शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

पंतप्रधान मोदींना कूटनीती समजत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 03:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कूटनीतीची अजिबात समज नाही.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कूटनीतीची अजिबात समज नाही. ते कूटनीतीचाही इव्हेंट मॅनेजमेंटप्रमाणेच विचार करीत असून त्यामुळेच गुरुदासपूर, पठाणकोट आणि पांपोरसारख्या दहशतवादी घटना घडत आहेत, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. पक्षाचे नेते कपिल सिब्बल यांनी सरकारी आकडेवारी सादर करताना सांगितले की, ५० जहाल नक्षलवादी पाकिस्तानातून भारतात घुसले असताना सरकार मात्र निद्रिस्थ आहे. एकीकडे सीमेवर जवान शहीद होत आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्यासोबत इफ्तारी साजरी करीत आहेत. पाकिस्तानबद्दल मोदी सरकारचे काय धोरण आहे तेच कळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तान दौरा व नवाज शरीफ यांच्या मैत्रीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी सरकार पाकिस्तानसह ज्या पद्धतीने नाते जपत आहे आणि वेळोवेळी भारताकडून पुढाकारानंतरही हल्ल्यांची जी मालिका सुरू आहे त्यातून धडा घेण्याची गरज आहे. परंतु सरकारची तशी इच्छा दिसत नाही, असा आरोप सिब्बल यांनी केला. गृहमंत्री राजनाथसिंग व परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तानबाबत वक्तव्यांचा समाचार घेताना केवळ बयाणबाजीच होत राहणार का? कारवाई केव्हा होणार? असा सवाल सिब्बल यांनी केला. भारतीय जवान कुठवर शहीद होणार याचे उत्तर पंतप्रधानांना द्यावे लागेल, असे आव्हान त्यांनी दिले. मोदींची फिरकी घेताना ते म्हणाले, हा साऊंड व लाईट शो नाही. परराष्ट्र धोरण गंभीरपणे राबवावे लागते. मोदी यांना कूटनीतीचा कुठलाही अनुभव नसल्याने ते कूटनीतीचा केवळ देखावा करीत असतात, असे काँग्रेसचे मत आहे. अणु पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यतेबाबतही मोदींची वागणूक अशीच राहिली. जगभरात ढोल पिटला आणि सेऊलमधून रिक्त हस्ते परत आले. एनएसजीवर मुत्सद्देगिरीत भारताच्या अपयशामुळे देशाची प्रतिमा मलिन झाली असून याला पूर्णत: पंतप्रधान मोदी यांचे चुकीचे धोरण जबाबदार आहे, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.