शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मोदी सरकारला १९ विधेयकांत करावी लागणार पुन्हा दुरुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 04:27 IST

काँग्रेसने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मोदी सरकारला आता १९ विधेयकांमध्ये पुन्हा दुरुस्ती करावी लागणार आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मोदी सरकारला आता १९ विधेयकांमध्ये पुन्हा दुरुस्ती करावी लागणार आहे. तत्कालीन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी २०१७ रोजी वित्त विधेयकासोबत ही दुरुस्ती विधेयके राज्यसभेत मंजूर करून घेतली होती.हरित लवादासहित १९ लवादांच्या नियमांत बदल करण्यासाठी संबंधित विधेयकांमध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. या कृतीवर आक्षेप घेणारी याचिका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दाखल केली होती. या दुरुस्त्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने बुधवारी रद्दबातल केल्या.या लवादांसाठी पूर्वी असलेले नियम मोदी सरकारने रद्द केले होते. लवादांतील कर्मचाऱ्यांचे वेतन, नियुक्तीच्या अटी ठरविण्याचे सारे अधिकार संबंधित कायद्यांमध्ये दुरुस्ती करून पंतप्रधान कार्यालय व पंतप्रधानांच्या हाती देण्यात आले होते. हे बदल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, आपल्या मर्जीतील लोकांची या १९ लवादांवर वर्णी लावण्याचा मोदी सरकारचा विचार होता. या लोकांचा त्या-त्या क्षेत्रातील अनुभव, शिक्षण किती आहे याकडे सरकार कानाडोळा करणार होते. लवादांशी संबंधित कायद्यांमध्ये दुरुस्ती सुचविणारे विधेयके वित्त विधेयक म्हणून संसदेत मांडणे हे योग्य की अयोग्य होते, याचा निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने विस्तारित खंडपीठापुढे वर्ग केले होते. त्या कालावधीत पंतप्रधान मोदी यांनी लवादांना कमजोर करण्याचे काम केले. न्यायालयाने या साºया प्रयत्नांना सुरुंग लावल्यामुळे आता केंद्र सरकारला पुन्हा नव्याने नियमांची आखणी करावी लागेल.>अनुच्छेद ११० मधील तरतुदीराज्यघटनेतील अनुच्छेद ११० तील तरतुदींनुसार लोकसभाध्यक्ष कोणतेही विधेयक वित्त विधेयक असल्याचे घोषित करू शकतात. त्यांचा आदेश दोन्ही सभागृहांना लागू होतो. लोकसभेला या विधेयकात दुरुस्ती करण्याचा तसेच ते मंजूर करण्याचा अधिकार आहे. राज्यसभेमध्ये त्या विधेयकावर फक्त चर्चा होऊ शकते. मात्र, त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्यसभेला नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी