शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मोदी सरकारकडून जनतेच्या अवास्तव अपेक्षा - राजन

By admin | Updated: May 20, 2015 16:32 IST

मोदी सरकारने अपेक्षाभंग केल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली असतानाच रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिलासा देणारे विधान केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - मोदी सरकारने अपेक्षाभंग केल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली असतानाच रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिलासा देणारे विधान केले आहे. जनतेने मोदी सरकारकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या असून कोणत्याही व्यक्तीकडून अशा अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचेच आहे असे सांगत रघुराम राजन यांनी मोदी सरकारची पाठराखण केली आहे. 
मोदी सरकारला सत्तेवर येऊन वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी देशातील जनतेला अद्यापही अच्छे दिनची प्रतिक्षा करावी लागत आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीका सुरु केली असून चोहोबाजूंनी सरकारची कोंडी केली जात आहे. पण आता मोदी सरकारला दिलासा देण्यासाठी रघुराम राजन मैदानात उतरले आहेत. न्यूयॉर्कमधील इकॉनोमिक क्लब येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले, लोकांच्या आशा अपेक्षांचे ओझं घेऊन मोदी सरकार सत्तेवर आले. लोकांच्या नजरेत मोदींची प्रतिमा 'रोनाल्ड रिगन ऑन व्हाईट हॉर्स'सारखी होती. मोदी सत्तेवर येताच देश विकासाच्या मार्गावर सुस्साट धावेल असे त्यांना वाटत होते, पण अशी आशा ठेवणे अयोग्य आहे असे त्यांनी नमूद केले. जीएसटी, भूसंपादन असे महत्त्वाचे विधेयक सरकारने आणत असून गुंतवणूक, उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी करप्रणालीतही सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.