शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

मोदी सरकारकडून जनतेच्या अवास्तव अपेक्षा - राजन

By admin | Updated: May 20, 2015 16:32 IST

मोदी सरकारने अपेक्षाभंग केल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली असतानाच रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिलासा देणारे विधान केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - मोदी सरकारने अपेक्षाभंग केल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली असतानाच रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिलासा देणारे विधान केले आहे. जनतेने मोदी सरकारकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या असून कोणत्याही व्यक्तीकडून अशा अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचेच आहे असे सांगत रघुराम राजन यांनी मोदी सरकारची पाठराखण केली आहे. 
मोदी सरकारला सत्तेवर येऊन वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी देशातील जनतेला अद्यापही अच्छे दिनची प्रतिक्षा करावी लागत आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीका सुरु केली असून चोहोबाजूंनी सरकारची कोंडी केली जात आहे. पण आता मोदी सरकारला दिलासा देण्यासाठी रघुराम राजन मैदानात उतरले आहेत. न्यूयॉर्कमधील इकॉनोमिक क्लब येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले, लोकांच्या आशा अपेक्षांचे ओझं घेऊन मोदी सरकार सत्तेवर आले. लोकांच्या नजरेत मोदींची प्रतिमा 'रोनाल्ड रिगन ऑन व्हाईट हॉर्स'सारखी होती. मोदी सत्तेवर येताच देश विकासाच्या मार्गावर सुस्साट धावेल असे त्यांना वाटत होते, पण अशी आशा ठेवणे अयोग्य आहे असे त्यांनी नमूद केले. जीएसटी, भूसंपादन असे महत्त्वाचे विधेयक सरकारने आणत असून गुंतवणूक, उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी करप्रणालीतही सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.