शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार देशासाठी धोकादायक - अरूण शौरी

By admin | Updated: May 7, 2016 12:40 IST

एनडीएचे माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी नरेंद्र मोदी हे एकानुवर्ती अध्यक्षीय सरकार चालवत असल्याची टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - एनडीएचे माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी नरेंद्र मोदी हे एकानुवर्ती अध्यक्षीय सरकार चालवत असल्याची टीका केली आहे. ही दिशा देशासाठी अत्यंत धोकादायक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळात असलेल्या शौरींनी इंडिया टुडे या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अध्यक्षीय पद्धतीचं सरकार मोदी चालवत असून समतोल साधण्याची यंत्रणा नसल्याचा आरोप केला आहे.
मोदी सरकारची गेल्या दोन वर्षातली कामगिरी आपण नीट न्याहाळली असून येत्या तीन वर्षांमध्ये मानवी हक्कांवर गदा येण्याचा धोका असल्याचा इशारा शौरींनी दिला आहे. आपल्याला सोयीस्कर नसलेल्या मतांची गळचेपी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

 
मोदी माणसांना पैपर नॅपकिन प्रमाणे वापरतात
 
इंदिरा गांधी व जयललिता यांचा दाखला देत त्यांच्याप्रमाणेच मोदी देखील आत्मकेंद्रीत असल्याचा टीका शौरींनी केली आहे. असुरक्षितता, स्वत:च्या प्रेमात गुंतून राहणे आणि सगळ्या घटनांमधून वैयक्तिक लाभ मिळवत राहणे ही मोदींची वैशिष्ट्ये असल्याचे शौरींनी म्हटले आहे. याआधीही शौरींनी मोदींवर शरसंधान केलं होतं. लोकांचा वापर करायचा आणि त्यांना बाजुला फेकून द्यायचं ही मोदींची कार्यशैली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मोदी माणसांना पेपर नॅपकिनप्रमाणे वापरतात, आणि त्याबद्दल त्यांना जराही खेद नसतो असेही शौरींनी म्हटले आहे.
शौरींना अर्थमंत्री केलं नाही म्हणून ते मोदींवर टीका करत असल्याचा आरोप अत्यंत चुकीचा असल्याचा दावाही शौरींनी केला आहे.
 
या मुलाखतीमध्ये अरूण शौरींनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेतील महत्त्वाचे मुद्दे:
 
- मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळा, ललित मोदी घोटाळा आणि पश्चिम बंगालमधील शारदा घोटाळा यामध्ये जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली नाही.
- मोदींची दोन वर्षे म्हणजे प्रत्येकाशी रोज खेळलेली बॉक्सिंगची मॅच होती. एक चांगली संधी पूर्णपणे फुकट घालवली.
- पाकिस्तानबाबत मोदी सरकारचं निश्चित असं धोरणच नाही. पाकिस्तानच्या नजरेत आपण मूर्ख ठरलो आहोत.
- गुड गव्हर्नन्स कुठे  आहे? लष्करामध्ये नागरी व लष्करी संबंधांचा विचार केला, गुड गव्हर्नन्स दिसत नाही.
- मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचार नाहीये हे मान्य, परंतु राज्यांमधला भ्रष्टाचार थोपवण्यास असमर्थ.
- कॉमनवेल्थ गेम्समधल्या घोटाळ्याचं काय झालं. कारवाई होतेय की थांबवण्यात आली.
- चीनच्या बाबतीत नेहरू व मोदी दोघांनाही वाटलं ते ड्रॅगनला भुरळ पाडतिल, परंतु दोघेही अपयशी ठरले.
- मोदी अगदी मोजक्या निवडक लोकांकडून सल्ला घेतात.
- अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात सत्य शोधण्यासाठी मोदी सरकारकडेदोन वर्षे होती, परंतु काही केलं नाही. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर जे काही सांगत आहेत, त्यात नवीन काही नाही.