी सध्याची कार्यकारिणी रद्द करताना ३५ सदस्यांची सुकाणू समिती नेमली. कार्यकारिणीचे सर्व सदस्य सुकाणू समितीचेही सदस्य असले तरी त्यातून अमरिंदर सिंग, विलास मुत्तेमवार, आर. के. धवन, शिवाजीराव देशमुख, मोहसिना किडवाई, एम.व्ही. राजशेखरन या कायम निमंत्रितांना तसेच सर्व विशेष निमंत्रितांना वगळले आहे.सुकाणू समितीचे इतर सदस्यबी. के. हरिप्रसाद, डॉ. सी. पी. जोशी, दिग्विजय सिंग, हेमो पूर्वो सैकिया, जनार्दन द्विवेदी, कमल नाथ, मोहन प्रकाश, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, सुशीला तिरिया, अशोक गेहलोत, के. सी. वेणुगोपाळ, अविनाश पांडे, सुशीलकुमार शिंदे, दीपक बाबरिया, पी. सी. चाको, आशा कुमारी, डॉ. ए. चेल्ला कुमार, आर.पी.एन. सिंग, पी. एल. पुनिया, आर. सी. खुंटाई, डॉ. कर्णसिंग, पी. चिदम्बरम, आॅस्कर फर्नांडिस, आनंद शर्मा व रणदीप सूरजेवाला.रोखठोक उत्तरे द्याया घोटाळयाचे खापर काँग्रेस व संपुआ सरकारच्या माथी मारून भाजपा मूळ मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करीत आहे, असे सांगून राहुल गांधी असेही म्हणाले की, अत्यंत वरच्या पातळीवरून संरक्षण असल्याखेरीज एवढा मोठा घोटाळा होऊच शकला नसता. सरकारमधील मंडळींना पूर्वकल्पना असल्याखेरीज हे घडू शकत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी मुख्य विषयाला बगल न देता आम्ही विचारलेल्या प्रश्नांना रोखठोक उत्तरे द्यावीत, असेही ते म्हणाले.भाजपाचा पलटवारपंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा यूपीए सरकारच्या काळातीलअसून, त्यांनी केलेली पापे धुवून काढण्याचे काम आम्हाला करावे लागत आहे, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, नीरव मोदी याच्या एका कंपनीशी काँग्रैसचे नेते अभिषेक सिंघवी यांच्या पत्नी अनिता यांचा संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला.अब्रुनुकसानीचादावा करूनिर्मला सीतारामन यांच्या आरोपांचा अभिषेक सिंघवी यांनी लगेच स्पष्ट शब्दांत इन्कार केला. माझी पत्नी वा कुटुंबातील कोणाचाही गीतांजली ज्वेलर्सची काडीमात्र संबंध नाही, असे सांगतानाच सिंघवी यांनी खोट्या माहितीबद्दल आपण निर्मला सीताराम यांच्यावर अब्रनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशाराही दिला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी