शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था विस्कटली, मनमोहन सिंग यांचा घणाघाती आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 02:07 IST

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थव्यवस्थेत गोंधळ घालून ठेवला. अर्थव्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कटून टाकली आहे. दोन कोटी रोजगारांची निर्मिती व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासारखी पोकळ स्वप्ने दाखवण्याचे काम केले, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सरकारवर हल्ला केला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थव्यवस्थेत गोंधळ घालून ठेवला. अर्थव्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कटून टाकली आहे. दोन कोटी रोजगारांची निर्मिती व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासारखी पोकळ स्वप्ने दाखवण्याचे काम केले, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सरकारवर हल्ला केला.काँग्रेसच्या ८४ व्या खुल्या अधिवेशनात रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर मनमोहन सिंग यांनी टीका केली. मोदी सरकार जे काही आश्वासने देत आहे, ते ‘मुंगेरीलाल के हसीं सपने’ यापेक्षा कमी नाहीत. शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आणि प्रत्यक्ष कृषि विकास दर अशा अनेक समस्या आज अर्थव्यवस्थेसमोर आ वासून उभ्या आहेत, त्याकडे मात्र सध्याचे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा टोलाही डॉ. सिंग यांनी लगावला.आज आपल्यासमोर संधी आहेत, तशीच आव्हानेही आहेत. पण आव्हानांचा सामना कसा करतो आणि संधीचा लाभ कसा घेतो, हे पाहणे गरजेचे आहे. काँग्रेसच अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढू शकेल, असा विश्वासही डॉ. सिंग यांनी व्यक्त केला.जम्मू आणि काश्मीरच्या वादाला चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप केला. अडीच युद्धे लढण्याची सरकारची भाषा म्हणजे असेच पोकळ आश्वासन आहे, असे ते म्हणाले. सिंग यांनी परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्यांवर भाष्य केले तेव्हा पक्ष नेत्यांनी टाळ््यांच्या कडकडाटाने व उभे राहून त्यांना दाद दिली.संरक्षणावर देशाच्या सकल देशी उत्पादनाचा (जीडीपी) केवळ १.६ टक्के भागच खर्च केला. देशाच्या सुरक्षेला जी आव्हाने आहेत त्यांना या खर्चातून तोंड दिले जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले.>परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर असे अनेक मुद्दे आहेत की, ज्यांना मोदी सरकारने अतिशय ढिसाळपणे हाताळले, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न मोदी सरकारने जसे चुकीच्या पद्धतीने हाताळला, तसे यापूर्वी कधी झाले नव्हते, हे आम्ही मान्य केलेच पाहिजे.सरकारच्या दोन शाखा परस्परांच्या विरोधात काम करीत असून, वातावरण दिवसेंदिवस चिघळत आहे, असे सिंग म्हणाले. सीमेपलीकडून होत असलेला दहशतवाद असेल की, देशांतर्गतचा दहशतवाद किंवा अंतर्गत बंडखोरी आमच्या देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, हे स्पष्टच आहे. हे आजचे प्रश्न असून, प्रत्येक नागरिकासाठी ते मोठ्याच काळजीचे आहेत, असे ते म्हणाले.>सिद्धू यांनी मागितली माफीनवज्योत सिंग सिद्धू यांनी अधिवेशनात डॉ. मनमोहन सिंग यांची माफी मागितली. तुम्हाला ओळखण्यासाठी मला दहा वर्षे लागली. तुम्ही सरदार आहात, असरदारही आहात, असे म्हणत, त्यांनी डॉ. सिंग यांचे चरणस्पर्शही केले.काँग्रेस-राष्ट्रवादीला करावा लागेल त्याग : पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीवर जोर देताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जर दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर, पराभवाचा धोका आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांना त्याग करावा लागेल. जेणेकरुन भाजपला रोखले जाऊ शकेल.

टॅग्स :congressकाँग्रेस