शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मोदी सरकार गरिबांना समर्पित

By admin | Updated: May 21, 2014 05:54 IST

रालोआच्या बैठकीत लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव सुचविल्यानंतर मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि एम़ वेंकय्या नायडू यांनी निवडीचा उपचार पूर्ण केला.

नवी दिल्ली : कठोर राजकारण्याची प्रतिमा असलेले भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पायर्‍यांवर नतमस्तक होत संसदेत प्रवेश केल्याने आणि त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये आपले सरकार गरिबांना समर्पित करताना त्यांनी केलेल्या भावुक तरीही आश्वासक भाषणाने राजधानीतील राजकीय नूरच पालटून गेला. मग रालोआच्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावावर झालेले शिक्कामोर्तब, राष्ट्पती प्रणव मुखर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी केलेले पाचारण या औपचारिकताही भावुक अंगानेच पूर्ण झाल्या. तसेच मोदी सरकार २६ तारखेला सायंकाळी सहा वाजता होणार्‍या शपथविधीनंतर दिल्लीचे तख्त सांभाळणार, यावरही शिक्कामोर्तब झाले. मोदींना सरकार स्थापनेसाठी पाचारण करताना राष्ट्रपतींनी रालोआचे नव्हे, तर केवळ भाजपाचे २८२ हे संख्याबळ विचारात घेतले. ५४३ सदस्यीय लोकसभेत भाजपा व मित्रपक्षांचे संख्याबळ ३३६ एवढे आहे. स्पष्ट बहुमतासाठी २७२ एवढ्या खासदारांची आवश्यकता असून एकट्या भाजपाकडे त्यापेक्षा जास्तच संख्याबळ आहे. रालोआच्या बैठकीत लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव सुचविल्यानंतर मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि एम़ वेंकय्या नायडू यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देत नेता निवडीचा उपचार पूर्ण केला.