शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

'मोदींना पर्वा नाही!' भारतीय मुलाच्या अपहरणावरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 12:23 IST

अरुणाचल प्रदेशचे खासदार तापीर गाओ यांनी बुधवारी एका 17 वर्षीय तरुणाचे भारतीय हद्दीतून अपहरण केल्याचा दावा केल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

नवी दिल्ली:अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) 17 वर्षीय किशोरवयीन मुलाचे अपहरण केल्याची माहिती मीडियातून समोर आली आहे. त्या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. 

'मोदींना पर्वा नाही...राहुल गांधी यांनी या घटनेवरील पंतप्रधान मोदींच्या मौनावर हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्विट केले की, 'प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधी, भारताच्या भविष्य निर्मात्याचे चीनने अपहरण केले आहे. आम्ही मीराम तरौनच्या कुटुंबासोबत आहोत आणि आशा सोडणार नाही, हार मानणार नाही. पंतप्रधानांचे मौन दर्शवते की, त्यांना पर्वा नाही!', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

अरुणाचलच्या खासदाराने केली पुष्टीभारतीय लष्कराच्या सूत्रांनी ही घटना 18 जानेवारीला घडल्याची पुष्टी केली आहे. अरुणाचल प्रदेश सरकारच्या सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे. या घटनेची माहिती नवी दिल्लीला देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे खासदार तापीर गाओ यांनी बुधवारी एका 17 वर्षीय तरुणाचे भारतीय हद्दीतून अपहरण केल्याचा दावा केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. गाओ यांनी सांगितल्यानुसार, अपहरण झालेल्या तरुणाचे नाव मीरम तरौन असे आहे.

ट्विटरवरुन माहिती दिलीअरुणाचल प्रदेशात शियांग नदी भारतात प्रवेश करते त्या ठिकाणाजवळ ही घटना घडल्याचे खासदार गाओ म्हणाले. याआधी मंगळवारी गाओंनी ट्विट करुन तरुणाच्या अपहरणाची माहिती शेअर केली होती. त्यांनी ट्विटसह अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाचे छायाचित्र शेअर केले आणि म्हटले की, "भारत सरकारच्या सर्व एजन्सींना विनंती आहे की त्यांनी अल्पवयीन मुलाची लवकर सुटका केली पाहिजे."

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीन