शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

मोदी सरकारला १९ विधेयकांत करावी लागणार पुन्हा दुरुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 04:27 IST

काँग्रेसने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मोदी सरकारला आता १९ विधेयकांमध्ये पुन्हा दुरुस्ती करावी लागणार आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मोदी सरकारला आता १९ विधेयकांमध्ये पुन्हा दुरुस्ती करावी लागणार आहे. तत्कालीन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी २०१७ रोजी वित्त विधेयकासोबत ही दुरुस्ती विधेयके राज्यसभेत मंजूर करून घेतली होती.हरित लवादासहित १९ लवादांच्या नियमांत बदल करण्यासाठी संबंधित विधेयकांमध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. या कृतीवर आक्षेप घेणारी याचिका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दाखल केली होती. या दुरुस्त्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने बुधवारी रद्दबातल केल्या.या लवादांसाठी पूर्वी असलेले नियम मोदी सरकारने रद्द केले होते. लवादांतील कर्मचाऱ्यांचे वेतन, नियुक्तीच्या अटी ठरविण्याचे सारे अधिकार संबंधित कायद्यांमध्ये दुरुस्ती करून पंतप्रधान कार्यालय व पंतप्रधानांच्या हाती देण्यात आले होते. हे बदल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, आपल्या मर्जीतील लोकांची या १९ लवादांवर वर्णी लावण्याचा मोदी सरकारचा विचार होता. या लोकांचा त्या-त्या क्षेत्रातील अनुभव, शिक्षण किती आहे याकडे सरकार कानाडोळा करणार होते. लवादांशी संबंधित कायद्यांमध्ये दुरुस्ती सुचविणारे विधेयके वित्त विधेयक म्हणून संसदेत मांडणे हे योग्य की अयोग्य होते, याचा निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने विस्तारित खंडपीठापुढे वर्ग केले होते. त्या कालावधीत पंतप्रधान मोदी यांनी लवादांना कमजोर करण्याचे काम केले. न्यायालयाने या साºया प्रयत्नांना सुरुंग लावल्यामुळे आता केंद्र सरकारला पुन्हा नव्याने नियमांची आखणी करावी लागेल.>अनुच्छेद ११० मधील तरतुदीराज्यघटनेतील अनुच्छेद ११० तील तरतुदींनुसार लोकसभाध्यक्ष कोणतेही विधेयक वित्त विधेयक असल्याचे घोषित करू शकतात. त्यांचा आदेश दोन्ही सभागृहांना लागू होतो. लोकसभेला या विधेयकात दुरुस्ती करण्याचा तसेच ते मंजूर करण्याचा अधिकार आहे. राज्यसभेमध्ये त्या विधेयकावर फक्त चर्चा होऊ शकते. मात्र, त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्यसभेला नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी