शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींना कूटनीती समजत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 03:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कूटनीतीची अजिबात समज नाही.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कूटनीतीची अजिबात समज नाही. ते कूटनीतीचाही इव्हेंट मॅनेजमेंटप्रमाणेच विचार करीत असून त्यामुळेच गुरुदासपूर, पठाणकोट आणि पांपोरसारख्या दहशतवादी घटना घडत आहेत, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. पक्षाचे नेते कपिल सिब्बल यांनी सरकारी आकडेवारी सादर करताना सांगितले की, ५० जहाल नक्षलवादी पाकिस्तानातून भारतात घुसले असताना सरकार मात्र निद्रिस्थ आहे. एकीकडे सीमेवर जवान शहीद होत आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्यासोबत इफ्तारी साजरी करीत आहेत. पाकिस्तानबद्दल मोदी सरकारचे काय धोरण आहे तेच कळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तान दौरा व नवाज शरीफ यांच्या मैत्रीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी सरकार पाकिस्तानसह ज्या पद्धतीने नाते जपत आहे आणि वेळोवेळी भारताकडून पुढाकारानंतरही हल्ल्यांची जी मालिका सुरू आहे त्यातून धडा घेण्याची गरज आहे. परंतु सरकारची तशी इच्छा दिसत नाही, असा आरोप सिब्बल यांनी केला. गृहमंत्री राजनाथसिंग व परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तानबाबत वक्तव्यांचा समाचार घेताना केवळ बयाणबाजीच होत राहणार का? कारवाई केव्हा होणार? असा सवाल सिब्बल यांनी केला. भारतीय जवान कुठवर शहीद होणार याचे उत्तर पंतप्रधानांना द्यावे लागेल, असे आव्हान त्यांनी दिले. मोदींची फिरकी घेताना ते म्हणाले, हा साऊंड व लाईट शो नाही. परराष्ट्र धोरण गंभीरपणे राबवावे लागते. मोदी यांना कूटनीतीचा कुठलाही अनुभव नसल्याने ते कूटनीतीचा केवळ देखावा करीत असतात, असे काँग्रेसचे मत आहे. अणु पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यतेबाबतही मोदींची वागणूक अशीच राहिली. जगभरात ढोल पिटला आणि सेऊलमधून रिक्त हस्ते परत आले. एनएसजीवर मुत्सद्देगिरीत भारताच्या अपयशामुळे देशाची प्रतिमा मलिन झाली असून याला पूर्णत: पंतप्रधान मोदी यांचे चुकीचे धोरण जबाबदार आहे, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.