शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

लोकसंख्या नियंत्रणासाठी मोदी सरकार कायदा करणार?; कायदेमंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 18:18 IST

तीन महत्त्वाच्या निर्णयानंतर मोदी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

नवी दिल्ली: तिहेरी तलाक, कलम ३७०, सुधारित नागरिकत्व कायदा ही तीन महत्त्वाची पाऊलं उचलल्यानंतर आता मोदी सरकार लवकरच आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय कायदा मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी याबद्दलचे सूतोवाच केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर लवकरच भाजपाकडून काम सुरू केलं जाऊ शकतं. तसे संकेत प्रसाद यांनी दिले आहेत. गेल्या सात महिन्यांमध्ये मोदी सरकारनं तीन मोठ्या आश्वासनांची पूर्तता केली. त्यावर भाष्य करताना, आम्ही जनतेला कोणताही आश्चर्याचा धक्का दिला नसल्याचं प्रसाद म्हणाले. मागील सात महिन्यांमध्ये मार्गी लावलेल्या कायद्यांचं आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिलं होतं. पुन्हा सत्तेवर येताच आम्ही त्यांची पूर्तता केली, असं प्रसाद यांनी सांगितलं. मोदींनी लोकसंख्या वाढीला वेसण घालण्याची गरज लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात व्यक्त केली होती, याची आठवण त्यांनी करुन दिली. भारतीयांनी लोकसंख्या नियंत्रणाचा विचार करायला हवा, असं आवाहन मोदींनी भाषणातून केलं होतं. पंतप्रधान नेहमीच लाल किल्ल्यावरुन महत्त्वाच्या घोषणा करतात. देशानं लोकसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला हवीत. आता देशाची लोकसंख्या १३० कोटी इतकी आहे, असं मोदींनी म्हटल्याचं त्यांनी सांगितलं. राजस्थानातल्या ग्रामपंचायतींमध्ये असा नियम आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. राजस्थानात एकपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना उमेदवारी मिळत नाही, असं प्रसाद यांनी सांगितलं. केंद्र सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणणार का, असा प्रश्न प्रसाद यांना विचारण्यात आला. त्यावर मी देशाचा नागरिक आहे. खासदार आहे आणि वकीलदेखील आहे. मला घटना समजते आणि देशदेखील समजतो. त्यामुळेच मला देशाची चिंता आहे आणि याच नात्यानं मी हे बोलतोय, असं उत्तर प्रसाद यांनी दिलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकtriple talaqतिहेरी तलाक