शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था विस्कटली, मनमोहन सिंग यांचा घणाघाती आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 02:07 IST

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थव्यवस्थेत गोंधळ घालून ठेवला. अर्थव्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कटून टाकली आहे. दोन कोटी रोजगारांची निर्मिती व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासारखी पोकळ स्वप्ने दाखवण्याचे काम केले, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सरकारवर हल्ला केला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थव्यवस्थेत गोंधळ घालून ठेवला. अर्थव्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कटून टाकली आहे. दोन कोटी रोजगारांची निर्मिती व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासारखी पोकळ स्वप्ने दाखवण्याचे काम केले, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सरकारवर हल्ला केला.काँग्रेसच्या ८४ व्या खुल्या अधिवेशनात रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर मनमोहन सिंग यांनी टीका केली. मोदी सरकार जे काही आश्वासने देत आहे, ते ‘मुंगेरीलाल के हसीं सपने’ यापेक्षा कमी नाहीत. शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आणि प्रत्यक्ष कृषि विकास दर अशा अनेक समस्या आज अर्थव्यवस्थेसमोर आ वासून उभ्या आहेत, त्याकडे मात्र सध्याचे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा टोलाही डॉ. सिंग यांनी लगावला.आज आपल्यासमोर संधी आहेत, तशीच आव्हानेही आहेत. पण आव्हानांचा सामना कसा करतो आणि संधीचा लाभ कसा घेतो, हे पाहणे गरजेचे आहे. काँग्रेसच अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढू शकेल, असा विश्वासही डॉ. सिंग यांनी व्यक्त केला.जम्मू आणि काश्मीरच्या वादाला चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप केला. अडीच युद्धे लढण्याची सरकारची भाषा म्हणजे असेच पोकळ आश्वासन आहे, असे ते म्हणाले. सिंग यांनी परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्यांवर भाष्य केले तेव्हा पक्ष नेत्यांनी टाळ््यांच्या कडकडाटाने व उभे राहून त्यांना दाद दिली.संरक्षणावर देशाच्या सकल देशी उत्पादनाचा (जीडीपी) केवळ १.६ टक्के भागच खर्च केला. देशाच्या सुरक्षेला जी आव्हाने आहेत त्यांना या खर्चातून तोंड दिले जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले.>परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर असे अनेक मुद्दे आहेत की, ज्यांना मोदी सरकारने अतिशय ढिसाळपणे हाताळले, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न मोदी सरकारने जसे चुकीच्या पद्धतीने हाताळला, तसे यापूर्वी कधी झाले नव्हते, हे आम्ही मान्य केलेच पाहिजे.सरकारच्या दोन शाखा परस्परांच्या विरोधात काम करीत असून, वातावरण दिवसेंदिवस चिघळत आहे, असे सिंग म्हणाले. सीमेपलीकडून होत असलेला दहशतवाद असेल की, देशांतर्गतचा दहशतवाद किंवा अंतर्गत बंडखोरी आमच्या देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, हे स्पष्टच आहे. हे आजचे प्रश्न असून, प्रत्येक नागरिकासाठी ते मोठ्याच काळजीचे आहेत, असे ते म्हणाले.>सिद्धू यांनी मागितली माफीनवज्योत सिंग सिद्धू यांनी अधिवेशनात डॉ. मनमोहन सिंग यांची माफी मागितली. तुम्हाला ओळखण्यासाठी मला दहा वर्षे लागली. तुम्ही सरदार आहात, असरदारही आहात, असे म्हणत, त्यांनी डॉ. सिंग यांचे चरणस्पर्शही केले.काँग्रेस-राष्ट्रवादीला करावा लागेल त्याग : पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीवर जोर देताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जर दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर, पराभवाचा धोका आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांना त्याग करावा लागेल. जेणेकरुन भाजपला रोखले जाऊ शकेल.

टॅग्स :congressकाँग्रेस