शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

मोदी सरकार 2024पर्यंत बनवणार 100 नवी विमानतळं; 1 हजार हवाई मार्ग उघडणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 12:14 IST

पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे.

नवी दिल्लीः पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. मोदी सरकार 2024पर्यंत 100 नवी विमानतळं बनवण्याच्या विचारात असून, सरकारच्या प्रस्तावानुसार एक हजार नवे हवाई मार्गे सुरू करण्यात येणार आहेत. हे मार्ग छोटी शहरं आणि गावांना जोडणार आहेत. ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत 2025पर्यंत मूलभूत पायाभूत सुविधा आणखी विकसित होणार आहेत. बैठकीतल्या एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, प्रत्येक वर्षी 600 वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पाच वर्षांत विमानांची संख्या दुप्पट म्हणजे 1200पर्यंत नेण्याचीही चर्चा सुरू आहे. अर्थव्यवस्था सध्या सुस्तावलेली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सरकार अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारनं गेल्या महिन्यात कॉर्पोरेट टॅक्समध्येही कपात केली होती. ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, शेजारील देश चीनमध्ये विमानतळांची संख्या वेगानं वाढत आहे. चीननं 2035पर्यंत 450 व्यावसायिक विमानतळ बनवण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे. जी 2018 तुलनेत दुप्पट आहे. तीन वर्षांपूर्वी भारतात फक्त 75 रनवे कार्यरत होते. मोदी सरकारनं आतापर्यंत 38 विमानतळांना देशाच्या एव्हिएशन मॅपशी जोडलेलं आहे. मोदी सरकार पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

टॅग्स :Airportविमानतळ