शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेला गती

By admin | Updated: June 14, 2016 04:31 IST

दोन वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून, निर्णय प्रक्रिया मजबूत झाली आहे, असे सांगत भाजपाने सोमवारी आपल्या कामगिरीचा

अलाहाबाद : दोन वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून, निर्णय प्रक्रिया मजबूत झाली आहे, असे सांगत भाजपाने सोमवारी आपल्या कामगिरीचा लेखाजेखा मांडला. सरकारने एकात्मिक आर्थिक दृष्टिकोन अवलंबला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेची ७.९ टक्के वाढ झाली आहे, तसेच कृषी विकासही नकारात्मक स्थितीतून बाहेर येत आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले. त्यांनी भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, ‘कृषी विकास आता २.४ टक्के आहे. पूर्वी तो ०.२ टक्के होता. परिस्थिती नकारात्मक होती. या पूर्वीच्या संपुआ सरकारच्या काळात ३.५ कोटी बँक खाती होती, पंतप्रधानांनी जन धन योजना सुरू केल्यानंतर खातेधारकांची संख्या वाढून २१.८० कोटी झाली असून, यातील अनेक जण डेबिट कार्ड व दुर्घटना विमा यांसारख्या सुविधांचा लाभही घेत आहेत.’ बळीराजाच्या उन्नतीप्रती सरकारची बांधिलकी दर्शविताना ते म्हणाले की, ‘पुढील चार वर्षांत प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात ५० हजार कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.’ युरिया मिळविण्यासाठी या पूर्वी भांडणे होत. मात्र, आता युरियाचे २५ लाख टन एवढे विक्रमी उत्पादन करण्यात आले असून, तो सहजरीत्या मिळतो. निम कोटेड युरियाबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘यामुळे युरियाचा इतर उद्देशांसाठी काळाबाजार होणार नाही.’ ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ‘देशात कोळशाचे अतिरिक्त उत्पादन झाले असून, त्यामुळे औष्णिक ऊर्जेची निर्मिती वाढली. भ्रष्टाचारमुक्त निर्णयामुळे आता देशात धोरण लकव्यासारखी स्थिती उरली नाही. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोनदिवसीय बैठकीचा आज अखेरचा दिवस आहे.’ चंद्रशेखर आझादांना पुष्पांजलीभाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी येथे आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथील चंद्रशेखर आझाद पार्कला भेट देऊन महान क्रांतिकारकाच्या स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली. आठ दशकांपूर्वी याच पार्कमध्ये आझाद यांनी इंग्रजांशी लढताना अखेरचा श्वास घेतला होता. पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. पंतप्रधानांना हात हलवून त्यांना अभिवादन केले. बैठकीकडे जाताना पंतप्रधानांचा ताफा चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये थांबला.त्रिवेणी संगमावर नेत्यांचे स्नानभाजपा नेत्यांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याची संधी साधली. केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि पक्षाचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी आज संगमावर स्नान केले. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांनी रविवारी संगमावर स्नान केले होते. तथापि, झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे आनंद भवन पाहण्यासाठी गेले असता, तेथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध केला. आनंद भवन हे नेहरू-गांधी कुटुंबाचे वाडवडिलोपार्जित घर आहे. (वृत्तसंस्था)भाजपाचा आलेख उंचावतोय : गडकरीभाजपाचा आलेख उंचावत असून, आमच्याच पक्षाला भवितव्य आहे. याउलट काँग्रेस पक्ष मात्र नामशेष होत चालला आहे, असे प्रतिपादन भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे केले. केरळसारख्या दक्षिण भारतातील राज्यात वा आसाम व पश्चिम बंगालसारख्या पूर्व उत्तर भारतासारख्या राज्यांत भाजपाचे आतापर्यंत फारसे अस्तित्व नव्हते, पण आता भाजपा संपूर्ण देशभर वाढत चालला असून, ज्या ठिकाणी काँग्रेस मोठी होती, तिथे ती आता नावालाच शिल्लक राहिली आहे. दक्षिण आणि पूर्व भारतातील राज्यांत येत्या काळात भाजपाच प्रमुख पक्ष बनलेला पाहायला मिळेल.उत्तर प्रदेशात भाजपाचा मुख्यमंत्री या पदाचा उमेदवार कोण असेल, या प्रश्नाचे सरळ उत्तर देण्याचे गडकरी यांनी टाळले. पक्षाध्यक्षांनी त्याबाबत निर्णय घ्यायचा असतो आणि तो त्यांचा अधिकार आहे. -नितीन गडकरी